शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

गडचिरोली जिल्ह्यातील २१२ गावांना यावर्षी बसणार पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 15:34 IST

गडचिरोली जिल्ह्यातील २१२ गावांना यावर्षी पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पूर परिस्थितीदरम्यान जीवित तसेच वित्त हानी टळावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नियोजन व उपाययोजना केल्या आहेत.

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापनामार्फत उपाययोजनासर्वच विभागांवर सोपविली जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील २१२ गावांना यावर्षी पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पूर परिस्थितीदरम्यान जीवित तसेच वित्त हानी टळावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नियोजन व उपाययोजना केल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्याचा सुमारे ६८ टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. अनेक गावे घनदाट जंगलात वसली आहेत. या गावांना जाण्यासाठी रस्ते नाहीत. नदी, नाल्यांवर पूल बांधण्यात आले नाही. त्यामुळे पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटते. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडते. पावसाळ्यादरम्यान पूर परिस्थिती निर्माण होते. एकाचवेळी अनेक गावांचा संपर्क तुटत असल्याने प्रशासनाला पावसाळ्याच्या कालावधीत विशेष सतर्क राहावे लागते. यावर्षी आपत्ती व्यवस्थापन विभागाने नियोजन केले आहे. यामध्ये जिल्हाभरातील सुमारे २१२ गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली आहे. पावसाळ्याच्या कालावधीत या गावांवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे. पुरात सापडलेल्या नागरिकांना वेळेवर मदत मिळावी, शासकीय विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलू नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या चमूमध्ये सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे.प्रत्येक तालुक्यात पट्टीच्या पोहणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी प्रशासनाने घोषित केली आहे. प्रत्येक तालुक्याला लाईफ जॉकेट, लाईफ बोयाज, दोरखंड, फायर एक्सटिंगब्युशर, वायरलेस यंत्रणा, रिपिटर, इन्व्हर्टर, बॅटरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही तालुक्यांना बोटसुद्धा उपलब्ध करून दिली आहे. मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडला होता. अनेकवेळा पूर परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाची धावपळ झाली होती. यावर्षीही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.एटापल्ली तालुका जंगलाने व्यापला आहे. या तालुक्यातील बहुतांश गावे जंगलातच वसली आहेत. पावसाळ्यात या तालुक्यातील सुमारे ६३ गावांना पुराचा फटका बसते. त्यामुळे या तालुक्याकडे प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.सिरोंचा तालुक्यातून गोदावरी, प्राणहिता या मोठ्या नद्या वाहतात. नदी तिरावर तसेच सखल भागात असलेल्या ५७ गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. या तालुक्याला यावर्षीही शासनामार्फत बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

टॅग्स :floodपूर