शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१५ व्यक्तींसह ९२ जनावरे दगावली

By admin | Updated: September 18, 2016 01:46 IST

गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१६ या साडेपाच महिन्याच्या कालावधीत वीज कोसळून,

नैसर्गिक आपत्तीचा फटका : २ हजार ४३५ घरांची पडझडगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात १ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१६ या साडेपाच महिन्याच्या कालावधीत वीज कोसळून, अतिवृष्टी तसेच पुरात अडकून व इतर प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे १५ व्यक्तींसह लहान व मोठी मिळून एकूण ९२ जनावरे दगावली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. याशिवाय अतिवृष्टीमुळे यंदाच्या पावसाळ्यात २ हजार ४३५ घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब बेघर झाले आहेत.गडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात तीन ते चारदा अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली. गेल्या तीन वर्षातील पावसाची सरासरी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधार पावसाने पूर्ण झाली. अतिवृष्टी व इतर आपत्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले.नैसर्गिक आपत्तीमुळे १५ इसम ठार झाले. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील दोन, धानोरा एक, कोरची एक, कुरखेडा दोन, आरमोरी एक, चामोर्शी एक, अहेरी एक, सिरोंचा दोन व एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक चार इसमांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा आतापर्यंत ११ इसम जखमी झाले आहेत. यामध्ये चामोर्शी तालुक्यातील दोन, मुलचेरा दोन व अहेरी तालुक्यातील सर्वाधिक पाच इसमांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत २४ लहान जनावरे दगावली आहेत. यामध्ये कुरखेडा तालुक्यातील तीन, आरमोरी एक, अहेरी सहा, एटापल्ली नऊ व सिरोंचा तालुक्यातील पाच जनावरांचा समावेश आहे. दगावलेल्या ६८ मोठ्या जनावरांमध्ये धानोरा तालुक्यातील चार, गडचिरोली चार, कुरखेडा तीन, आरमोरी चार, चामोर्शी दोन, अहेरी १५, भामरागड सात, सिरोंचा पाच व सर्वाधिक एटापल्ली तालुक्यातील २४ जनावरांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे यावर्षी आतापर्यंत बाराही तालुक्यात एकूण २ हजार ४२० घरांची अशंता पडझड झाली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील २६१, धानोरा १७८, कोरची २७, कुरखेडा १२८, देसाईगंज १६, आरमोरी ५२०, चामोर्शी ७१९, मुलचेरा १२, अहेरी ४१५, एटापल्ली ७२, भामरागड ४ व सिरोंचा तालुक्यातील ६८ घरांचा समावेश आहे. पूर्णत: पडझड झालेल्या १५ घरांमध्ये गडचिरोली तालुक्यातील चार, कुरखेडा एक, अहेरी एक व एटापल्ली तालुक्यातील नऊ घरांचा समावेश आहे. आर्थिक मदत तत्काळ देण्याची मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)६९ लाखांची मदत प्रलंबितअतिवृष्टी, पूर व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात यंदा आतापर्यंत नागरिकांचे एकूण ९६ कोटी ९८ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त परिस्थितीची पाहणी व मोकापंचनामा महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी केला असून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. या अहवालानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत पूर पीडित व नुकसानग्रस्तांना शासनाच्या निकषानुसार ९९ लाख ९८ हजार २९० रूपयांची मदत प्रदान करण्यात आली आहे. अद्यापही ६९ लाख ८८ हजार रूपयांची मदत देणे शिल्लक आहे. परिणामी अनेक नुकसानग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित आहे.जनावरांचे ९४ गोठे कोसळलेअतिवृष्टीमुळे जिल्हाभरात आतापर्यंत शेतकऱ्यांच्या जनावरांचे एकूण ९४ गोठ्यांची पडझड झाली असून जनावर मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात जनावरांच्या निवासाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. यामुळे गडचिरोली तालुक्यातील १४, धानोरा १०, कोरची २, कुरखेडा ३०, वडसा १, आरमोरी २४, मुलचेरा १, अहेरी ८, भामरागड १ व सिरोंचा तालुक्यातील ३ गोठ्यांचा समावेश आहे.