शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

१३ हजारांवर बालकांचे शाळेत पडणार पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 15:30 IST

पहिल्याच दिवशी मिळणार नवीन पुस्तके : शाळा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पहिल्या वर्ग हा शिक्षणाची पहिली पायरी आहे. त्यामुळे पहिल्या वर्गाचा प्रवेश विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या पाल्याचा पहिल्या वर्गातील पहिल्या दिवसाची आठवण पालक कायमची स्मरणात ठेवतात. त्यामुळे पहिल्या वर्गातील प्रवेशाचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी जिल्ह्यातील १३ हजार ४३५ बालके पहिल्या वर्गात प्रवेश घेणार आहेत.

एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाला आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग विशेष सतर्क असते. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी त्यांच्या गावांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांमधून सहा वर्षे पूर्ण होत असलेल्या बालकांची यादी घेतली. या बालकांच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे प्रवेश करून घेतले, तसेच शाळापूर्व मेळावा घेऊन पालकांना शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यामुळे शाळेबद्दल पालक व विद्यार्थी अगोदरच परिचित झाले आहेत. जुलै महिन्यापासून शाळेला सुरुवात होते. शाळेच्या पहिल्या दिवशी बालकाला गणवेश, पुस्तके मिळाल्यास त्यांचा आनंद द्विगुणीत होतो. शाळेविषयी त्याच्या मनात प्रेम निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश व पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागामार्फत केला जात आहे.

तालुकानिहाय दाखलपात्र विद्यार्थीतालुका                                     विद्यार्थीगडचिरोली                                   १.४०७आरमोरी                                      १३१५देसाईगंज                                      ८०३कुरखेडा                                       ११८२कोरची                                           ७५३धानोरा                                          १.४३४चामोर्शी                                         २,०१७मूलचेरा                                            ६६१अहेरी                                            १३१५एटापल्ली                                      १.२२१भामरागड                                         ४७३सिरोंचा                                            ८५४एकूण विद्यार्थी                             १३,४३५  

शाळापूर्व मेळाव्यांना ठिकठिकाणी प्रतिसाद• पहिल्या वर्गात दाखल होणाऱ्या बालकाला व त्याच्या पालकाला शाळेविषयी माहिती असावी, यासाठी एप्रिल महिन्यात शाळापूर्व तयारी मेळावे घेण्यात आले. या दरम्यान विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. • विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडींची चाचणी घेण्यात आली. पालकांना विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पहिल्या वर्गात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा अगोदरच परिचित झाली आहे. पटसंख्येसाठी शिक्षकांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :SchoolशाळाGadchiroliगडचिरोली