शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

५,८४९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:09 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात ८० केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. ५ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

ठळक मुद्देजिल्हाभर ८० केंदे्र : पाचवी व आठवीचे विद्यार्थी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात ८० केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. ५ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेत इयत्ता पाचवी व आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले.जिल्हाभरातून शिष्यवृत्ती परीक्षेकरिता इयत्ता पाचवीच्या ३ हजार २५७ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता. यापैकी ३ हजार १२८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले. याची टक्केवारी ९६.०३ एवढी आहे. इयत्ता आठवीच्या २ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज सादर केला होता. परंतु २ हजार ७२१ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. याची टक्केवारी ९४.९४ एवढी आहे. गडचिरोली शहरात स्कूल आॅफ स्कॉलर्स, कारमेल स्कूल, वसंत विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, राणी दुर्गावती विद्यालय, शिवाजी हायस्कूल आदी शाळांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आले. जिल्हाभरात विविध ठिकाणी तालुकास्तरावर परीक्षा घेण्यात आली.आरमोरी - येथील महात्मा गांधी विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तसेच तालुक्यात महात्मा फुले विद्यालय देऊळगाव, किसान विद्यालय वडधा, विवेकानंद विद्यालय मानापूर, हितकारणी विद्यालय आरमोरी, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी, शिवानी विद्यालय वडधा, महाराष्ट्र विद्यालय वैरागड अशा एकूण दहा केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता पाचवीचे ३२२ पैकी ३१७ व इयत्ता आठवीचे ३१९ पैकी ३१३ असे एकूण ६३० विद्यार्थी सहभागी झाले. गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांच्या नियंत्रणात परीक्षा गटसमन्वयक शिक्षण विस्तार अधिकारी गुलाबसिंग राठोड यांनी काम पाहिले.अहेरी - धर्मराव कृषी विद्यालय व भगवंतराव हायस्कूल या दोन केंद्रावर घेण्यात आली. धर्मराव कृषी विद्यालयातील केंद्रावर इयत्ता पाचवीचे एकूण २०८ पैैकी १८८ व इयत्ता आठवीचे ११६ पैैकी ११२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. भगवंतराव हायस्कूलच्या केंद्रावर इयत्ता पाचवीचे एकूण १०४ पैैकी १०१ तर इयत्ता आठवीचे ११६ पैकी १०९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. दोन्ही केंद्रावर एकूण ४०६ विद्यार्थी सहभागी झाले. तर ३० विद्यार्थी अनुपस्थित होते. बीईओ निर्मला वैद्य यांच्या मार्गदर्शनात केंद्र संचालक म्हणून सुषमा खराबे, गर्गम, राजू नागरे, आत्राम यांनी काम पाहिले.