शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

११ तालुके कोरोनामुक्तीच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील एकूण २५१ कोरोना रूग्णांपैकी २२९ रूग्ण एकट्या गडचिरोली तालुक्यातील आहेत. यामध्ये सुरक्षा दलातील कोरोनाबाधीत जवानांची संख्या अधिक आहे. इतर तालुक्यांमध्ये केवळ २२ कोरोनाबाधीत रूग्ण आहेत. गडचिरोली वगळता इतर ११ तालुक्यांमध्ये आतापर्यंत बाहेरून आलेले १३१ रूग्ण बाधित असल्याचे आढळले आहेत. त्यापैकी १०८ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देतीन तालुके निरंक : गडचिरोलीत सर्वाधिक रूग्ण, अद्याप सामूहिक संसर्ग नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी तीन तालुक्यात एकही सक्रीय रूग्ण नाही. पाच तालुक्यांमध्ये १ ते २ सक्रीय रूग्ण आहेत. उर्वरित तीन तालुक्यांमध्ये सहा पेक्षा कमी सक्रीय रूग्ण आहेत. गडचिरोली तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे. हे तालुके लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील एकूण २५१ कोरोना रूग्णांपैकी २२९ रूग्ण एकट्या गडचिरोली तालुक्यातील आहेत. यामध्ये सुरक्षा दलातील कोरोनाबाधीत जवानांची संख्या अधिक आहे. इतर तालुक्यांमध्ये केवळ २२ कोरोनाबाधीत रूग्ण आहेत. गडचिरोली वगळता इतर ११ तालुक्यांमध्ये आतापर्यंत बाहेरून आलेले १३१ रूग्ण बाधित असल्याचे आढळले आहेत. त्यापैकी १०८ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित सर्व रूग्णांना कोणतेही लक्षणे नाहीत. त्यामुळे त सुध्दा कोरोनामुक्त होतील, असा विश्वास आरोग्य प्रशासनाने व्यक्त केला आहे.एकूण ४२९ रूग्णांपैकी १७७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. केवळ सिरोंचा येथील एका रूग्णाचा हैदराबादमध्ये मृत्यू झाला.जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार ९९३ चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये आरटीपीसीआरसह ट्रू नॅट व राटी चाचण्यांचा समावेश आहे. ११ हजार २८८ चाचण्या नकारात्मक आल्या आहेत. जास्त प्रमाणात चाचण्या घेण्यात आल्यामुळे कोरोनाबाधित आढळून येत आहेत.आतापर्यंत केंद्रीय व राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांसह २ सीमा सुरक्षा दलाचे जवान मिळून २९१ जवानांना कोरोनाने ग्रासले आहे. हे सर्व जवान आपापल्या गृहजिल्ह्यातून आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी विलगिकरणात होते. त्यांची स्वॅब चाचणी घेण्यात आली. त्यातील अनेक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २५१ आहे. कोरोनामुळे मृत्यू ओढवण्याचे प्रमाण जिल्ह्यात नगण्य आहे. गेल्या चार महिन्यात जिल्ह्यातील केवळ एका रुग्णाचा हैदराबाद येथे मृत्यू झाला.४२९ कोरोनाग्रस्तांमध्ये २९३ जवानांचा समावेश४२९ कोरोनाबाधितांमध्ये २९३ सुरक्षा दलातील जनावांचा समावेश आहे. हे सर्व जवान जिल्हाबाहेरून बाधित होऊन आले होते. यामध्ये २०१ एसआरपीएफचे जवान, ८८ सीआरपीएफ, २ बीएसएफ व २ पोलीस जवानांचा समावेश आहे. एकूण रूग्णांपैकी राज्यबाहेरील ८३, जिल्हाबाहेरील २१० व जिल्ह्यातीलच रहिवासी असलेले परंतु बाहेरून आलेल्या १३६ नागरिकांचा समावेश आहे.कडक निर्बंध लागू राहणार -जिल्हाधिकारीकोरोना नियंत्रीत ठेवण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध पुढेही चालूच राहणार आहेत. जिल्हाबाहेरील नागरिकांचा विनापरवाना प्रवेश होऊ दिला जाणार नाही. मागील काही आठवड्यांमध्ये ग्रामीण भागात आलेल्या प्रवाशांना विलगीकरणात ठेवून कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास प्रशासनाला यश मिळाले आहे. जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान दरवर्षीप्रमाणे विविध ठिकाणावरून येत राहतात. मात्र यावेळी कोरोनाबाधीत क्षेत्रातून कर्तव्य पाडून जिल्ह्यात दाखल झाले. जिल्ह्यात आल्यानंतर त्यांना स्वतंत्र विलगीकरणात ठेवण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. परंतु आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन दीपक सिंगला यांनी केले आहे.पाच रूग्णांची भरगुरूवारी पुन्हा पाच एसआरपीएफ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधीतांची संख्या ४२९ झाली आहे. जिल्हाभरात १ हजार १९४ नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणात तर १ हजार ४४९ नागरिकांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ३९ प्रतिबंधीत क्षेत्र होते. त्यापैकी २८ क्षेत्र बंद करण्यात आले असून ११ क्षेत्र सुरू आहेत. मुलचेरा तालुक्यातील कोपरअल्ली माल, विवेकानंदपूर व सिरोंचा येथील प्रतिबंधीत क्षेत्र वगळण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या