शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
2
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
3
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
4
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
5
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
6
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
7
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
8
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
9
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
10
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
11
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
12
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
13
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
14
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
15
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
16
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
17
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
18
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणं; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
19
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
20
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी बांधल्या १८ जोडप्यांच्या लग्नगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:06 IST

नवतरुण युवक-युवतींसह अनेक वर्षांपासून एकत्र राहात असले तरी प्रत्यक्षात विवाहबद्ध न झालेल्या जोडप्यांच्या लग्नगाठी बांधण्याचे पुण्यकर्म पोलिसांनी सोमवारी रेगडी येथील जनजागरण मेळाव्यात केले. यावेळी वाजतगाजत आणि मोठ्या उत्साहात १८ जोडप्यांचा विधीवत विवाह सोहळा पार पडला.

ठळक मुद्देरेगडीतील जनजागरण मेळावा : नागरिकांनी विकासासाठी लोकशाही मार्गाने प्रयत्न करावे- डॉ.कवडे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नवतरुण युवक-युवतींसह अनेक वर्षांपासून एकत्र राहात असले तरी प्रत्यक्षात विवाहबद्ध न झालेल्या जोडप्यांच्या लग्नगाठी बांधण्याचे पुण्यकर्म पोलिसांनी सोमवारी रेगडी येथील जनजागरण मेळाव्यात केले. यावेळी वाजतगाजत आणि मोठ्या उत्साहात १८ जोडप्यांचा विधीवत विवाह सोहळा पार पडला.पती-पत्नीसारखे एकत्रित राहात असूनही काही जोडप्यांचा अधिकृत विवाह झालेला नव्हता. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत होते. अशा जोडप्यांसह नव्याने विवाह जुळलेल्या नवतरुण युवक-युवतींचा शेकडो वऱ्हाड्यांच्या साक्षीने रितसर विवाह झाल्याने त्यांना विवाहाचे प्रमाणपत्र आणि शासनाच्या विविध योजनांचे लाभही याचवेळी देण्यात आले.गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शीचे नायब तहसीलदार एस.के.बावणे, घोटचे महसूल मंडळ अधिकारी एस.व्ही.सरपे, रेगडीचे सरपंच बाजीराव गावळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.चित्रा जावंजाळ, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद ब्राम्हणवाडे, चामोर्शी तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनिल कुकुडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी पारंपरिक आदिवासी लोकनृत्य सादर करून नवरदेवांना वाजतगाजत मेळाव्याच्या ठिकाणी आणण्यात आले. त्या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा पार पडला. अध्यक्षीय मार्गदर्शनात एसडीपीओ डॉ.सागर कवडे म्हणाले, मेळाव्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहीजे. नागरिकांनी विकासाकरिता सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून लोकशाही मार्गाने नागरिकांनी विकास करावा, भरकटलेल्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन रेगडी पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक धनाजी खापरे यांनी तर आभार प्रभारी पोलीस अधिकारी राहुल बांगर यांनी मानले. यावेळी रेगडी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक केव्हे, विकासपल्लीचे क्षेत्र सहायक घारूडे, देवदाचे क्षेत्र सहायक गजबे, घोट मदत केंद्राच्या प्रभारी अधिकारी अंजली राजपूत, रेगडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी राहुल बांगर, उपनिरीक्षक धनाजी खापरे, माडेआमगावच्या सरपंच रसिका मोहंदा, रेगडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देवराव खंडरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.एकाच मंडपात विविध योजनांचा लाभ मिळाल्याने गावकऱ्यांनी पोलीस व प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले.विविध योजनांचा लाभया जनजागरण मेळाव्यात आदिवासी विकास विभागाकडून ८ लाभार्थ्यांना प्रतिनग ३० पीव्हीसी पाईप वाटप करण्यात आले. तसेच वनविभागाकडून दोन लोकांना नुकसानभरपाईचे धनादेश वाटप करण्यात आले. माडेआमगाव येथील ग्रामपंचायतअंतर्गत ग्रामसभेचा ठराव घेऊन अपंग महिलेस एक तीनचाकी सायकल देण्यात आले. याशिवाय १५ जणांना वाहन परवाना, २० जणांना आधार कार्ड, ५ जणांना तेंदू बोनस धनादेश, ३ जणांना महसूल विभागाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.तंटामुक्त गाव समित्यांचे सहकार्यया जनजागरण मेळाव्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होण्यासाठी गावागावात माहिती पोहोचविण्याचे काम तंटामुक्त गाव समित्यांनी करून हा विवाह सोहळा आणि मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.विवाह नोंदणी प्रमाणपत्र व धनादेशयावेळी विवाहबद्ध झालेल्या दाम्पत्यांना शासनाच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या विवाह योजनेअंतर्गत १० हजार रुपयांचे धनादेश व विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. यासोबतच विविध योजनांचे लाभ नवदाम्पत्यांना लगेच देण्यात आल्याने ते हरखून गेले होते.