लाेकमत न्यूज नेटवर्क
धानाेरा : मुदत संपलेल्या ४४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम घाेषित करण्यात आला. यातील १२ ग्रामपंचायतींमध्ये अविराेध निवडणूक झाली दाेन ग्रामपंचातीमध्ये नामांकनच प्राप्त झाले नाही. त्यामुळे आता ३० ग्रामपंचायतीमध्ये २०० जागांसाठी निवडणूक हाेत आहे. या निवडणुकीत एकूण ४९५ उमेदवार रिंगणात आहेत.
४४ ग्रामपंचायतीमध्ये ३३४ सदस्यांकरीता निवडणूक कार्यक्रम घाेषित झाला हाेता. यामध्ये सात सदस्यीय ३२ ग्रामंचायती, ९ सदस्य असलेल्या ११ ग्रामपंचायती तर ११ सदस्य असलेली एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. १८९ महिला व १४५ पुरूष मतदार निवडून दिले जाणार हाेते. परंतु कुलभटी व कटेझरी नंबर २ या सात सदस्यीय ग्रामपंचायतीसाठी एकही नामांकन दाखल झाले नाही. हेटी, कामनगड, रेखाटाेला, कुथेगाव, दराची, देवसूर, गिराेला, काेंदावाही, निमगाव, सावंगा बुज, माेहगाव, चिचाेडा या १२ ग्रामपंचायतींची निवडणूक अविराेध झाली. आता मात्र ३० ग्रामपंचायतमध्ये २०० जागांसाठी मतदान हाेणार आहे. एकूण ४९५ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यात १४ हजार २०८ महिला व १४ हजार ४८९ पुरूष मतदार आहेत.
चिचाेडा व महागाव या सात सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये एकच नामांकन दाखल झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासक कायम राहणार आहे. सावंगा बुज, कुथेगाव, दराची या ठिकाणी प्रत्येकी पाच नामांकन दाखल झाले आहेत. रेखाटाेला, गिराेला, कामनगड या सात सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये प्रत्येकी सहा जागा अविराेध निवडून आले आहेत. मुस्का येथे ९ जागांसाठी १० नामांकन आल्याने एका जागेवर निवडणूक हाेईल. निमगाव व तुकूम येथे प्रत्येकी सात जागांकरीता प्रत्येकी तीन नामांकन प्राप्त झाले आहेत. त्यामुळे चार जागांसाठी मतदान हाेणार आहे.