शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

५,८४९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:09 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात ८० केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. ५ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

ठळक मुद्देजिल्हाभर ८० केंदे्र : पाचवी व आठवीचे विद्यार्थी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात ८० केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी घेण्यात आली. ५ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेत इयत्ता पाचवी व आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले.जिल्हाभरातून शिष्यवृत्ती परीक्षेकरिता इयत्ता पाचवीच्या ३ हजार २५७ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता. यापैकी ३ हजार १२८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले. याची टक्केवारी ९६.०३ एवढी आहे. इयत्ता आठवीच्या २ हजार ८६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज सादर केला होता. परंतु २ हजार ७२१ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. याची टक्केवारी ९४.९४ एवढी आहे. गडचिरोली शहरात स्कूल आॅफ स्कॉलर्स, कारमेल स्कूल, वसंत विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, राणी दुर्गावती विद्यालय, शिवाजी हायस्कूल आदी शाळांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आले. जिल्हाभरात विविध ठिकाणी तालुकास्तरावर परीक्षा घेण्यात आली.आरमोरी - येथील महात्मा गांधी विद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तसेच तालुक्यात महात्मा फुले विद्यालय देऊळगाव, किसान विद्यालय वडधा, विवेकानंद विद्यालय मानापूर, हितकारणी विद्यालय आरमोरी, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी, शिवानी विद्यालय वडधा, महाराष्ट्र विद्यालय वैरागड अशा एकूण दहा केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता पाचवीचे ३२२ पैकी ३१७ व इयत्ता आठवीचे ३१९ पैकी ३१३ असे एकूण ६३० विद्यार्थी सहभागी झाले. गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांच्या नियंत्रणात परीक्षा गटसमन्वयक शिक्षण विस्तार अधिकारी गुलाबसिंग राठोड यांनी काम पाहिले.अहेरी - धर्मराव कृषी विद्यालय व भगवंतराव हायस्कूल या दोन केंद्रावर घेण्यात आली. धर्मराव कृषी विद्यालयातील केंद्रावर इयत्ता पाचवीचे एकूण २०८ पैैकी १८८ व इयत्ता आठवीचे ११६ पैैकी ११२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. भगवंतराव हायस्कूलच्या केंद्रावर इयत्ता पाचवीचे एकूण १०४ पैैकी १०१ तर इयत्ता आठवीचे ११६ पैकी १०९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. दोन्ही केंद्रावर एकूण ४०६ विद्यार्थी सहभागी झाले. तर ३० विद्यार्थी अनुपस्थित होते. बीईओ निर्मला वैद्य यांच्या मार्गदर्शनात केंद्र संचालक म्हणून सुषमा खराबे, गर्गम, राजू नागरे, आत्राम यांनी काम पाहिले.