शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार लोक गृह विलगीकरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीमध्ये बाहेर न पडता घरात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यातही बाहेरून आलेल्या लोकांना गृह विलगीकरणाचा शिक्का मारल्याने त्यांनी घरातील इतर सदस्यांसोबतही विशिष्ट अंतर ठेवूनच राहणे अपेक्षित आहे. त्याचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

ठळक मुद्देहातावर मारले शिक्के : बाहेरच्या जिल्ह्यातून आल्याने १४ दिवस घराबाहेर न निघण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यामुळे अत्यावश्यक सेवेशिवाय कोणालाही घराबाहेर निघण्यास मनाई आहे. मात्र बाहेरच्या जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्यांना कोणत्याच कारणासाठी घराबाहेर पडण्यास मनाई करून त्यांच्या हातावर ‘होम क्वॉरंटाईन’ (गृह विलगिकरण)चे शिक्के मारण्यात आले आहेत. दरम्यान अशा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या आता १४ हजार २८७ वर पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीमध्ये बाहेर न पडता घरात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यातही बाहेरून आलेल्या लोकांना गृह विलगीकरणाचा शिक्का मारल्याने त्यांनी घरातील इतर सदस्यांसोबतही विशिष्ट अंतर ठेवूनच राहणे अपेक्षित आहे. त्याचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १४ दिवस त्यांनी घरातच थांबून होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १५५२ नागरिकांचा नागरिकांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांना शंकामुक्त करण्यात आले.कोरोना संसर्गाची लक्षणे जरी उशिरा दिसत असली तरी त्याची लक्षणे दिसण्यापूर्वीच संसर्गाची लागण इतरांना होऊ शकते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या सर्वच नागरिकांना घरात राहणे बंधनकारक केले आहे. त्यांच्या हातावर आरोग्य विभागाने शिक्के मारले आहेत. या लोकांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे दिसतात का, याबाबतचे निरीक्षण आरोग्य विभागाकडून केले जात आहे.ही लक्षणे दिसल्यास तातडीने कळवाआरोग्य विभागाकडून अशा लोकांच्या हातावर शिक्के व घरावर स्टिकर लावण्यात आले आहेत. तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी स्थानिक पातळीवर दैनंदिन निरीक्षणे नोंदवत आहेत. यातील काही लोकांना ताप, खोकला, शिंका अशी लक्षणे दिसल्यास त्यांची पुढील तपासणी केली जात आहे. अशा वेळी घरातील इतर सदस्यांनी जर काही लक्षणे संबंधित व्यक्तीमध्ये आढळून आल्यास याबाबत तातडीने आरोग्य विभागाला कळवावे, जेणेकरून वेळेत त्याबाबत उपचार करता येतील.असे करा गृह विलगीकरणकोरोनाबाधित प्रदेशातून आलेल्या व्यक्तीने समाजापासून तसेच स्वत:च्या कुटुंबातील इतर सदस्यांपासून दूर राहणे म्हणजे गृह विलगीकरण होय. यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने आपल्यापासून इतरांना संसर्ग होऊ न देण्याची काळजी घ्यावी लागते. दैनंदिन वापरावयाच्या वस्तू, कपडे, भांडी वेगळ्या स्वरूपात वापरणे या घटकांचा समावेश यामध्ये आहे. गृह विलगीकरणाचा कालावधी एकूण १४ दिवसांचा आहे. या कालावधीत कोरोना आजाराची कोणतीही लक्षणे किंवा आजार आढळून न आल्यास त्या व्यक्तीला १४ दिवसानंतर होम क्वारंटाईनमधून बाहेर येता येते.गृह विलगीकरण केलेल्या व्यक्तीची शौचालय व्यवस्थाही वेगळी असावी. संबंधित व्यक्तीने साबण, सॅनिटायझर, मास्क अशा आवश्यक बाबी स्वतंत्र वापरणे गरजेचे आहे. घरातील इतर सदस्यांनी या व्यक्तीपासून संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी. लक्षणे दिसत नसली तरी याबाबत आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस