शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

२६ हजार शेतकरी मदतीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात परतीच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. राज्यपालांनी जाहीर केलेल्या निकषानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. ३३ टक्केपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या निकषानुसार गडचिरोली जिल्ह्यात १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्र मदतीस पात्र ठरले आहे.

ठळक मुद्दे१२.५ कोटींची मिळणार मदत : पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी ३ कोटी ४० लाखांचा निधी प्राप्त

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ऑक्टोबर महिन्यात झालेली अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील धान व कापूस पिकाचे नुकसान झाले. सर्वेक्षणानुसार २५ हजार ९३९ शेतकऱ्यांचे १६,७२२.१० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. नुकसानग्रस्त या २६ हजार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ८ हजार रुपयानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शासनाकडून गडचिरोली जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ३ कोटी ४० लाख ६७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदर निधी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदारांकडे बुधवारीच वळता करण्यात आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा करण्यात येणार आहे.दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात परतीच्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. राज्यपालांनी जाहीर केलेल्या निकषानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. ३३ टक्केपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या निकषानुसार गडचिरोली जिल्ह्यात १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्र मदतीस पात्र ठरले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी व परतीच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पिकांना फटका बसला. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने थेट बांधावर जाऊन सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली. हे सर्वेक्षण जवळपास २० ते २५ दिवस चालले. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा गोषवारा तयार करण्यात आला.या अहवालानुसार शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यासाठी शासनाकडे १२ कोटी ४९ लाख १९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तेवढीच मदत शासनाकडून मिळणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला ३ कोटी ४० लाख ३७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. राज्यपालांनी जाहीर केलेल्या निकषानुसार फळबागांच्या नुकसानीसाठी प्रतीहेक्टरी १३ हजार व धान, कापूस व इतर पिकांसाठी प्रती हेक्टर ८ हजाराची मदत देय आहे. जिल्ह्याला प्राप्त झालेला निधी जवळपास २५ टक्के आहे. उर्वरित ७५ टक्के निधी प्राप्त होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.तूर्तास सरसकट मदत नाहीगडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसला. शेतकरी नुकसानीमुळे हैराण झाले. परिणामी पेरणी व रोवणी लांबली. त्यानंतरही शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली. त्यानंतर परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्यात कहर केला. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी व अपेक्षा शेतकऱ्यांची होती. मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना तुर्तास सरसकट मदत उपलब्ध झाली नाही. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणानुसार २५ हजार ९३९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.अतिवृष्टी व पावसामुळे १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्र बाधितऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६ हजार ७२२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. सर्वेक्षणानुसार एवढेच क्षेत्र बाधित झाल्याची नोंद आहे. तालुक्यात बाधित झालेल्या क्षेत्रानुसार नुकसानभरपाईचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर निधी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन ते तीन टप्प्यात मिळणार आहे. १२ कोटी ४९ लाख १९ हजार इतका निधी नुकसानभरपाईसाठी मिळणार असून पहिल्या टप्प्यात ३ कोटी ४० लाख ६७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती