शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

१७ वर्षात दगावले ४७९ एचआयव्ही रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

जिल्ह्यात ३० जानेवारी २००२ ला पहिल्यांदा आयसीटीसी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामार्फत एचआयव्ही एड्स आजाराविषयी जनजागृती तसेच शासकीय रूग्णालयात तपासणी मार्गदर्शन व औषधोपचार पूर्णपणे मोफत केला जात आहे. याशिवाय रूग्णांना विनामूल्य माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता १०९७ टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । १ हजार ५४६ आजारग्रस्तांची नोंद; १ हजार ६७ रूग्णांवर सुरळीत उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अतिशय गंभीर रोग म्हणून ओळख असलेल्या एचआयव्ही एड्सचे जिल्ह्यात व जिल्हाबाहेरून गेल्या १७ वर्षात १ हजार ५४६ रूग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ४७९ रूग्ण या आजारामुळे दगावले आहेत. तर १ हजार ६७ रूग्ण एआरटी औषधोपचार सुरळीत घेत आहेत.जिल्ह्यात ३० जानेवारी २००२ ला पहिल्यांदा आयसीटीसी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामार्फत एचआयव्ही एड्स आजाराविषयी जनजागृती तसेच शासकीय रूग्णालयात तपासणी मार्गदर्शन व औषधोपचार पूर्णपणे मोफत केला जात आहे. याशिवाय रूग्णांना विनामूल्य माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता १०९७ टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचा फायदा एचआयव्ही रूग्णांसह शंकांचे निरसन करणाऱ्या व्यक्तींना होत आहे. त्यामुळे समाजात एचआयव्ही एड्स निर्मूलनाविषयी मानसिकता तयार होऊन जागृतीही होत आहे.एमडीआर पद्धतीमुळे बाळांना आजारापासून दूर ठेवता येतेएचआयव्ही एड्स असुरक्षित लैैंगिक संबंध, एचआयव्ही संसर्गित रक्त, संसर्गित इंजेक्शन, सुई व अन्य उपकरणे तसेच एचआयव्ही संसर्गित गरोदर मातेकडून तिच्या बाळाला होतो. या चार कारणांमुळे एड्स होण्याची शक्यता असते. बाळांपर्यंत एड्सचा प्रसार थांबविल्या जाऊ शकतो. यासाठी एमडीआर ही नवीन उपचार पद्धती आली आहे. पालकांकडून शिशूकडे प्रसार प्रतिबंधक उपाय असे या पद्धतीचे नाव आहे. प्रतिबंधासाठी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यासाठी रूग्णालयातील आयसीटीसी केंद्राशी संपर्क साधून तेथील समुपदेशकांचा सल्ला घ्यावा. सर्व सरकारी रूग्णालयात प्रसूतीपूर्व चिकित्सा विभागातील आयसीटीसी केंद्रात ही सेवा उपलब्ध आहे. येथे उपचार घेतल्यास बाळांना एचआयव्ही संसर्गापासून दूर ठेवता येऊ शकते.नैतिक मूल्यांचे महत्त्व अधिकजीवनात नैतिक मूल्यांना अधिक महत्त्व आहे. समाजाला व विशेषत: तरूणांना एचआयव्हीची लागण होऊ नये, यासाठी शालेय जीवनापासूनच मुलांमध्ये शिस्त, नैतिक मूल्य जोपासण्याचे संस्कार तरूण अवस्थेतील हालचालींकडे लक्ष म्हणून मित्र संगतीकडे लक्ष द्यावे. तसेच वडिलांनी मुलांचे मित्र बनून वागावे. नैतिक मूल्य ढासळणार नाही यासाठी मुलांवर योग्य संस्कार करून त्यांना वेळोवळी मार्गदर्शन केल्यास संस्कारक्षम पिढी निर्माण होईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स