शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

४० टक्के महिला निरक्षर

By admin | Updated: September 9, 2014 23:30 IST

नागरिकांना साक्षर करण्यासाठी शासनाकडून व स्वयंसेवी संस्थाकडून विविध उपक्रम आजपर्यंत राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के महिला निरक्षर असल्याचे प्रशासनाकडे असलेल्या

गडचिरोली : नागरिकांना साक्षर करण्यासाठी शासनाकडून व स्वयंसेवी संस्थाकडून विविध उपक्रम आजपर्यंत राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के महिला निरक्षर असल्याचे प्रशासनाकडे असलेल्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. पुरूषांच्या साक्षरतेचे प्रमाणसुद्धा फारसे समाधानकारक नसून जिल्ह्यात सुमारे २० टक्के नागरिक निरक्षर आहेत.शिक्षणाशिवाय देशाचा विकास होणार नाही, ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरकारने प्रत्येक बालकाला शिक्षण मिळेल याची व्यवस्था केली. ‘गाव तिथे शाळा’ सुरू केली. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शिष्यवृत्ती, मध्यान्ह भोजन, मोफत गणवेश, पुस्तके आदी सवलती सुरू केल्या. याचा सकारात्मक परिणाम मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. जे नागरिक वयस्क आहेत, अशा नागरिकांसाठी शासनामार्फत निरंतर प्रौढ शिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. या वर्गातून हजारो नागरिक साक्षर झाले आहेत. तरीही १०० टक्के नागरिकांना साक्षर करण्यात अजूनपर्यंत यश प्राप्त झालेले नाही. २०११ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १० लाख ७२ हजार ९४२ एवढी आहे. यामध्ये पुरूषांची लोकसंख्या ५ लाख ४१ हजार ३२८ तर महिलांची लोकसंख्या ५ लाख ३१ हजार ६१४ एवढी आहे. पुरूषांच्या साक्षरतेचे प्रमाण ८०.०२ टक्के तर महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण केवळ ६०.०७ टक्के एवढे आहे. तालुकानिहाय साक्षरतेमध्ये देसाईगंज तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये ८९.७१ टक्के पुरूष तर ७१.६९ टक्के महिला साक्षर आहेत. सर्वाधिक कमी साक्षरता भामरागड तालुक्यात आहे. यामध्ये ५३.५७ टक्के पुरूष तर ३४.४९ टक्के महिला साक्षर आहेत. गडचिरोली तालुक्यात एकूण साक्षरतेचे प्रमाण ७९.०१ टक्के एवढे आहे. यामध्ये ६९.७५ टक्के स्त्रिया व ८७.९२ टक्के पुरूषांचे प्रमाण आहे. आरमोरी तालुक्याची एकूण साक्षरता ७६.०३ टक्के एवढी आहे. यामध्ये पुरूषांचे प्रमाण ८६ टक्के तर महिलांचे प्रमाण ६५.८५ टक्के एवढे आहे. कुरखेडात ८८.३३ टक्के पुरूष साक्षर आहेत. तर ६९.०४ टक्के महिला साक्षर आहेत. कोरची तालुक्यात ८०.३८ टक्के पुरूष तर ५९.८९ टक्के महिला साक्षर आहेत. धानोरा तालुक्यात ७७.०७ टक्के पुरूष व ५५.५९ टक्के महिला साक्षर आहेत. चामोर्शी तालुक्यात ८२.०३ टक्के पुरूष तर ६१.६५ टक्के महिला साक्षर आहेत. मुलचेरा तालुक्यात ८४.७८ टक्के पुरूष तर ६५.८२ टक्के महिला साक्षर आहेत. अहेरी तालुक्यात ७४.३८ टक्के पुरूष तर महिलांचे साक्षरतेचे प्रमाण ५५.९२ टक्के एवढे आहे. एटापल्ली तालुक्यात पुरूष साक्षरतेचे प्रमाण ६८.०५ टक्के तर महिलांचे प्रमाण ४९.३६ टक्के एवढे आहे. सिरोंचा तालुक्यात ६७.७८ टक्के पुरूष तर ४६.२३ टक्के महिला साक्षर आहेत. जिल्ह्यात महिला व पुरूषांच्या एकूण साक्षरतेचे प्रमाण केवळ ७०.०६ टक्के एवढे आहे. एक पुरूष सुशिक्षीत झाला तर त्याचा फायदा केवळ त्यालाच होतो. मात्र महिला साक्षर झाली तर त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो. मात्र समाजातील चुकीच्या चालीरितीमुळे मुलींना शाळेत पाठविले जात नाही. त्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण सुमारे २० टक्क्यांनी कमी आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. शासनाने मुलींच्या शिक्षणाला विशेष प्राधान्य देत त्यांच्यासाठी मोफत बससेवा, मोफत प्रवेश, सायकल वाटप यासारख्या उपाययोजना योजल्या आहेत. तरीही मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)