शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

वाघ व बिबट्यांच्या हल्ल्यात २३० पाळीव जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला वनविभागामार्फत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे मनुष्य किंवा प्राण्यांची हानी झाल्यास त्याची नाेंद  वनविभाग ठेवते. वनविभागाकडे उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २३० पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. त्यांच्या मालकांना वनविभागामार्फत  २४ लाख रुपयांची मदत वितरित केली आहे. तर २ लाख रुपये अर्थसहाय्य देणे बाकी आहे. 

ठळक मुद्देनऊ महिन्यातील स्थिती : मागील दाेन वर्षात वाढली संख्या

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत वाघबिबट्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे २३० पाळीव जनावरे ठार झाली आहेत. सर्वाधिक हाणी देसाईगंज व गडचिराेली वनविभागाअंतर्गत झाली आहे. त्या प्राण्यांच्या मालकांना वनविभागाकडून २४ लाखांची मदत देण्यात आली.गडचिराेली जिल्ह्यात जवळपास ७८ टक्के भूभागावर जंगल असले तरी वाघांची संख्या अगदी नगण्य हाेती.  काही प्रमाणात बिबटे  आढळून येत हाेते. मात्र हे बिबटे  जंगलातच राहत असल्याने त्यांच्याकडून मानव किंवा पाळीव जनावरांवर  फार क्वचित प्रमाणात हल्ले हाेत हाेते. मात्र मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात वाघ व बिबट्यांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाेबा येथील अनेक वाघांनी सीमा ओलांडून गडचिराेली जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तसेच पूर्वीच्या तुलनेत बिबट्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. परिणामी या दाेन्ही हिंस्त्र प्राण्यांकडून मानव व पाळीव जनावरांवरील हल्ले वाढले आहेत.  वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला वनविभागामार्फत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे मनुष्य किंवा प्राण्यांची हानी झाल्यास त्याची नाेंद  वनविभाग ठेवते. वनविभागाकडे उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २३० पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. त्यांच्या मालकांना वनविभागामार्फत  २४ लाख रुपयांची मदत वितरित केली आहे. तर २ लाख रुपये अर्थसहाय्य देणे बाकी आहे. 

५२ नागरिक जखमीवाघ, बिबट, रानडुकर, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात जानेेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे ५२ नागरिक जखमी झाले आहेत. यातही गडचिराेली व देसाईगंज वनविभागात हल्ल्यांचे प्रमाण अधिक आहे. मागील दाेन वर्षात गडचिराेली जिल्ह्यात वाघ व बिबट्यांची संख्या वाढली आहे. वाघ व बिबटे गावाजवळ तसेच गावातही प्रवेश करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांनी अनेकवेळा गावांमध्ये शिरून हल्ले केले आहेत. या हिंस्त्र प्राण्यांचा बंदाेबस्त करणे आवश्यक आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघleopardबिबट्या