शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वाघाने घेतला गुराख्याचा बळी; गावापासून १ किमी दूर अंतरावरची घटना

By गेापाल लाजुरकर | Updated: September 9, 2022 18:28 IST

गडचिरोली जिल्ह्यात गावापासून १ किमी अंतरावर दूर वाघाने एका गुराख्याचा बळी घेतला. 

गडचिरोली: गावापासून अगदी एक किमी अंतरावरच्या जंगलात स्वतःची गुरे चारत असताना वाघाने हल्ला केल्याने एक शेतकरी गुराखी ठार झाला. ही घटना गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथे शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. कृष्णा महागू ढोणे (५९) रा. कळमटोला असे मृत्यू झालेल्या गुराख्याचे नाव आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या कळमटोला येथील कृष्णा ढोणे हे नेहमीप्रमाणे आपले बैल इतर चार सहकाऱ्यांसमवेत गावापासून जवळच एक किमी अंतरावरील कक्ष क्रमांक ४१५ मध्ये सकाळी १०:३० वाजता घेऊन गेले.

 सर्वजण जवळपास राहून आपापली गुरे चारत होते. दरम्यान दुपारी २ वाजता वाघाने एका भाकडी (वासरू) वर हल्ला केला तेव्हा सर्व गुराख्यांनी जनावरे एकत्र करण्याचा प्रयत्न केला, तरीही वाघाने भाकडीला ठार केले. त्यानंतर वाघाने गुराखी कृष्णा ढोणे यांच्यावर हल्ला करीत फरफटत नेले. याही वेळी इतर गुराख्यांनी आरडाओरड केली. परंतु वाघाच्या रौद्र रुपापुढे कुणाचेच काही चालले नाही. अखेर गावातील काही लोकांना बोलावून शोधमोहीम राबविली असता घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर कृष्णा ढोणे यांचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना देताच त्यांनी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी गडचिरोली येथे पाठविला.

 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीFarmerशेतकरीTigerवाघDeathमृत्यू