शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

५,८४९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:09 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात ८० केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. ५ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

ठळक मुद्देजिल्हाभर ८० केंदे्र : पाचवी व आठवीचे विद्यार्थी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात ८० केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. ५ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेत इयत्ता पाचवी व आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले.जिल्हाभरातून शिष्यवृत्ती परीक्षेकरिता इयत्ता पाचवीच्या ३ हजार २५७ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता. यापैकी ३ हजार १२८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले. याची टक्केवारी ९६.०३ एवढी आहे. इयत्ता आठवीच्या २ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज सादर केला होता. परंतु २ हजार ७२१ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. याची टक्केवारी ९४.९४ एवढी आहे. गडचिरोली शहरात स्कूल आॅफ स्कॉलर्स, कारमेल स्कूल, वसंत विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, राणी दुर्गावती विद्यालय, शिवाजी हायस्कूल आदी शाळांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आले. जिल्हाभरात विविध ठिकाणी तालुकास्तरावर परीक्षा घेण्यात आली.आरमोरी - येथील महात्मा गांधी विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तसेच तालुक्यात महात्मा फुले विद्यालय देऊळगाव, किसान विद्यालय वडधा, विवेकानंद विद्यालय मानापूर, हितकारणी विद्यालय आरमोरी, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी, शिवानी विद्यालय वडधा, महाराष्ट्र विद्यालय वैरागड अशा एकूण दहा केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता पाचवीचे ३२२ पैकी ३१७ व इयत्ता आठवीचे ३१९ पैकी ३१३ असे एकूण ६३० विद्यार्थी सहभागी झाले. गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांच्या नियंत्रणात परीक्षा गटसमन्वयक शिक्षण विस्तार अधिकारी गुलाबसिंग राठोड यांनी काम पाहिले.अहेरी - धर्मराव कृषी विद्यालय व भगवंतराव हायस्कूल या दोन केंद्रावर घेण्यात आली. धर्मराव कृषी विद्यालयातील केंद्रावर इयत्ता पाचवीचे एकूण २०८ पैैकी १८८ व इयत्ता आठवीचे ११६ पैैकी ११२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. भगवंतराव हायस्कूलच्या केंद्रावर इयत्ता पाचवीचे एकूण १०४ पैैकी १०१ तर इयत्ता आठवीचे ११६ पैकी १०९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. दोन्ही केंद्रावर एकूण ४०६ विद्यार्थी सहभागी झाले. तर ३० विद्यार्थी अनुपस्थित होते. बीईओ निर्मला वैद्य यांच्या मार्गदर्शनात केंद्र संचालक म्हणून सुषमा खराबे, गर्गम, राजू नागरे, आत्राम यांनी काम पाहिले.