शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी ३११ बोड्यांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:40 IST

धानाच्या पिकाला बोडीच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध होते. कमी जागेत बोडी तयार करता येणे शक्य असल्याने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून बोडी तयार करण्यासाठी अनुदान देण्याची मागणी केली जात होती.

ठळक मुद्देशेतकऱ्यांकडून मागणी : शेततळ्यापेक्षा उपयोगी; पूर्व विदर्भासाठी शासनाचा विशेष निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानाच्या पिकाला बोडीच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध होते. कमी जागेत बोडी तयार करता येणे शक्य असल्याने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून बोडी तयार करण्यासाठी अनुदान देण्याची मागणी केली जात होती. २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३११ बोड्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या बोड्यांच्या माध्यमातून एक हजार पेक्षा अधिक हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.भूजल पातळीत वाढ करण्याबरोबरच आकस्मिक स्थितीत पिकांना पाणी देता यावे, यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये धानाचे पीक घेतले जाते. या पिकासासाठी अगदी सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत सिंचनाची गरज भासते. ही गरज शेततळा पूर्ण करू शकत नाही. त्यासाठी मामा तलाव किंवा बोडी असणे आवश्यक आहे.त्यामुळे मागेल त्याला शेततळ्याच्या धर्तीवर मागेल त्याला बोडी देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांकडून शासनाकडे होत होती. त्यानुसार राज्य शासनाने ११ सप्टेंबर २०१६ रोजी मागेल त्याला बोडी ही योजना आहे. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याकरिता ४४० बोडी निर्माण करण्याचे लक्षांक प्राप्त झाले.३१ मार्च २०१९ पर्यंत शेतकऱ्यांकडून २ हजार ३४ आॅनलाईन अर्ज मिळाले. त्यापैकी १ हजार ३४४ लाभार्थ्यांनी सेवाशुल्क भरले. १ हजार ५२ लाभार्थी निकषानुसार पात्र झाले आहेत. त्यापैकी ५०६ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. ३११ बोडीची कामे पूर्ण सुध्दा झाली आहेत.१०० बोड्यांना ३२ लाख २२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. पुन्हा काही शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार असल्याने अनुदान प्राप्त शेतकऱ्यांची संख्या एक हजारच्या जवळपास पोहोचणार आहे.शेततळे कुचकामीराज्य शासनाने मोठा गवगवा करून मागेल त्याला शेततळे देण्याचा उपक्रम राबविला आहे. या अंतर्गत १०० टक्के अनुदान दिले जात असल्याने काही शेतकºयांनी आपल्या शेतात शेततळे खोदले आहे. मात्र या शेततळ्यात जेव्हा पाऊस पडते, तेव्हाच पाणी राहते. पाऊस गेल्यानंतर पाणी राहत नाही. म्हणजेच जेव्हा गरज आहे, तेव्हा शेततळा कोरडा पडून राहत असल्याचा अनेक शेतकºयांना अनुभव आला आहे. विशेष म्हणजे, शेततळ्यासाठी जवळपास १० आर. जमीन लागते. शेततळ्याचा खड्डा खोदल्यामुळे तेवढ्या भागावर पीक घेणे शक्य होत नाही. अनेक शेतकऱ्यांचे शेततळे निकामी झाले आहेत. हा अनुभव आता शेतकऱ्यांना हळूहळू येत असल्याने शेतकऱ्यांनी शेततळे खोदण्याकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.मामा तलावांची दुरूस्ती करागडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मामा तलाव आहेत. या तलावांच्या माध्यमातून धानाला सिंचन दिले जाते. मात्र शेकडो वर्षांपूर्वीच्या तलावांमध्ये आता गाळ साचला आहे. त्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. काही मामा तलावांच्या पाळी, पाट फुटले आहेत. त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी