शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

यावर्षी ५३ लाख वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:14 AM

राज्य शासनाने १ ते ३१ जुलै या कालावधील राज्यभरात १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले. त्यात गडचिरोली जिल्ह्यात वन विभाग व इतर यंत्रणांना सुमारे ५० लाख ७३ हजार वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

जुलै महिन्यात लावणार रोपटे : शासनाकडून वन विकास महामंडळाला सर्वाधिक उद्दिष्टलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाने १ ते ३१ जुलै या कालावधील राज्यभरात १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले. त्यात गडचिरोली जिल्ह्यात वन विभाग व इतर यंत्रणांना सुमारे ५० लाख ७३ हजार वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार ५१ लाख ९५ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन असून तेवढी वृक्ष लागवड होणार आहे.वाढती लोकसंख्या, उद्योग, शेतीचा विस्तार, सिंचन व इतर प्रकल्प यामुळे मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. जंगल तोडीमुळे जगाला तापमानातील वाढ, हवामानात बदल व ऋतू बदलाचे परिणाम आताच दिसायला लागले आहेत. हे सर्व दृष्परिणाम टाळण्यासाठी राज्य शासनाने २०१७ ते २०१९ या कालावधीत ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी ४ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावर्षी १३ कोटी तर पुढील वर्षी ३३ कोटी वृक्षांची राज्यभरात लागवड होणार आहे.वृक्ष लागवड व त्यांची जोपासणा करण्याची यंत्रणा वनविभागाकडे असल्याने वृक्ष लागवडीचे नियोजन करण्याचे काम वन विभागाकडे सोपविण्यात आले आहे. यावर्षी गडचिरोली वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग व एफडीसीएम ४५ लाख ४ हजार वृक्षांची लागवड करणार आहे. इतर विभाग १ लाख ९१ हजार व ग्रामपंचायती ५ लाख वृक्षांची लागवड करणार आहेत. प्रत्येक ग्रा.पं.ला १ हजार ९९१ वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.एफ डीसीएम १४ लाख ७८ हजार वृक्षांची लागवड करणार आहे. यामध्ये १४ लाख सागाची रोपटे तर २१ हजार बांबू वृक्षांचा समावेश आहे. मागील वर्षी १ ते ७ जुलै या कालावधीतच वृक्ष लागवड करायची होती. यावर्षी मात्र गतवर्षी पेक्षा उद्दिष्ट वाढल्याने वृक्ष लागवडीचा कालावधीसुद्धा वाढवून देण्यात आला आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत वृक्ष लागवड करता येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी आता केवळ एक महिण्याचा कालावधी शिल्लक असल्याने वन विभागासह इतर विभागांनी खड्डे खोदून वृक्ष लावण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात वन विभागाची सर्वाधिक जमीन असल्याने वक्ष लागवडीचे सर्वाधिक लक्ष्य गडचिरोली जिल्हा वन विभागाला दिले आहे. २०१६ मध्ये दोन कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणारे महाराष्टÑ हे देशातील पहिले राज्य ठरल्याने या उपक्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. अशा प्रकारचा उपक्रम इतरही राज्यांनी राबवावा असा सल्लाही दिला. त्याचबरोबर या उपक्रमाची लिम्का बूक आॅफ रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद होऊन राज्य शासनास प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते.

वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती गरजेचीवातावरणातील बदलामुळे वृक्षांचे महत्त्व नागरिकांना कळायला लागले आहे. त्यामुळे राज्यशासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत व इतरही सामाजिक उपक्रमांच्यावेळी वृक्ष लागवड केली जात आहे. हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र लावलेल्या रोपट्याकडे दुसऱ्याच क्षणी दुर्लक्ष केले जाते ही अतीशय चिंतेची बाब आहे. रोपट्याची लागवड केल्यानंतर पावसात काही दिवसांचा खंड पडला तर त्याला पाणी देणे आवश्यक आहे. तसेच कठडा लावून त्याचे जनावरांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. मात्र असे होताना दिसत नाही. त्यामुळे लावलेला रोपटा जनावरांकडून दुसºयाच दिवशी फस्त केला जातो.रोपटे जगण्यासाठी उन्हाळ्यात पाणी देणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड योजनेंतर्गत पाणी देण्याची आर्थिक तरतूद नसल्याचे कारण पुढे करून विविध विभाग पाण्याची व्यवस्था करीत नाही. त्यामुळे हिवाळ्यापर्यंत जगलेले झाड उन्हाळ्यात करपते. दुसºयावर्षी पुन्हा त्याच खड्ड्यात रोपटे लावून शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले जाते. आघाडी शासनाच्या कालावधीपासून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जात आहे. तेव्हापासून लावलेले किमान २५ टक्केही वृक्ष जगले असते तर राज्यातील संपूर्ण रस्ते व शिवार हिरवेगार झाले असते. हा सर्व अनुभव लक्षात घेता वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संवर्धनाबाबतही जनजागृतीची गरज आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग