शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कृषी निविष्ठांचे ४१ नमुने आढळले अप्रमाणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 06:00 IST

खते, बियाणे व कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाचा परवाना आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात बियाणे विक्रीची ४२५, खत विक्रीची ६६२ व कीटकनाशक विक्रीची ३३६ दुकाने आहेत. निकृष्ठ दर्जाच्या बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा करून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत काही नमुने तपासले जातात. मागील वर्षीच्या खरीप हंगामात बियाणांचे ४६० नमुने तपासण्यात आले.

ठळक मुद्दे२७ प्रकरणे न्यायालयात : ९५८ नमुने तपासले, निकृष्ट बियाणे, खत विक्रीला प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाने वर्षभरात रासायनिक खते, कीटकनाशके व बियाणांचे ९५८ नमुने तपासले असता त्यातील ४१ नमुने अप्रमाणित असल्याचे आढळून आले आहे.खते, बियाणे व कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाचा परवाना आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात बियाणे विक्रीची ४२५, खत विक्रीची ६६२ व कीटकनाशक विक्रीची ३३६ दुकाने आहेत. निकृष्ठ दर्जाच्या बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा करून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत काही नमुने तपासले जातात. मागील वर्षीच्या खरीप हंगामात बियाणांचे ४६० नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ६ नमुने अप्रमाणित आढळून आले. त्यापैकी ५ नमुन्यांविरोधात न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे, तर १ नमुना ताकीदीस पात्र ठरला आहे. रासायनिक खताचे ३९८ नमुने घेतले असता ३१ नमुने अप्रमाणित आढळले.९ नमुने ताकीद पात्र तर २२ नमुने कोर्ट केस पात्र ठरले आहेत. कीटकनाशकांचे ९२ नमुने घेतले असता ४ नमुने अप्रमाणित आढळले आहेत.कधीकधी बियाणे व खतांची मागणी एकावेळेस वाढते. अशावेळी काही दुकानदार शेतकऱ्यांच्या निरक्षरतेचा गैरफायदा उठवत ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अधिक दराने खत व बियाणांची विक्री करतात. याचा मोठा फटका शेतकºयाला बसते. याप्रकारांवर आळा घालण्यासाठी कृषी विभागाने १३ भरारी पथकांची निर्मिती केली आहे. प्रत्येक पथकाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच कृषी निविष्ठांबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. अनेक कृषी केंद्र चालक शेतकºयांची फसवणूक करतात. शेतकºयांनी तक्रार केल्यानंतर संबंधित कृषी केंद्र चालकाची चौकशी होणे गरजेचे आहे.बनावट बिलांवर बियाणांची विक्रीकोणत्याही दुकानदाराने माल खरेदीचे ओरिजनल बिल देणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश बियाणे दुकानदार शेतकºयांना ड्युप्लीकेट बिल देतात. बियाणांच्या पॉकेटवर अतिशय जास्त प्रमाणात किमंत लिहीली राहते. त्यापैकी थोड्या कमी किमंतीला बियाणे विकले जाते. शेतकरी निघून गेल्यानंतर त्याच्याच नावाने ओरीजनल बिल बनविले जाते त्यात सदर बियाणांची किमंत आणखी कमी दाखविली जाते. हा प्रकार सर्रास चालत असला तरी आजपर्यंत या प्रकरणी एकाही दुकानावर कारवाई करण्यात आली नाही, हे विशेष. भरारी पथकाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र