शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

१६ ठिकाणचे पाणी नमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:30 IST

ग्राम पंचायतस्तरावरील पाणी नमून्याची तपासणी जिल्हास्तरावरील प्रयोगशाळेत केली जाते. जून महिन्यात १२ तालुक्यातील एकूण १ हजार ५४५ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी चार तालुक्यातील १६ पाणी नमुने दूषित आढळून आले. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ९ हजार ४४७ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देअहेरी तालुका सर्वाधिक दूषित : सहा महिन्यांत ९ हजार ४४७ नमुन्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्राम पंचायतस्तरावरील पाणी नमून्याची तपासणी जिल्हास्तरावरील प्रयोगशाळेत केली जाते. जून महिन्यात १२ तालुक्यातील एकूण १ हजार ५४५ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी चार तालुक्यातील १६ पाणी नमुने दूषित आढळून आले. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ९ हजार ४४७ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.पिण्याच्या पाण्यासंदर्भात पावसाळ्यात प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. दूषित पाण्यापासून कॉलरा, ग्रस्ट्रो, अतिसार, हगवन, टायफाईड आदींसारखे आजार बळावतात. दूषित पाणी पिल्याने नागरिकांचे आरोग्य लवकरच धोक्यात येते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नेहमी जनजागृती करून नागरिकांनी शुद्ध पाणी प्यावे, असे आवाहन केले जाते. प्रशासनाच्या वतीने दर महिन्यात ग्रामपंचायतस्तरावरील पाणी नमूने घेऊन त्याची तपासणी केली जाते. या तपासणीच्या अहवालानुसार संबंधित ग्रामपंचायतींना हिरवे, लाल, पिवळे अशा तीन प्रकारचे कार्ड दिले जातात. जून २०१८ मध्ये गडचिरोली तालुक्यातील २९९ पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी दोन नमूने दूषित आढळून आले. धानोरा तालुक्यातील ९० पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. यात एकही नमूना दूषित आढळला नाही. आरमोरी तालुक्यातील ३७५ पाणी नमून्यांपैकी ४ नमुने दूषित आढळून आले. देसाईगंज तालुक्यातील २०३ नमून्यांपैकी २ तर कुरखेडा तालुक्यातील १०४ नमून्यांपैकी ८ नमूने दूषित आढळून आले. उर्वरित कोरची, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या तालुक्यातील पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. मात्र एकही नमूना दूषित आढळून आला नाही. कोरची तालुक्यात २८, चामोर्शी तालुक्यातील २६३, मुलचेरा ३८, अहेरी ५२ व एटापल्ली तालुक्यातील ८३ तसेच भामरागड तालुक्यातील १० पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. सिरोंचा तालुक्यातून जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत ग्रामपंचायतीच्या वतीने जून महिन्यात एकही पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले नाही.गडचिरोली तालुक्यातील २ दूषित पाणी नमून्यातील दूषित पाण्याचे प्रमाण ०.६७ आहे. आरमोरी तालुक्याच्या ४ पाणी नमुन्याच्या तपासणीअंती दूषित पाण्याचे प्रमाण १.०७, देसाईगंजातील २ पाणी नमून्याच्या तपासणीअंती ०.९९, कुरखेडा तालुक्याच्या ८ पाणी नमूने तपासणीअंती दूषित पाण्याचे प्रमाण ७.६९ इतके आढळून आले. तपासणीनंतर पाण्यातील दूषिताचे प्रमाण ७ पेक्षा अधिक असल्यास ते धोक्याचे असते. त्यामुळे संबंधित गावांमध्ये जलजन्य आजार पसरण्याची शक्यता असते.पाच ग्रामपंचायतींना मिळाले लाल कार्डपाणी स्त्रोताच्या ठिकाणचे प्लॅटफॉर्म फुटलेले असणे, सभोवताल घाणीचे साम्राज्य तसेच नियमित पाणी दूषित येत असल्यास संबंधित गावाच्या ग्रामपंचायतींना जि.प.आरोग्य विभागाच्या वतीने लाल कार्ड दिले जाते. एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या पाणी स्त्रोताच्या सर्वेक्षणानुसार अहेरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात आले आहे. यामध्ये रेपनपल्ली, खांदला, राजाराम व नागेपल्ली, खमनचेरू आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायतींनी पाणी स्त्रोताच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी, पाणी शुद्ध येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater pollutionजल प्रदूषण