शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

गडचिरोली जिल्ह्यातील २१२ गावांना यावर्षी बसणार पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 15:34 IST

गडचिरोली जिल्ह्यातील २१२ गावांना यावर्षी पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पूर परिस्थितीदरम्यान जीवित तसेच वित्त हानी टळावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नियोजन व उपाययोजना केल्या आहेत.

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापनामार्फत उपाययोजनासर्वच विभागांवर सोपविली जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील २१२ गावांना यावर्षी पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पूर परिस्थितीदरम्यान जीवित तसेच वित्त हानी टळावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नियोजन व उपाययोजना केल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्याचा सुमारे ६८ टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. अनेक गावे घनदाट जंगलात वसली आहेत. या गावांना जाण्यासाठी रस्ते नाहीत. नदी, नाल्यांवर पूल बांधण्यात आले नाही. त्यामुळे पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटते. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडते. पावसाळ्यादरम्यान पूर परिस्थिती निर्माण होते. एकाचवेळी अनेक गावांचा संपर्क तुटत असल्याने प्रशासनाला पावसाळ्याच्या कालावधीत विशेष सतर्क राहावे लागते. यावर्षी आपत्ती व्यवस्थापन विभागाने नियोजन केले आहे. यामध्ये जिल्हाभरातील सुमारे २१२ गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली आहे. पावसाळ्याच्या कालावधीत या गावांवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे. पुरात सापडलेल्या नागरिकांना वेळेवर मदत मिळावी, शासकीय विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलू नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या चमूमध्ये सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे.प्रत्येक तालुक्यात पट्टीच्या पोहणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी प्रशासनाने घोषित केली आहे. प्रत्येक तालुक्याला लाईफ जॉकेट, लाईफ बोयाज, दोरखंड, फायर एक्सटिंगब्युशर, वायरलेस यंत्रणा, रिपिटर, इन्व्हर्टर, बॅटरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही तालुक्यांना बोटसुद्धा उपलब्ध करून दिली आहे. मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडला होता. अनेकवेळा पूर परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाची धावपळ झाली होती. यावर्षीही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.एटापल्ली तालुका जंगलाने व्यापला आहे. या तालुक्यातील बहुतांश गावे जंगलातच वसली आहेत. पावसाळ्यात या तालुक्यातील सुमारे ६३ गावांना पुराचा फटका बसते. त्यामुळे या तालुक्याकडे प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.सिरोंचा तालुक्यातून गोदावरी, प्राणहिता या मोठ्या नद्या वाहतात. नदी तिरावर तसेच सखल भागात असलेल्या ५७ गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. या तालुक्याला यावर्षीही शासनामार्फत बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

टॅग्स :floodपूर