शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

आरमाेरीत 52 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:01 IST

मतदानाला आता १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामविकासाचा महत्त्वाचा कणा म्हणून ग्रामपंचायतकडे बघितले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्येसुद्धा पॅनल लढविले जात आहेत. अनेक पॅनल राजकीय पक्षांचे आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षापेक्षा उमेदवार बघून मतदान केले जात हाेते.

ठळक मुद्दे१५ ला निवडणूक : पॅनलमुळे ग्रामपंचायतीसाठी रंगत वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कआरमाेरी : तालुक्यात २९ ग्रामपंचायतींच्या २६३ जागांसाठी मतदान हाेणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण ५२ हजार ६०४ मतदार आहेत. ९४ मतदान केंद्रांवरून मतदान हाेणार आहे. आरमाेरी तालुक्यात ३० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला हाेता. मात्र, नरचुली ग्रामपंचायतीचे विभाजन हाेऊन जांभळी ही नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात येणार असल्याने नरचुली ग्रामपंचायतीची निवडणूक आयाेगाने रद्द केली आहे. त्यामुळे आता १५ जानेवारीला २९ ग्रामपंचायतींच्या २६३ जागांसाठी मतदान हाेणार आहे. १४६ जागा महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मतदानाला आता १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामविकासाचा महत्त्वाचा कणा म्हणून ग्रामपंचायतकडे बघितले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्येसुद्धा पॅनल लढविले जात आहेत. अनेक पॅनल राजकीय पक्षांचे आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षापेक्षा उमेदवार बघून मतदान केले जात हाेते. मात्र, गावातील गटांनी पॅनल तयार केले असल्याने गावातही राजकीय पक्षांचा प्रवेश झाला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत पुरुषांपेक्षा महिला सदस्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे राजकारण महिलांच्या भाेवती फिरणार आहे. आजपर्यंतच्या अनेक महिलांनी ग्रामपंचायत सक्षमरीत्या सांभाळल्या आहेत. शेतीची कामे जवळपास संपली असल्याने ग्रामीण भागातील मतदार पूर्णवेळ ग्रामपंचायतीच्या राजकारणात लक्ष घालत आहेत. 

प्रशासन सज्ज२९ ग्रामपंचायतींमध्ये काही ग्रामपंचायती माेठ्या आहेत. अशा ग्रामपंचायतींमध्ये दाेन ते तीन मतदान केंद्र ठेवण्यात आले आहेत. तालुकाभरात एकूण ९४ मतदान केंद्र आहेत. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. एकूण ५२ हजार ६०४ मतदार आहेत. त्यामध्ये २६ हजार १४२ महिला व २६ हजार ४६२ पुरुष मतदारांची संख्या आहे. यामध्ये जवळपास १० टक्के नवीन मतदार आहेत. हे नवीन मतदार तरुण उमेदवारालाच पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे नवीन मतदारांचेही मत अतिशय महत्त्वाचे ठरणारे आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक