शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

घनदाट जंगलात २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान; छत्तीसगडच्या कांकेरमध्ये भीषण चकमक, महाराष्ट्रातही अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 08:23 IST

छत्तीसगडच्या कांकेरमध्ये भीषण चकमक; तीन जवान जखमी; शस्त्रसाठा केला जप्त 

कांकेर / गडचिरोली : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर मंगळवारी झालेल्या चकमकीत २९ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चकमकीत सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीपूर्वी ही घटना घडल्याने गडचिरोली पोलिसदेखील अलर्ट झाले आहेत.

नक्षलवाद्याचा गड समजल्या जाणाऱ्या अबुजमाड जंगलातील छत्तीसगडच्या छोटे बेठिया पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)  आणि राज्य पोलिसांच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी) यांनी नक्षलवाद्यांच्या शोधासाठी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. कांकेर जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी बीएसएफचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. यावेळी झालेल्या चकमकीत नक्षली कमांडर शंकर राव व ललिता ठार झाली आहे. 

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत मंगळवारी अनेक नक्षलवादी मारल्या गेले. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सर्व जवानांचे कौतुक करतो आणि जखमी जवानांची प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो. सरकारचे नक्षलविरोधी धोरण आणि सुरक्षा दलाच्या प्रयत्नातून लवकरच देश नक्षलमुक्त करण्यात येईल. - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

तीन जवान जखमीबीएसएफच्या जवानांसह तीन जवान चकमकीत जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे छत्तीसगड पोलिसांनी सांगितले. त्यापैकी एका जवानाच्या पायाला गोळी लागली असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.  

नक्षलग्रस्त कांकेर जिल्हाछत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा गड असलेला कांकेर परिसर हा बस्तर जिल्ह्याचा भाग होता. १९९८ मध्ये कांकेरला स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात आला.  मंगळवारी झालेली चकमक ही बिनागुंडा व कोरोनार गावादरम्यान दुपारी घडली. २०२४ वर्ष सुरू झाल्यापासूनचार महिन्यात आतापर्यंत  बस्तर परिसरात तब्बल ७९ नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला.

गडचिरोली पोलिस अलर्ट मोडवर- महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात गडचिरोली-चिमूरसाठी १९ एप्रिलला मतदान होत आहे. याअनुषंगाने १६ एप्रिललाच १५ हजारांहून अधिक सुरक्षा जवान तैनात झाले आहेत. दुर्गम, अतिदुर्गम भागात हेलिकॉप्टरने मतदान यंत्र व अधिकाऱ्यांना पोहोचविण्यात आले आहे.- मतदानाच्या तीन दिवस आधीच छत्तीसगड सीमेवर छत्तीसगड पोलिस व माओवाद्यांतील चकमकीनंतर २९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. नक्षलवाद्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.- या घटनेच्या अनुषंगाने ते पुन्हा खवळण्याची शक्यता लक्षात घेता, सुरक्षा यंत्रणा सजग झाली आहे. सीमावर्ती भागातील सर्व हालचालींवर नजर ठेवली जात असून, अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिस सज्ज आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

मृतांपैकी दोन नक्षल्यांवर २५ लाखांचे बक्षीस- चकमकीच्या ठिकाणी सुरुवातीला १८ व नंतर ११ मृतदेह सापडले, त्यामुळे एकूण २९ माओवादी ठार झाले.- घटनास्थळावरून आधुनिक रायफल, सात एके ४७ रायफल, ३ एलएमजी जप्त करण्यात आले आहेत. चकमकीत ठार झालेला शंकर राव याच्यावर २५ लाखांचे बक्षीस होते.- कांकेर जिल्ह्यातील चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.- गडचिरोलीपासून १९ किलोमीटर अंतरावर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे.

...अन् अचानक झाला गोळीबार - लोकसभा निवडणुकांच्या आधी नक्षलग्रस्त भागात सुरक्षा दलांनी अधिक कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. - या भागांमध्ये निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ही पावले उचलण्यात आली आहेत.- बीएसएफ आणि जिल्हा राखीव गार्ड यांची संयुक्त टीम नक्षलविरोधी अभियानासाठी जात असताना नक्षल्यांनी अचानक गोळीबार केला. प्रत्युत्तरात  जवानांनीही गोळीबार केला. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी