शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

१७ वर्षात दगावले ४७९ एचआयव्ही रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

जिल्ह्यात ३० जानेवारी २००२ ला पहिल्यांदा आयसीटीसी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामार्फत एचआयव्ही एड्स आजाराविषयी जनजागृती तसेच शासकीय रूग्णालयात तपासणी मार्गदर्शन व औषधोपचार पूर्णपणे मोफत केला जात आहे. याशिवाय रूग्णांना विनामूल्य माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता १०९७ टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । १ हजार ५४६ आजारग्रस्तांची नोंद; १ हजार ६७ रूग्णांवर सुरळीत उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अतिशय गंभीर रोग म्हणून ओळख असलेल्या एचआयव्ही एड्सचे जिल्ह्यात व जिल्हाबाहेरून गेल्या १७ वर्षात १ हजार ५४६ रूग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ४७९ रूग्ण या आजारामुळे दगावले आहेत. तर १ हजार ६७ रूग्ण एआरटी औषधोपचार सुरळीत घेत आहेत.जिल्ह्यात ३० जानेवारी २००२ ला पहिल्यांदा आयसीटीसी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामार्फत एचआयव्ही एड्स आजाराविषयी जनजागृती तसेच शासकीय रूग्णालयात तपासणी मार्गदर्शन व औषधोपचार पूर्णपणे मोफत केला जात आहे. याशिवाय रूग्णांना विनामूल्य माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता १०९७ टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचा फायदा एचआयव्ही रूग्णांसह शंकांचे निरसन करणाऱ्या व्यक्तींना होत आहे. त्यामुळे समाजात एचआयव्ही एड्स निर्मूलनाविषयी मानसिकता तयार होऊन जागृतीही होत आहे.एमडीआर पद्धतीमुळे बाळांना आजारापासून दूर ठेवता येतेएचआयव्ही एड्स असुरक्षित लैैंगिक संबंध, एचआयव्ही संसर्गित रक्त, संसर्गित इंजेक्शन, सुई व अन्य उपकरणे तसेच एचआयव्ही संसर्गित गरोदर मातेकडून तिच्या बाळाला होतो. या चार कारणांमुळे एड्स होण्याची शक्यता असते. बाळांपर्यंत एड्सचा प्रसार थांबविल्या जाऊ शकतो. यासाठी एमडीआर ही नवीन उपचार पद्धती आली आहे. पालकांकडून शिशूकडे प्रसार प्रतिबंधक उपाय असे या पद्धतीचे नाव आहे. प्रतिबंधासाठी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यासाठी रूग्णालयातील आयसीटीसी केंद्राशी संपर्क साधून तेथील समुपदेशकांचा सल्ला घ्यावा. सर्व सरकारी रूग्णालयात प्रसूतीपूर्व चिकित्सा विभागातील आयसीटीसी केंद्रात ही सेवा उपलब्ध आहे. येथे उपचार घेतल्यास बाळांना एचआयव्ही संसर्गापासून दूर ठेवता येऊ शकते.नैतिक मूल्यांचे महत्त्व अधिकजीवनात नैतिक मूल्यांना अधिक महत्त्व आहे. समाजाला व विशेषत: तरूणांना एचआयव्हीची लागण होऊ नये, यासाठी शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये शिस्त, नैतिक मूल्य जोपासण्याचे संस्कार तरूण अवस्थेतील हालचालींकडे लक्ष म्हणून मित्र संगतीकडे लक्ष द्यावे. तसेच वडिलांनी मुलांचे मित्र बनून वागावे. नैतिक मूल्य ढासळणार नाही यासाठी मुलांवर योग्य संस्कार करून त्यांना वेळोवळी मार्गदर्शन केल्यास संस्कारक्षम पिढी निर्माण होईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स