शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

९५० विद्यार्थी घेताहेत व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:43 IST

उन्हाळ्याच्या सुट्या सत्कार्मी लागाव्या यासाठी शिक्षण विभागाने देसाईगंज तालुक्यातील २५ शाळांमध्ये २० ते ३० एप्रिल दरम्यान समर कॅम्प हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमात सुमारे ९५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ज्या समर कॅम्पसाठी शहरात हजारो रुपये मोजावे लागतात, अशा प्रकारचेच कॅम्प आता जिल्हा परिषद शाळेत मोफत आयोजित केले आहेत. शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

ठळक मुद्देग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम : देसाईगंज तालुक्यातील २५ जि.प. शाळांचा सहभाग

अरविंद घुटके ।लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हाळा/मोहटोला : उन्हाळ्याच्या सुट्या सत्कार्मी लागाव्या यासाठी शिक्षण विभागाने देसाईगंज तालुक्यातील २५ शाळांमध्ये २० ते ३० एप्रिल दरम्यान समर कॅम्प हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमात सुमारे ९५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ज्या समर कॅम्पसाठी शहरात हजारो रुपये मोजावे लागतात, अशा प्रकारचेच कॅम्प आता जिल्हा परिषद शाळेत मोफत आयोजित केले आहेत. शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.देसाईगंज तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३४ व नगर परिषदेच्या ८ अशा एकूण ४२ शाळा आहेत. खासगी व्यवस्थापनाच्या ३० शाळा अशा देसाईगंज तालुक्यात एकूण ७२ शाळा आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या २५ शाळांमध्ये समर कॅम्प हा उपक्रम पाचवी ते सावीच्या विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे.शाळांना अधिकृत सुट्या २ मेपासून लागतात. मात्र एप्रिलमध्ये परीक्षा झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थी शाळेमध्ये येतच नाही. ११ एप्रिल रोजी यावर्षी निवडणूक असल्याने शिक्षकांनी लवकरच परीक्षा आटोपल्या. निवडणुकीचे काही दिवस धकाधकीचे गेले. निवडणुकीचे काम आता आटोपले असल्याने शिक्षकांनी पुन्हा विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली आहे. विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण व मनोरंजनात्मक उपक्रम राबविल्यास ते शाळेत येतील, या उद्देशाने समर कॅम्पचे आयोजन केले जात आहे. देसाईगंज केंद्राने राबविलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे. सदर उपक्रम देसाईगंजचे गटशिक्षणाधिकारी डॉ. पितांबर कोडापे यांच्या मार्गदर्शनात गट समन्वयक ब्रह्मानंद उईके, केंद्र प्रमुख विजय बन्सोड, संजय कसबे, विवेक बुध्दे, अंबादास आमनेर, विषय साधन व्यक्ती अरविंद घुटके, राजेंद्र बांगरे, रामकृष्ण राहांगडाले, रमाबाई सहारे, अल्का सोनेकार, वैशाली खोब्रागडे, रणजित चौधरी, केदार बन्सोड हे शिबिरावर लक्ष ठेवून आहेत. यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनीही महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे.शिबिरातील उपक्रमबोला तुम्ही ऐकतो आम्ही, कथाकथन, कविता तयार करणे, सुलभ पध्दतीने गणितीय प्रक्रिया करणे, चला छंद जोपासूया, भेंड्या खेळणे, जुडो कराटे, विविधांगी डॉन्स शिकविणे, डोळ्यास पट्टी लावून रंगांची ओळख करणे, स्पोकन इंग्लिश, हस्ताक्षर स्पर्धा, योगा, कागदी क्राप्ट, चित्रकला आदी उपक्रम राबविले जात आहेत. केवळ त्याच शाळेच्या शिक्षकांवर अवलंबून न राहता. त्या-त्या विषयात पारांगत असलेल्या शिक्षकाला इतर शाळांमध्ये मार्गदर्शक म्हणून पाठविले जात आहे.