शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दररोज २४ टन कचऱ्याची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

अर्ध्याअधिक रोगांचा प्रसार परिसरात असलेल्या दुर्गंधीमुळे होतो. त्यामुळे मानवी वस्तीत दुर्गंधी राहणार नाही यासाठी केंद्र व राज्य शासन विशेष आग्रही आहे. केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी प्रत्येक शहराला तसेच गावाला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. स्वच्छतेबाबत अजुनही नागरिकांमध्ये जनजागृती झालेली नाही.

ठळक मुद्देप्लास्टिकचे सर्वाधिक प्रमाण । गडचिरोलीतील डम्पिंग यार्डवर निर्माण झाले आहेत मोठमोठे ढीग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोलीकर दरदिवशी सुमारे २४ टन कचरा निर्माण करतात. सदर कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून खरपुंडी मार्गावर असलेल्या डम्पिंग यार्डवर नेऊन टाकला जातो. त्यामुळे डम्पिंग यार्डवर कचऱ्याचे मोठमोठे ढिग निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नसल्याने कचºयाची समस्या आणखी गंभीर झाली आहे. सोबतच त्याची परिसरात दुर्गंधी पसरत आहे.अर्ध्याअधिक रोगांचा प्रसार परिसरात असलेल्या दुर्गंधीमुळे होतो. त्यामुळे मानवी वस्तीत दुर्गंधी राहणार नाही यासाठी केंद्र व राज्य शासन विशेष आग्रही आहे. केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी प्रत्येक शहराला तसेच गावाला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. स्वच्छतेबाबत अजुनही नागरिकांमध्ये जनजागृती झालेली नाही.प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करताना काही प्रमाणात कचरा निर्माण करतात. कचरा निर्माण होणे ही स्वाभाविक बाब आहे. फळांची साल, भाजीपाला इत्यादीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या कचऱ्याला ओला कचरा संबोधले जाते. तर या कचराव्यतिरिक्त प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरातील एखादी वापराची वस्तू याला सुका कचरा म्हटले जाते. घरात निर्माण झालेला कचरा दोन वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये साठविणे आवश्यक आहे. मात्र असे होताना दिसत नाही.डम्पिंग यार्डवर सर्व कचरा एकत्र राहतो. त्यातून दुर्गंधी पसरत आहे. याच परिसरात एक शाळा असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांवर या दुर्गंधीमुळे प्रकृती बिघडण्याची वेळ आली आहे. जमा होणाऱ्या एकूण कचऱ्यामध्ये ५० टक्केपेक्षा अधिक कचरा प्लास्टिकचा राहतो. शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. तरीही सदर प्लास्टिक वापरले जात असल्याचा पुरावा येथे पहायला मिळतो. विशेष म्हणजे, एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. एक ते दोन वर्ष तर रंग सुध्दा जात नाही. त्यामुळे प्लास्टिकची समस्या गंभीर होणार आहे. शक्यतो प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन नगर परिषद व शासनामार्फत करण्यात येत असले तरी प्रत्येक व्यक्ती प्लास्टिकचा वापर करीत असल्याचे दिसून येते. एकूण कचऱ्यामध्ये ५० टक्केहून अधिक कचरा केवळ प्लास्टिकचा राहते. त्यामुळे डम्पिंग यार्डवर जिकडे तिकडे प्लास्टिकचे ढीग दिसून येतात.कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यकप्रत्येक घरात दोन कचराकुंड्या ठेवून ओला व सुका कचरा दोन वेगवेगळ्या कचराकुंड्यांमध्ये ठेवावा. मात्र असे वर्गीकरण नागरिक करीत नाही. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करता येते. तर सुक्या कचऱ्यावर वेगवेगळी प्रक्रिया करता येते. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी नगर परिषदेला लाखो रुपये खर्च करावे लागतात.ओला व सुका कचरा दोन वेगवेगळ्या डब्यांमध्ये टाकावा, या विषयी नगर परिषदेमार्फत जागृती केली आहे. तरीही नागरिक एकाच ठिकाणी कचरा गोळा करतात. कचºयाचे वर्गीकरण करणे ही अतिशय कष्टप्रद व खर्चीक बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करूनच तो घंटागाडीत टाकावा.- संजीव ओहोळ, मुख्याधिकारी, नगर परिषद गडचिरोली

टॅग्स :dumpingकचरा