शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चांदनी चौक टू चायना... भारतीय फुटबॉल संघ निघाला 'ड्रॅगन'च्या देशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 16:05 IST

आशियाई चषक स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेल्या संघांविरूद्ध भारतीय खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, अशी मागणी कर्णधार सुनील छेत्री केली होती.  ही मागणी मान्य करताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने चीनविरूद्ध आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीचे आयोजन केले आहे.

नवी दिल्ली - आशियाई चषक स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेल्या संघांविरूद्ध भारतीय खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, अशी मागणी कर्णधार सुनील छेत्री केली होती.  ही मागणी मान्य करताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने चीनविरूद्ध आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीचे आयोजन केले आहे. फिफाच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबरमध्ये ही लढत होण्याची शक्यता आहे.फिफा क्रमवारीत भारतीय संघ 97 व्या स्थानावर आहे आणि 75व्या क्रमांकावर असलेल्या चीनविरूद्ध खेळण्यासाठी हा संघ 8 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत बीजिंगला जाणार आहे. या सामन्याची अधिकृत तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. भारतीय महासंघाने 13 ऑक्टोबरचा प्रस्ताव ठेवला आहे. भारत आणि चीन यांच्यात आत्तापर्यंत 17 सामने झाले आहेत आणि हे सर्व सामने भारतीय भूमीत झालेले होते. उभय संघ 1997 मध्ये नेहरू चषक स्पर्धेत कोची येथे अखेरचे एकमेकांविरूद्ध खेळले होते. भारताचा 16 वर्षांखालील संघ चीनमध्ये  नुकत्याच झालेल्या चार देशांच्या निमंत्रित स्पर्धेत सहभाग झाला होता. यामध्ये थायलंड आणि कोरिया प्रजासत्ताक संघांचाही समावेश होता. ऑक्टोबरमध्ये होणारा हा मैत्रीपूर्ण सामना भारताच्या एएफसी आशिया चषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. ही स्पर्धा जानेवारी 2019 मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे खेळवली जाणार आहे. भारताला चीनविरूद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही. 17 पैकी 12 सामने चीनने जिंकले आहेत आणि पाच सामने बरोबरीत सुटले आहेत. मात्र, भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता चीनची कसोटी लागणार आहे. भारतीय संघाने जून 2016 ते नोव्हेंबर 2017 पर्यंत सलग 12 सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टनटाइन यांनी ही खेळाडूंसाठी मोठी संधी असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, आशियाई चषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघाला यापेक्षा चांगली संधी मिळू शकत नाही. खेळाडू या संधीचे सोनं करतील असा मला विश्वास आहे.  

 

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतSportsक्रीडा