शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

३४४ कामांवर चार कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 10:26 PM

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाची विविध कामे केली जातात. विशेष म्हणजे, ही कामे मजुरांमार्फत केली जात असल्याने य कामातून जिल्ह्यातील हजारो मजुरांना रोजगार मिळत असतो.

ठळक मुद्देहजारो मजुरांना रोजगार प्राप्त : रोजगार हमी योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाची विविध कामे केली जातात. विशेष म्हणजे, ही कामे मजुरांमार्फत केली जात असल्याने य कामातून जिल्ह्यातील हजारो मजुरांना रोजगार मिळत असतो. रोहयो अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या विविध कामांवर एकूण ४ कोटी ५४ लाख ९२ हजार रुपयांचा खर्च झाला आहे.जिल्हा परिषदेमध्ये नरेगा विभाग असून या विभागामार्फत मजुरांमार्फत भातखाचरे निर्मिती व पुनर्जीवन, बोडी नुतनीकरण, शेततळे, माती नाला बांध आदी कामे केली जातात. सन २०१४-१५ ते २०१८-१९ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाची ५०० वर कामे करण्यात आली आहे.सन २०१८-१९ या वर्षात शेततळ्यांची चार कामे करण्यात आली असून या कामांवर २.४७ लाख रुपयांचा खर्च झाला. बोडी दुरूस्तीची एकूण ११ कामे करण्यात आली असून यावर ७.८० लाख रुपयांचा खर्च झाला. एका मातीनाला बांध तयार करण्यासाठी १३ हजार रुपये खर्च करण्यात आला. तब्बल २६२ भातखाचऱ्याची कामे करण्यात आली. यावर ३८६.६२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. याशिवाय ६६ भातखाचºयाच्या पुनरूजीवनाचे काम करण्यात आले. यावर २७.९० लाख रुपये खर्च झाले. सन २०१८-१९ या वर्षभरात जलसंधारणाच्या एकूण ३४४ कामांवर एकूण ४ कोटी ५४ लाख ९२ हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.सन २०१७-१८ या वर्षात शेततळ्यांचे चार, बोडी दुरूस्तींची सहा, भातखाचºयाची ९१, एक माती नाला बांध व भातखाचरे दुरूस्तीची २९ अशा एकूण १३१ कामांवर १५१.६५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सन २०१६-१७, सन २०१५-१६ व सन २०१४-१५ या वर्षात सुध्दा शेततळे, बोडी दुरूस्ती आदीसह जलसंधारणाची विविध कामे रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आली.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने नरेगा विभागामार्फत दरवर्षी ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावर घेण्यात येणाऱ्या कामांचा कृती आराखडा तयार केला जातो. याला जिल्हा प्रशासन व शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर कामास सुरूवात केली जाते. सध्या तापमानाचा पारा वाढला असून तेंदू हंगाम सुरू असल्याने रोहयो कामावर मजुरांची अत्यल्प उपस्थिती आहे.नरेगा अंतर्गत वृक्ष लागवडही होणारजि.प. नरेगा विभागाच्या वतीने शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जातो. नरेगा विभागामार्फत गतवर्षी सुध्दा १०० वर रोपट्यांची लागवड करण्यात आली. यावर्षीच्या पावसाळ्यात शासनाकडून मिळालेल्या उद्दिष्टानुसार विविध जातीच्या रोपट्यांची लागवड करण्यात येणार आहे. दरम्यान यासाठी खड्डे खोदण्याचे काम करावे लागणार आहे. या कामातून शेकडो मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या योजनेमार्फत शासनाने प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसाचा रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी कायद्यान्वये दिली आहे.