शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
4
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
5
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
6
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
7
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
8
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
9
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
10
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
11
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
12
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
13
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
14
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
15
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
16
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
17
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
18
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

वाघ व बिबट्यांच्या हल्ल्यात २३० पाळीव जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला वनविभागामार्फत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे मनुष्य किंवा प्राण्यांची हानी झाल्यास त्याची नाेंद  वनविभाग ठेवते. वनविभागाकडे उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २३० पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. त्यांच्या मालकांना वनविभागामार्फत  २४ लाख रुपयांची मदत वितरित केली आहे. तर २ लाख रुपये अर्थसहाय्य देणे बाकी आहे. 

ठळक मुद्देनऊ महिन्यातील स्थिती : मागील दाेन वर्षात वाढली संख्या

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत वाघबिबट्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे २३० पाळीव जनावरे ठार झाली आहेत. सर्वाधिक हाणी देसाईगंज व गडचिराेली वनविभागाअंतर्गत झाली आहे. त्या प्राण्यांच्या मालकांना वनविभागाकडून २४ लाखांची मदत देण्यात आली.गडचिराेली जिल्ह्यात जवळपास ७८ टक्के भूभागावर जंगल असले तरी वाघांची संख्या अगदी नगण्य हाेती.  काही प्रमाणात बिबटे  आढळून येत हाेते. मात्र हे बिबटे  जंगलातच राहत असल्याने त्यांच्याकडून मानव किंवा पाळीव जनावरांवर  फार क्वचित प्रमाणात हल्ले हाेत हाेते. मात्र मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात वाघ व बिबट्यांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाेबा येथील अनेक वाघांनी सीमा ओलांडून गडचिराेली जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तसेच पूर्वीच्या तुलनेत बिबट्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. परिणामी या दाेन्ही हिंस्त्र प्राण्यांकडून मानव व पाळीव जनावरांवरील हल्ले वाढले आहेत.  वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला वनविभागामार्फत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे मनुष्य किंवा प्राण्यांची हानी झाल्यास त्याची नाेंद  वनविभाग ठेवते. वनविभागाकडे उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २३० पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. त्यांच्या मालकांना वनविभागामार्फत  २४ लाख रुपयांची मदत वितरित केली आहे. तर २ लाख रुपये अर्थसहाय्य देणे बाकी आहे. 

५२ नागरिक जखमीवाघ, बिबट, रानडुकर, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात जानेेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे ५२ नागरिक जखमी झाले आहेत. यातही गडचिराेली व देसाईगंज वनविभागात हल्ल्यांचे प्रमाण अधिक आहे. मागील दाेन वर्षात गडचिराेली जिल्ह्यात वाघ व बिबट्यांची संख्या वाढली आहे. वाघ व बिबटे गावाजवळ तसेच गावातही प्रवेश करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांनी अनेकवेळा गावांमध्ये शिरून हल्ले केले आहेत. या हिंस्त्र प्राण्यांचा बंदाेबस्त करणे आवश्यक आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघleopardबिबट्या