शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

९ लाखांची अतिरिक्त मजुरी प्रलंबित

By admin | Updated: July 13, 2016 02:08 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात

रोजगार हमी योजना : विलंब झाल्यास व्याजासह मिळते मजुरी गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ७ लाख ७८ हजार ५३५ रूपये अतिरिक्त व्याजासह मजुरी म्हणून मजुरांना अदा केले आहेत. अद्यापही प्रशासनाकडे ९ लाख १८ हजार ७०० रूपयांची व्याजासह अतिरिक्त मजुरी प्रलंबित आहे. त्यामुळे रोहयो मजूर ऐन खरीप हंगामात अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने तत्काळ प्रलंबित मजुरी अदा करावी, अशी मागणी आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेसह विविध यंत्रणांच्या वतीने अनेक कामे केली जातात. ग्रामपंचायतस्तरावर रोहयोच्या माध्यमातून ५० टक्के कामे केली जातात. नोंदणीकृत प्रत्येक मजुराला १०० दिवसांचा रोजगार देण्याची हमी राज्य शासनाने रोहयोच्या कायद्यान्वये दिली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून रोजगार देण्यासाठी प्रयत्नही केले जातात. मात्र मजुरी थकीत असण्याचे प्रमाण अधिक आहे. थकीत मजुरीमुळे मजूर अडचणीत येऊ नये तसेच अशा मजुरांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी नवा शासन निर्णय काढून थकीत मजुरीवर व्याज लावून अतिरिक्त मजुरी अदा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात दरवर्षी रोहयो कामाची मजुरी देण्यास विलंब झालेल्या मजुरांना व्याजासह अतिरिक्त मजुरी दिली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी) ही आहेत मजुरी विलंबाची कारणे रोजगार हमी योजनेच्या कामावरील नोंदणीकृत मजुरांना आपला आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी लिंकिंग करणे अत्यावश्यक आहे. तसेच संबंधित मजुरांनी नरेगा प्रशासनाकडे आपला अचूक बँक खाते क्रमांक देणे गरजेचे आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक मजूर अद्यापही अशिक्षित आहेत. अनेक मजुरांनी आपल्या बँक खात्याशी आधारकार्ड लिंकिंग केलेले नाही. शिवाय अनेक मजुरांनी चुकीचे बँक खाते क्रमांक नरेगाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे दिले आहेत. यासह विविध तांत्रिक कारणामुळे रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची मजुरीची रक्कम अनेक महिने थकीत असते. मजुरांच्या बँक खाते क्रमांकात अनेक त्रूट्या असल्याची माहिती नरेगा विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. रोजगार सेवकाकडून हजेरी पत्रक उशिरा भरल्या जात असल्याने मजुरांची मजुरी प्रलंबित राहते.