शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

वाघ व बिबट्यांच्या हल्ल्यात २३० पाळीव जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला वनविभागामार्फत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे मनुष्य किंवा प्राण्यांची हानी झाल्यास त्याची नाेंद  वनविभाग ठेवते. वनविभागाकडे उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २३० पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. त्यांच्या मालकांना वनविभागामार्फत  २४ लाख रुपयांची मदत वितरित केली आहे. तर २ लाख रुपये अर्थसहाय्य देणे बाकी आहे. 

ठळक मुद्देनऊ महिन्यातील स्थिती : मागील दाेन वर्षात वाढली संख्या

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत वाघबिबट्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे २३० पाळीव जनावरे ठार झाली आहेत. सर्वाधिक हाणी देसाईगंज व गडचिराेली वनविभागाअंतर्गत झाली आहे. त्या प्राण्यांच्या मालकांना वनविभागाकडून २४ लाखांची मदत देण्यात आली.गडचिराेली जिल्ह्यात जवळपास ७८ टक्के भूभागावर जंगल असले तरी वाघांची संख्या अगदी नगण्य हाेती.  काही प्रमाणात बिबटे  आढळून येत हाेते. मात्र हे बिबटे  जंगलातच राहत असल्याने त्यांच्याकडून मानव किंवा पाळीव जनावरांवर  फार क्वचित प्रमाणात हल्ले हाेत हाेते. मात्र मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात वाघ व बिबट्यांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाेबा येथील अनेक वाघांनी सीमा ओलांडून गडचिराेली जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तसेच पूर्वीच्या तुलनेत बिबट्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. परिणामी या दाेन्ही हिंस्त्र प्राण्यांकडून मानव व पाळीव जनावरांवरील हल्ले वाढले आहेत.  वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला वनविभागामार्फत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे मनुष्य किंवा प्राण्यांची हानी झाल्यास त्याची नाेंद  वनविभाग ठेवते. वनविभागाकडे उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २३० पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. त्यांच्या मालकांना वनविभागामार्फत  २४ लाख रुपयांची मदत वितरित केली आहे. तर २ लाख रुपये अर्थसहाय्य देणे बाकी आहे. 

५२ नागरिक जखमीवाघ, बिबट, रानडुकर, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात जानेेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे ५२ नागरिक जखमी झाले आहेत. यातही गडचिराेली व देसाईगंज वनविभागात हल्ल्यांचे प्रमाण अधिक आहे. मागील दाेन वर्षात गडचिराेली जिल्ह्यात वाघ व बिबट्यांची संख्या वाढली आहे. वाघ व बिबटे गावाजवळ तसेच गावातही प्रवेश करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांनी अनेकवेळा गावांमध्ये शिरून हल्ले केले आहेत. या हिंस्त्र प्राण्यांचा बंदाेबस्त करणे आवश्यक आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघleopardबिबट्या