शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
3
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
4
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
5
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
6
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
7
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
8
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
9
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
10
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
11
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
12
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
13
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
14
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
15
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
16
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
17
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
18
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
19
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
20
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत

पोलिसांनी बांधल्या १८ जोडप्यांच्या लग्नगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:06 IST

नवतरुण युवक-युवतींसह अनेक वर्षांपासून एकत्र राहात असले तरी प्रत्यक्षात विवाहबद्ध न झालेल्या जोडप्यांच्या लग्नगाठी बांधण्याचे पुण्यकर्म पोलिसांनी सोमवारी रेगडी येथील जनजागरण मेळाव्यात केले. यावेळी वाजतगाजत आणि मोठ्या उत्साहात १८ जोडप्यांचा विधीवत विवाह सोहळा पार पडला.

ठळक मुद्देरेगडीतील जनजागरण मेळावा : नागरिकांनी विकासासाठी लोकशाही मार्गाने प्रयत्न करावे- डॉ.कवडे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नवतरुण युवक-युवतींसह अनेक वर्षांपासून एकत्र राहात असले तरी प्रत्यक्षात विवाहबद्ध न झालेल्या जोडप्यांच्या लग्नगाठी बांधण्याचे पुण्यकर्म पोलिसांनी सोमवारी रेगडी येथील जनजागरण मेळाव्यात केले. यावेळी वाजतगाजत आणि मोठ्या उत्साहात १८ जोडप्यांचा विधीवत विवाह सोहळा पार पडला.पती-पत्नीसारखे एकत्रित राहात असूनही काही जोडप्यांचा अधिकृत विवाह झालेला नव्हता. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत होते. अशा जोडप्यांसह नव्याने विवाह जुळलेल्या नवतरुण युवक-युवतींचा शेकडो वऱ्हाड्यांच्या साक्षीने रितसर विवाह झाल्याने त्यांना विवाहाचे प्रमाणपत्र आणि शासनाच्या विविध योजनांचे लाभही याचवेळी देण्यात आले.गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शीचे नायब तहसीलदार एस.के.बावणे, घोटचे महसूल मंडळ अधिकारी एस.व्ही.सरपे, रेगडीचे सरपंच बाजीराव गावळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.चित्रा जावंजाळ, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद ब्राम्हणवाडे, चामोर्शी तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनिल कुकुडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी पारंपरिक आदिवासी लोकनृत्य सादर करून नवरदेवांना वाजतगाजत मेळाव्याच्या ठिकाणी आणण्यात आले. त्या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा पार पडला. अध्यक्षीय मार्गदर्शनात एसडीपीओ डॉ.सागर कवडे म्हणाले, मेळाव्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहीजे. नागरिकांनी विकासाकरिता सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून लोकशाही मार्गाने नागरिकांनी विकास करावा, भरकटलेल्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन रेगडी पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक धनाजी खापरे यांनी तर आभार प्रभारी पोलीस अधिकारी राहुल बांगर यांनी मानले. यावेळी रेगडी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक केव्हे, विकासपल्लीचे क्षेत्र सहायक घारूडे, देवदाचे क्षेत्र सहायक गजबे, घोट मदत केंद्राच्या प्रभारी अधिकारी अंजली राजपूत, रेगडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी राहुल बांगर, उपनिरीक्षक धनाजी खापरे, माडेआमगावच्या सरपंच रसिका मोहंदा, रेगडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देवराव खंडरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.एकाच मंडपात विविध योजनांचा लाभ मिळाल्याने गावकऱ्यांनी पोलीस व प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले.विविध योजनांचा लाभया जनजागरण मेळाव्यात आदिवासी विकास विभागाकडून ८ लाभार्थ्यांना प्रतिनग ३० पीव्हीसी पाईप वाटप करण्यात आले. तसेच वनविभागाकडून दोन लोकांना नुकसानभरपाईचे धनादेश वाटप करण्यात आले. माडेआमगाव येथील ग्रामपंचायतअंतर्गत ग्रामसभेचा ठराव घेऊन अपंग महिलेस एक तीनचाकी सायकल देण्यात आले. याशिवाय १५ जणांना वाहन परवाना, २० जणांना आधार कार्ड, ५ जणांना तेंदू बोनस धनादेश, ३ जणांना महसूल विभागाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.तंटामुक्त गाव समित्यांचे सहकार्यया जनजागरण मेळाव्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होण्यासाठी गावागावात माहिती पोहोचविण्याचे काम तंटामुक्त गाव समित्यांनी करून हा विवाह सोहळा आणि मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.विवाह नोंदणी प्रमाणपत्र व धनादेशयावेळी विवाहबद्ध झालेल्या दाम्पत्यांना शासनाच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या विवाह योजनेअंतर्गत १० हजार रुपयांचे धनादेश व विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. यासोबतच विविध योजनांचे लाभ नवदाम्पत्यांना लगेच देण्यात आल्याने ते हरखून गेले होते.