शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

बालिका विद्यालयातील २८ विद्यार्थिनी आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 01:19 IST

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील सुमारे २८ विद्यार्थिनी आजारी असल्याचे निदर्शनास आले आहे. चार मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजता व पाच विद्यार्थिनींना २ आॅक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देपालकांमध्ये खळबळ : नऊ विद्यार्थिनी गडचिरोलीत भरती

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील सुमारे २८ विद्यार्थिनी आजारी असल्याचे निदर्शनास आले आहे. चार मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजता व पाच विद्यार्थिनींना २ आॅक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन मुली धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात भरती आहेत. तर उर्वरित १७ मुलींवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी येथील विद्यार्थिनी सानिका बांबोळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.शाळेतील २८ विद्यार्थिनींना टायफाईड, डोकेदुखी, ताप, पोटदुखी, घसा दुखणे, मलेरिया हे आजार झाले असल्याचे आढळले आहे. आश्रमशाळेमध्ये असुविधा असलेल्याचे दिसून येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी प्रकृती बिघडल्याने पालक व शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे. वसतिगृहाची पाहणी केली असता, वसतिगृहात अस्वच्छता दिसून आली. परिसरातही अस्वच्छता पसरली आहे. पाण्याची टाकी फुटली आहे. शुध्द पाण्याकरिता लावलेला आरओ बंद स्थितीत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी १ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजता धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात जाऊन आजारी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी फवारणी करावी, असे निर्देश दिले. आरोग्य कर्मचाºयांनी विद्यालयात जाऊन ३७ विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. तसेच पाण्याचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. फवारणी सुध्दा करण्यात आली आहे. आरओ मशीन सुरू होईपर्यंत आरओच्या कॅनद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. संवर्ग विकास अधिकारी यशवंत भांड, गट शिक्षणाधिकारी सुधीर आखाडे, नगर पंचायतचे मुख्याधिकारी दामोधर भगत यांनी सुध्दा विद्यालयाला भेट देऊन स्थितीची पाहणी केली. या ठिकाणी स्वतंत्र आरोग्य पथक नेमावे, अशी मागणी होत आहे.मुलींची तब्येत बिघडण्याबाबत डॉ. देवेंद्र सावसाकडे यांना विचारणा केली असता, वातावरण बदल व दुषित पाण्यामुळे असा प्रकार घडू शकतो, अशी माहिती लोकमतशी बोलताना दिली.कर्मचाऱ्यांचा करार संपलाकस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकूण १५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १२ कर्मचाऱ्यांचा ३० सप्टेंबर रोजी करार संपला आहे. करार संपला असला तरी सदर कर्मचारी शाळेमध्ये येत आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीHealthआरोग्य