शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही ८० टक्के बाजारपेठ बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:01 IST

जिल्ह्यात अडकून पडलेल्या बाहेरच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील नागरिकांना त्यांच्या गृहजिल्ह्यात रवाना केल्यानंतर बाहेर अडकून पडलेले या जिल्ह्यातील बहुतांश नागरिक आता आपापल्या गावात दाखल झाले आहेत. त्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवून तर काहींना घरीच विलगिकरणात राहण्यास सांगून गाव समित्यांमार्फत त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे हे नागरिक १४ दिवसपर्यंत बाहेर भटकण्याची शक्यता नाही.

ठळक मुद्देनागरिकांसह व्यापारीही हतबल : व्यवसायानुसार ठराविक दिवस वाटून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना संसर्गाच्या बाबतीत राज्यभरातील ग्रिन झोनमध्ये असलेल्या मोजक्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश आहे. असे असले तरी गेल्या सव्वा महिन्यापासून येथील बाजारपेठेसह प्रमुख व्यवहार ठप्पच आहेत. दुसरे लॉकडाऊन संपल्यानंतर (३ मे नंतर) जिल्ह्यातील बहुतांश व्यवहार सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना प्रत्यक्षात ८० टक्के बाजारपेठ बंदच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तमाम नागरिकांसह व्यापारी वर्गही हतबल होऊन संभ्रमात पडला आहे.जिल्ह्यात अडकून पडलेल्या बाहेरच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील नागरिकांना त्यांच्या गृहजिल्ह्यात रवाना केल्यानंतर बाहेर अडकून पडलेले या जिल्ह्यातील बहुतांश नागरिक आता आपापल्या गावात दाखल झाले आहेत. त्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवून तर काहींना घरीच विलगिकरणात राहण्यास सांगून गाव समित्यांमार्फत त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे हे नागरिक १४ दिवसपर्यंत बाहेर भटकण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे सर्व स्तरातील नागरिकांमध्ये आता बऱ्यापैकी कोरोनाची जागृती आल्यामुळे हातावर शिक्का मारलेल्या व्यक्तीला बाहेर भटकताना दिसल्यास नागरिक स्वत:च त्याला मनाई करतील. अशा स्थितीत बाजारपेठ टप्प्याटप्प्याने उघडल्यास बाहेरून आलेल्या व्यक्तीपासून इतरांना धोका होण्याची शक्यता राहणार नाही. तसेच बºयाच प्रमाणात नागरिकांना दिलासाही मिळू शकेल.विशेष म्हणजे ग्रीन झोन असलेल्या लगतच्या गोंदिया जिल्ह्यात बºयापैकी व्यवहार सुरू झाले आहेत. किराणा दुकाने वगळता बाजारपेठेतील इतरही दुकानांना तिथे परवानगी देण्यात आली. कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतरही तिथे बाजारपेठ सुरू होऊ शकते, तर गडचिरोलीत का नाही? असा प्रश्न देसाईगंज येथील व्यापारी तथा माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले.दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील बाजारपेठ ४ दिवसात सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. परंतू अजून त्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने आदेश काढण्यात आलेला नाही. अशाही स्थितीत काही दुकानदारांनी अर्धवट शटर उघडून काही प्रमाणात व्यवहार सुरू केले आहेत. परवानगी आहे किंवा नाही याबाबत अनेक जण संभ्रमात आहेत.व्यवहार एकमेकांवर अवलंबूनजिल्हा प्रशासनाने बांधकामांसह काही व्यवहारांना परवानगी दिली आहे. परंतू त्या कामासाठी लागणाºया साहित्यांची दुकाने बंद आहेत. केवळ किराणा माल, औषधी, कृषी साहित्य, विद्युत उपकरणे यांनाच परवानगी दिली आहे. पण दैनंदिन जीवनात याशिवाय अनेक बाबींची गरज पडत असताना ती दुकाने कधी सुरू करणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अनेक व्यवहार एकमेकांवर अवलंबून आहेत. त्या साखळीतील इतर दुकाने बंद असल्याने अनेक कामे अडून पडली आहेत.व्यवसायानुसार करा दिवसांची वाटणीमार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या व्यवसायाला विशिष्ट दिवशीच सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास कामेही अडणार नाही आणि गर्दीही टाळणे शक्य होऊ शकेल. याशिवाय सर्वच व्यापारी, त्यांचे नोकरदार यांचीही मिळकत सुरू होऊन अर्थव्यवस्थेची घडी निट बसण्यास मदत होईल.

टॅग्स :Marketबाजार