शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

बालिका विद्यालयातील २८ विद्यार्थिनी आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 01:19 IST

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील सुमारे २८ विद्यार्थिनी आजारी असल्याचे निदर्शनास आले आहे. चार मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजता व पाच विद्यार्थिनींना २ आॅक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देपालकांमध्ये खळबळ : नऊ विद्यार्थिनी गडचिरोलीत भरती

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील सुमारे २८ विद्यार्थिनी आजारी असल्याचे निदर्शनास आले आहे. चार मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजता व पाच विद्यार्थिनींना २ आॅक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन मुली धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात भरती आहेत. तर उर्वरित १७ मुलींवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी येथील विद्यार्थिनी सानिका बांबोळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.शाळेतील २८ विद्यार्थिनींना टायफाईड, डोकेदुखी, ताप, पोटदुखी, घसा दुखणे, मलेरिया हे आजार झाले असल्याचे आढळले आहे. आश्रमशाळेमध्ये असुविधा असलेल्याचे दिसून येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी प्रकृती बिघडल्याने पालक व शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे. वसतिगृहाची पाहणी केली असता, वसतिगृहात अस्वच्छता दिसून आली. परिसरातही अस्वच्छता पसरली आहे. पाण्याची टाकी फुटली आहे. शुध्द पाण्याकरिता लावलेला आरओ बंद स्थितीत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी १ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात जाऊन आजारी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी फवारणी करावी, असे निर्देश दिले. आरोग्य कर्मचाºयांनी विद्यालयात जाऊन ३७ विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. तसेच पाण्याचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. फवारणी सुध्दा करण्यात आली आहे. आरओ मशीन सुरू होईपर्यंत आरओच्या कॅनद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. संवर्ग विकास अधिकारी यशवंत भांड, गट शिक्षणाधिकारी सुधीर आखाडे, नगर पंचायतचे मुख्याधिकारी दामोधर भगत यांनी सुध्दा विद्यालयाला भेट देऊन स्थितीची पाहणी केली. या ठिकाणी स्वतंत्र आरोग्य पथक नेमावे, अशी मागणी होत आहे.मुलींची तब्येत बिघडण्याबाबत डॉ. देवेंद्र सावसाकडे यांना विचारणा केली असता, वातावरण बदल व दुषित पाण्यामुळे असा प्रकार घडू शकतो, अशी माहिती लोकमतशी बोलताना दिली.कर्मचाऱ्यांचा करार संपलाकस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकूण १५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १२ कर्मचाऱ्यांचा ३० सप्टेंबर रोजी करार संपला आहे. करार संपला असला तरी सदर कर्मचारी शाळेमध्ये येत आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीHealthआरोग्य