शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

आंध्र प्रदेशातून रेल्वेने येणार १ हजार ५० मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

तेलंगणा राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे तेलंगणा राज्यातील मजूर ट्रक व इतर साधनांच्या मदतीने गडचिरोली जिल्ह्यात पोहोचले. क्रिष्णा जिल्हा आंध्रप्रदेशची राजधानी अमरावतीला लागून आहे. सदर जिल्हा गडचिरोलीपासून १ हजार पेक्षा अधिक किमी अंतरावर आहे. त्यामुळे एवढ्या दुरून वाहनाने येणे अशक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन या मजुरांना रेल्वेने पाठविले जाणार आहेत.

ठळक मुद्देदेसाईगंजात उतरणार : बुधवारी सकाळी ९.३० वाजता पोहोचणार; प्रशासनाकडून बसेसची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज/कोरची : आंध्र प्रदेश राज्यातील क्रिष्णा जिल्ह्यातून १ हजार ५० मजूर देसाईगंज रेल्वेस्थानकावर उद्या बुधवारी पोहोचणार आहेत. सदर रेल्वे बुधवारी रात्री १ वाजता आंध्रप्रदेशातील रायणापांडू येथून प्रस्थान होऊन देसाईगंज येथे बुधवारी सकाळी ९.३० वाजता पोहोचणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील सुमारे १३ हजार मजूर मिरची तोडण्यासाठी आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यात गेले होते. तेलंगणा राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे तेलंगणा राज्यातील मजूर ट्रक व इतर साधनांच्या मदतीने गडचिरोली जिल्ह्यात पोहोचले. क्रिष्णा जिल्हा आंध्रप्रदेशची राजधानी अमरावतीला लागून आहे. सदर जिल्हा गडचिरोलीपासून १ हजार पेक्षा अधिक किमी अंतरावर आहे. त्यामुळे एवढ्या दुरून वाहनाने येणे अशक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन या मजुरांना रेल्वेने पाठविले जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ५० मजूर क्रिष्णा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मिरची तोडणीचे काम करीत होते. सदर मजुरांना देसाईगंज रेल्वेस्थानकावर सोडले जाणार आहे. संबंधित मजुरांना त्यांच्या तालुक्यात सोडून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी न करता ज्या तालुक्यातील मजूर आहेत, त्या ठिकाणी त्यांना पाठविले जाणार आहे. तालुकास्थळी पोहोचल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल. चामोर्शी तालुक्यातील सर्वाधिक ५८९ मजूर आहेत. त्याचबरोबर कोरची, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, कुरखेडा या तालुक्यांमधीलही मजुरांचा समावेश आहे. याच रेल्वेने चंद्रपूर, गोंदिया, भंडारा येथील ४० मजूर येणार आहेत. या सर्व मजुरांना मंगळवारी रेल्वेमध्ये बसविण्यात आले आहे.बसस्थानकावरील सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भेट दिली. यावेळी देसाईगंजचे एसडीओ, मुख्याधिकारी, संवर्ग विकास अधिकारी उपस्थित होते. रेल्वेने मजूर आल्यानंतर त्यांना पोहोचविण्यासाठी काय व्यवस्था आहे, याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणली.२८ बसगाड्या उपलब्ध होणाररेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना देसाईगंज येथून त्यांच्या तालुकास्थळी पोहोचविले जाणार आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या २८ बसेस भाड्याने घेतल्या आहेत. या सर्व बसेसचा खर्च मदत व पुनर्वसन विभागाकडून केला जाणार असल्याने प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या