शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

नाल्यातील वीज प्रवाहाने 16 जनावरांचा मृत्यू, 33 बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 12:43 IST

अहेरीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या देवलमारी येथे रविवारी नाल्याच्या प्रवाहात आलेल्या विद्युत प्रवाहामुळे 16 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

अहेरी (गडचिरोली) - अहेरीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या देवलमारी येथे रविवारी (8 सप्टेंबर) सकाळी नाल्याच्या प्रवाहात आलेल्या विद्युत प्रवाहामुळे 16 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जनावरं पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी देवलमरी गावातील 15 शेतकऱ्यांची एकूण 49 जनावरे जंगलात चरण्यासाठी गेली होती. काही शेतकऱ्यांनी सर्व जनावरांना जंगलातून गावाकडे नेण्यासाठी सोडले. सर्व जनावरे गावाच्या लगत असलेल्या आवलमारी रस्त्यावरील नाल्याच्या पुराच्या पाण्यातून देवलमारी गावाकडे येत होती. मात्र पाण्यात विद्युत खांब बुडाल्याने पाण्यात विद्युत प्रवाह सुरू होता. यामुळे विद्युत धक्क्याने 16 जनावरे मृत्युमुखी पडली. त्यांचे मृतदेह सापडले असून अद्याप 33 जनावरांचा पत्ता लागला नाही. विद्युत धक्क्याने त्यांचाही मृत्यू होऊन ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मानवी जीवितहानी टळली

भोई समाजाचे लोक सकाळीच डोंगे बांधण्यासाठी नदीकडे जाणार होते, मात्र आज ते नदीकडे गेले नाही. त्यामुळे ते बचावले.विद्युत विभागाने पूरपरिस्थिती बघून वेळीच विद्युत प्रवाह बंद केला असता तर जनावरांची जीवितहानी टळली असती. एकूण 15 शेतकऱ्यांचे एकूण 49 जनावरांचे नुकसान झाले आहे अशी माहिती गावाच्या पटवारी भावना सोनकुसरे यांनी लोकमतला दिली.

 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDeathमृत्यूRainपाऊस