शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

सरपंचपदांवर ‘आविसं’चे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 23:48 IST

जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या २० ग्रामपंचायतींपैकी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ४ ग्रामपंचायतींच्या निकालात आदिवासी विद्यार्थी संघाने बाजी मारली. ४ पैकी ३ जागी विजय विजयी मिळवत आविसंने आपले वर्चस्व तर काँग्रेसने एक सरपंचपद पटकावत आपले अस्तित्व दाखविले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसला एक जागा : भाजपला जोरदार झटका, ईश्वरचिठ्ठीत राष्ट्रवादीला संधी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/एटापल्ली : जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या २० ग्रामपंचायतींपैकी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ४ ग्रामपंचायतींच्या निकालात आदिवासी विद्यार्थी संघाने बाजी मारली. ४ पैकी ३ जागी विजय विजयी मिळवत आविसंने आपले वर्चस्व तर काँग्रेसने एक सरपंचपद पटकावत आपले अस्तित्व दाखविले आहे. ईश्वचिठ्ठीत आवलमारीच्या एका जागेवर राष्ट्रवादीच्या सदस्य निवडून आल्या. मात्र या निवडणुकीतील भाजपला जोरदार झटका बसला आहे.२० ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि सदस्यांची अविरोध निवड झाल्याने त्या ठिकाणी बुधवारी मतदान झाले नाही. तर गर्देवाडा, वांगेतुरी आणि मेंढरी या तीन ग्रामपंचायतींमध्ये कोणीही नामांकन भरले नाही. त्यामुळे केवळ चार ठिकाणी मतदान झाले. त्यात अहेरी तालुक्यातील आवलमरी ग्रामपंचायतीवर सरपंचासह आविसंचे ८ सदस्य निवडून आले. येथील सरपंच म्हणून सुनंदा व्यंकना कोडापे विजयी विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक ३ मध्ये आविसंचे मारोती मडावी व राष्ट्रवादीचे खुशाल तलांडी यांना समान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात राष्ट्रवादीचे तलांडी विजयी झाले.एटापल्ली तालुक्यातील सेवारीच्या सरपंचपदी आविसंच्या मिना घिसु करंगामी, सरखेडाच्या सरपंचपदी आविसंच्या शांता शिवाजी उसेंडी तर वडसा(खुर्द)च्या सरपंचपदी काँग्रेसच्या मंदा शालिकराम गेडाम यांची निवड झाली. कॉग्रेसच्या विजय रॅलीत जि.प. सदस्य संजय चरडुके, नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार, जारावंडीचे सरपंच सुधाकर टेकाम, पं.स. सदस्य शालिकराम गेडाम आदी सहभागी झाले होते.आविसंच्या विजय रॅलीत जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जि.प.सदस्य सारीका आईलवार, पं.स.उपसभापती नितेश नरोठे, प्रज्वल नागुलवार, रमेश वैरागडे, राजू गोमाडी, मंगेश हलामी, खुशाल गावतुरे आदी सहभागी झाले होते.अहेरी येथे जि.प.सदस्य अजय नैताम, सुनीता कुसनाके, पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, पंचायत समिती सदस्य भास्कर तलांडे, इंदारामचे सरपंच गुलाबराव सोयाम, वट्राचे सरपंच रवींद्र आत्राम, नागेपलीच्या सरपंच सरोज दुर्गे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. अहेरी विधानसभा मतदार संघावर भाजपचे प्रतिनिधी आहे. मात्र या निवडणुकीत इतर पक्षांनी मारलेली बाजी पाहता भाजपची पकड कमी झाल्याचे दिसते.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत