शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

दुर्गम भागातही ‘३-जी’चे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 11:54 PM

ग्रामीण भागासह दुर्गम भागातही नेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध व्हावी, यासाठी बीएसएनएलच्या वतीने ३-जी यंत्रणा असलेले नवीन ९० टॉवर उभारले जाणार आहेत. आजपर्यंत टू-जी असलेले ११६ टॉवर थ्री-जीमध्ये बदलले जातील, अशी माहिती बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक एम. ए. जीवने यांनी दिली.

ठळक मुद्देसर्वच टॉवर होणार अपग्रेड : इंटरनेट कनेक्टिव्हीटी मिळण्यास होणार मदत, कामाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामीण भागासह दुर्गम भागातही नेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध व्हावी, यासाठी बीएसएनएलच्या वतीने ३-जी यंत्रणा असलेले नवीन ९० टॉवर उभारले जाणार आहेत. आजपर्यंत टू-जी असलेले ११६ टॉवर थ्री-जीमध्ये बदलले जातील, अशी माहिती बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक एम. ए. जीवने यांनी दिली.गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मोबाईल कंपन्यांना कमी उत्पन्न मिळत असल्याने खासगी कंपन्या सेवा देण्यास तयार होत नाही. बीएसएनएलने मात्र सामाजिक दायित्वाची जबाबदारी पार पाडत नागरिकांना सेवा देण्याच्या उद्देशाने नफा तोट्याचा विचार न करता ग्रामीण व दुर्गम भागात टॉवर उभारून सेवा देण्यास सुरूवात केली आहे.बीएसएनएलचे यापूर्वी जिल्हाभरात एकूण १४६ मोबाईल टॉवर आहेत. यापैकी केवळ ३० मोबाईल टॉवर थ्री-जी यंत्रणा असलेले होते. उर्वरित ११६ टॉवरवर टू-जी यंत्रणा लावण्यात आली होती. टू-जी यंत्रणा बोलण्यासाठी उपयोगात येते. मात्र इंटरनेटची स्पीड पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. दिवसेंदिवस ग्रामीण भागातील युवक व नागरिक सुध्दा स्मार्ट फोनचा वापर करीत चालला आहे. या युवा वर्गाला सेवा देण्याच्या उद्देशाने बीएसएनएलने संपूर्ण ११६ ही टॉवर थ्री-जीमध्ये बदलविण्याचा निर्णय घेतला असून यातील २८ टॉवरवर थ्री-जी यंत्रणा लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित टॉवरवर पुढील सहा महिन्यात थ्री-जी यंत्रणा बसविली जाईल, अशी माहिती दिली.गडचिरोली जिल्ह्यात नेट कनेक्टिव्हीटी व मोबाईलच्या जाळ्यांचा विस्तार करून विकासात हातभार लावण्याच्या उद्देशाने आणखी नव्याने ९० टॉवर मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला कनिष्ठ दूरसंचार अभियंता किशोर कापगते, हितेंद्र मेश्राम, उपमंडल अधिकारी राजेश आसटकर हजर होते.राज्यात सर्वाधिक उत्पन्न गडचिरोलीतूनजिल्ह्याच्या तुलनेत इतर जिल्हे प्रगत असल्याने त्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीच्या तुलनेत टॉवरची संख्या सुध्दा अधिक आहे. मात्र राज्यात बीएसएनएलला सर्वाधिक उत्पन्न गडचिरोली जिल्ह्यातून उपलब्ध होते. बीएसएनएलकडे तरूण कर्मचारी व अधिकाऱ्यांचे टीम कार्यरत असून सदर टीम एखाद्या टॉवरमध्ये बिघाड निर्माण झाल्यास तक्रार प्राप्त होताच काही तासाच्या आत बिघाड दुरूस्त करते, अशी माहिती जीवने यांनी दिली.या ठिकाणी होणार नवीन ९० मोबाईल टॉवरगडचिरोली तालुक्यातील गोगाव, बामणी, माडेतुकूम सावेला, गुरवडा, मारोडा, मौशीखांब, मुरमाडी, पुलखल, गडचिरोली येथील चामोर्शी रोड, एसपी आॅफीस, सेमाना मार्ग, विवेकानंद नगर, गणेश कॉलनी, आरमोरी रोड, पॉलिटेक्नीक कॉलेज, गोकुलनगर, गोंडवाना युनिर्व्हसीटी, रामपुरी कॅम्प एरिया, आयटीआय चौक, बट्टुवार कॉम्प्लेक्स या ठिकाणी टॉवर होतील.कुरखेडा तालुक्यातील पलसगड, नान्ही, जांभूळखेडा, श्रीरामनगर, भटेगाव, चांदगड, कोसरी, आंधळी, खोब्रामेंढा, मालेवाडा, खरकाडा, कराडी, चरवीदंड, दादापूर, उराडी येथे टॉवर होणार आहे.देसाईगंज तालुक्यातील पोटेगाव, विर्शी तुकूम, आमगाव, देसाईगंजमधील एसडीपीओ आॅफीस, कसारी तुकूम, कोकडी, कोंढाळा येथे टॉवर होईल.अहेरी तालुक्यातील आलापल्ली, एसबी कॉलेज अहेरी, देलमरी, अहेरी बसस्थानक, खमनचेरू या ठिकाणी टॉवर होईल.सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, सिरोंचा आठवडी बाजार येथे टॉवर होईल.चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी, आष्टी, मार्र्कंडादेव, मार्र्कंडा कंसोबा, नेताजी नगर, लक्ष्मणपूर, इल्लुर, बाबा नगर, अनखोडा, मुरखळा माल, सोनापूर, कुरूड, मक्केपल्ली माल, विक्रमपूर, जामगिरी येथे टॉवर होईल.एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली, जीवनगट्टा, पांडवाही येथे टॉवर होईल.मुलचेरा तालुक्यातील गोमणी, आलापल्ली माल, मोहुर्ली, कालिनगर, मुलचेरा तहसील कार्यालय टॉवर होणार आहे.कोरची तालुक्यातील कोरची येथील बाजारपेठ, कोहका, बोटेकसा येथे टॉवर होईल.आरमोरी तालुक्यातील आरमोरीय् येथील तहसील कार्यालय, वासाळा, कासवी, किटाळी, विहिरगाव, कुकडी, भाकरोंडी, कोसबी, मांगदा, पिसेवडधा येथे टॉवर होईल.धानोरा तालुक्यातील धानोरा येथे, खुटगाव, इरूपटोला, गिरोला या ठिकाणी टॉवर होणार आहे.