शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी निविष्ठांचे ४१ नमुने आढळले अप्रमाणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 06:00 IST

खते, बियाणे व कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाचा परवाना आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात बियाणे विक्रीची ४२५, खत विक्रीची ६६२ व कीटकनाशक विक्रीची ३३६ दुकाने आहेत. निकृष्ठ दर्जाच्या बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा करून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत काही नमुने तपासले जातात. मागील वर्षीच्या खरीप हंगामात बियाणांचे ४६० नमुने तपासण्यात आले.

ठळक मुद्दे२७ प्रकरणे न्यायालयात : ९५८ नमुने तपासले, निकृष्ट बियाणे, खत विक्रीला प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाने वर्षभरात रासायनिक खते, कीटकनाशके व बियाणांचे ९५८ नमुने तपासले असता त्यातील ४१ नमुने अप्रमाणित असल्याचे आढळून आले आहे.खते, बियाणे व कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाचा परवाना आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात बियाणे विक्रीची ४२५, खत विक्रीची ६६२ व कीटकनाशक विक्रीची ३३६ दुकाने आहेत. निकृष्ठ दर्जाच्या बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा करून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत काही नमुने तपासले जातात. मागील वर्षीच्या खरीप हंगामात बियाणांचे ४६० नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ६ नमुने अप्रमाणित आढळून आले. त्यापैकी ५ नमुन्यांविरोधात न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे, तर १ नमुना ताकीदीस पात्र ठरला आहे. रासायनिक खताचे ३९८ नमुने घेतले असता ३१ नमुने अप्रमाणित आढळले.९ नमुने ताकीद पात्र तर २२ नमुने कोर्ट केस पात्र ठरले आहेत. कीटकनाशकांचे ९२ नमुने घेतले असता ४ नमुने अप्रमाणित आढळले आहेत.कधीकधी बियाणे व खतांची मागणी एकावेळेस वाढते. अशावेळी काही दुकानदार शेतकऱ्यांच्या निरक्षरतेचा गैरफायदा उठवत ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अधिक दराने खत व बियाणांची विक्री करतात. याचा मोठा फटका शेतकºयाला बसते. याप्रकारांवर आळा घालण्यासाठी कृषी विभागाने १३ भरारी पथकांची निर्मिती केली आहे. प्रत्येक पथकाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच कृषी निविष्ठांबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. अनेक कृषी केंद्र चालक शेतकºयांची फसवणूक करतात. शेतकºयांनी तक्रार केल्यानंतर संबंधित कृषी केंद्र चालकाची चौकशी होणे गरजेचे आहे.बनावट बिलांवर बियाणांची विक्रीकोणत्याही दुकानदाराने माल खरेदीचे ओरिजनल बिल देणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश बियाणे दुकानदार शेतकºयांना ड्युप्लीकेट बिल देतात. बियाणांच्या पॉकेटवर अतिशय जास्त प्रमाणात किमंत लिहीली राहते. त्यापैकी थोड्या कमी किमंतीला बियाणे विकले जाते. शेतकरी निघून गेल्यानंतर त्याच्याच नावाने ओरीजनल बिल बनविले जाते त्यात सदर बियाणांची किमंत आणखी कमी दाखविली जाते. हा प्रकार सर्रास चालत असला तरी आजपर्यंत या प्रकरणी एकाही दुकानावर कारवाई करण्यात आली नाही, हे विशेष. भरारी पथकाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र