शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

अजूनही ८० टक्के बाजारपेठ बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:01 IST

जिल्ह्यात अडकून पडलेल्या बाहेरच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील नागरिकांना त्यांच्या गृहजिल्ह्यात रवाना केल्यानंतर बाहेर अडकून पडलेले या जिल्ह्यातील बहुतांश नागरिक आता आपापल्या गावात दाखल झाले आहेत. त्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवून तर काहींना घरीच विलगिकरणात राहण्यास सांगून गाव समित्यांमार्फत त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे हे नागरिक १४ दिवसपर्यंत बाहेर भटकण्याची शक्यता नाही.

ठळक मुद्देनागरिकांसह व्यापारीही हतबल : व्यवसायानुसार ठराविक दिवस वाटून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना संसर्गाच्या बाबतीत राज्यभरातील ग्रिन झोनमध्ये असलेल्या मोजक्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश आहे. असे असले तरी गेल्या सव्वा महिन्यापासून येथील बाजारपेठेसह प्रमुख व्यवहार ठप्पच आहेत. दुसरे लॉकडाऊन संपल्यानंतर (३ मे नंतर) जिल्ह्यातील बहुतांश व्यवहार सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना प्रत्यक्षात ८० टक्के बाजारपेठ बंदच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तमाम नागरिकांसह व्यापारी वर्गही हतबल होऊन संभ्रमात पडला आहे.जिल्ह्यात अडकून पडलेल्या बाहेरच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील नागरिकांना त्यांच्या गृहजिल्ह्यात रवाना केल्यानंतर बाहेर अडकून पडलेले या जिल्ह्यातील बहुतांश नागरिक आता आपापल्या गावात दाखल झाले आहेत. त्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवून तर काहींना घरीच विलगिकरणात राहण्यास सांगून गाव समित्यांमार्फत त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे हे नागरिक १४ दिवसपर्यंत बाहेर भटकण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे सर्व स्तरातील नागरिकांमध्ये आता बऱ्यापैकी कोरोनाची जागृती आल्यामुळे हातावर शिक्का मारलेल्या व्यक्तीला बाहेर भटकताना दिसल्यास नागरिक स्वत:च त्याला मनाई करतील. अशा स्थितीत बाजारपेठ टप्प्याटप्प्याने उघडल्यास बाहेरून आलेल्या व्यक्तीपासून इतरांना धोका होण्याची शक्यता राहणार नाही. तसेच बºयाच प्रमाणात नागरिकांना दिलासाही मिळू शकेल.विशेष म्हणजे ग्रीन झोन असलेल्या लगतच्या गोंदिया जिल्ह्यात बºयापैकी व्यवहार सुरू झाले आहेत. किराणा दुकाने वगळता बाजारपेठेतील इतरही दुकानांना तिथे परवानगी देण्यात आली. कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतरही तिथे बाजारपेठ सुरू होऊ शकते, तर गडचिरोलीत का नाही? असा प्रश्न देसाईगंज येथील व्यापारी तथा माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले.दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील बाजारपेठ ४ दिवसात सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. परंतू अजून त्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने आदेश काढण्यात आलेला नाही. अशाही स्थितीत काही दुकानदारांनी अर्धवट शटर उघडून काही प्रमाणात व्यवहार सुरू केले आहेत. परवानगी आहे किंवा नाही याबाबत अनेक जण संभ्रमात आहेत.व्यवहार एकमेकांवर अवलंबूनजिल्हा प्रशासनाने बांधकामांसह काही व्यवहारांना परवानगी दिली आहे. परंतू त्या कामासाठी लागणाºया साहित्यांची दुकाने बंद आहेत. केवळ किराणा माल, औषधी, कृषी साहित्य, विद्युत उपकरणे यांनाच परवानगी दिली आहे. पण दैनंदिन जीवनात याशिवाय अनेक बाबींची गरज पडत असताना ती दुकाने कधी सुरू करणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अनेक व्यवहार एकमेकांवर अवलंबून आहेत. त्या साखळीतील इतर दुकाने बंद असल्याने अनेक कामे अडून पडली आहेत.व्यवसायानुसार करा दिवसांची वाटणीमार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या व्यवसायाला विशिष्ट दिवशीच सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास कामेही अडणार नाही आणि गर्दीही टाळणे शक्य होऊ शकेल. याशिवाय सर्वच व्यापारी, त्यांचे नोकरदार यांचीही मिळकत सुरू होऊन अर्थव्यवस्थेची घडी निट बसण्यास मदत होईल.

टॅग्स :Marketबाजार