शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

२६ हजार शेतकरी मदतीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात परतीच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. राज्यपालांनी जाहीर केलेल्या निकषानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. ३३ टक्केपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या निकषानुसार गडचिरोली जिल्ह्यात १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्र मदतीस पात्र ठरले आहे.

ठळक मुद्दे१२.५ कोटींची मिळणार मदत : पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी ३ कोटी ४० लाखांचा निधी प्राप्त

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ऑक्टोबर महिन्यात झालेली अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील धान व कापूस पिकाचे नुकसान झाले. सर्वेक्षणानुसार २५ हजार ९३९ शेतकऱ्यांचे १६,७२२.१० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. नुकसानग्रस्त या २६ हजार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ८ हजार रुपयानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शासनाकडून गडचिरोली जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ३ कोटी ४० लाख ६७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदर निधी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदारांकडे बुधवारीच वळता करण्यात आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा करण्यात येणार आहे.दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात परतीच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. राज्यपालांनी जाहीर केलेल्या निकषानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. ३३ टक्केपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या निकषानुसार गडचिरोली जिल्ह्यात १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्र मदतीस पात्र ठरले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी व परतीच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पिकांना फटका बसला. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने थेट बांधावर जाऊन सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली. हे सर्वेक्षण जवळपास २० ते २५ दिवस चालले. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा गोषवारा तयार करण्यात आला.या अहवालानुसार शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यासाठी शासनाकडे १२ कोटी ४९ लाख १९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तेवढीच मदत शासनाकडून मिळणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला ३ कोटी ४० लाख ३७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. राज्यपालांनी जाहीर केलेल्या निकषानुसार फळबागांच्या नुकसानीसाठी प्रतीहेक्टरी १३ हजार व धान, कापूस व इतर पिकांसाठी प्रती हेक्टर ८ हजाराची मदत देय आहे. जिल्ह्याला प्राप्त झालेला निधी जवळपास २५ टक्के आहे. उर्वरित ७५ टक्के निधी प्राप्त होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.तूर्तास सरसकट मदत नाहीगडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसला. शेतकरी नुकसानीमुळे हैराण झाले. परिणामी पेरणी व रोवणी लांबली. त्यानंतरही शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली. त्यानंतर परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्यात कहर केला. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी व अपेक्षा शेतकऱ्यांची होती. मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना तुर्तास सरसकट मदत उपलब्ध झाली नाही. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणानुसार २५ हजार ९३९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.अतिवृष्टी व पावसामुळे १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्र बाधितऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. सर्वेक्षणानुसार एवढेच क्षेत्र बाधित झाल्याची नोंद आहे. तालुक्यात बाधित झालेल्या क्षेत्रानुसार नुकसानभरपाईचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर निधी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन ते तीन टप्प्यात मिळणार आहे. १२ कोटी ४९ लाख १९ हजार इतका निधी नुकसानभरपाईसाठी मिळणार असून पहिल्या टप्प्यात ३ कोटी ४० लाख ६७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती