शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

रिकाम्यापोटी 'ही' फळं खाणं शरीरासाठी ठरतं घातक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 14:24 IST

हेल्दी राहण्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश करा असे आपल्याला नेहमी सांगण्यात येत. परंतु, फळं नेमकी कधी खावीत याबाबत सावधानता राखणं गरजेचं आहे.  असे न केल्यानं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

हेल्दी राहण्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश करा असे आपल्याला नेहमी सांगण्यात येत. परंतु, फळं नेमकी कधी खावीत याबाबत सावधानता राखणं गरजेचं आहे.  असे न केल्यानं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. सगळ्या फळांमध्ये मोठया प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असे पोषक घटक असतात. पण अशीही काही फळं आहेत जी अनोशापोटी खाल्यानं त्यातील पोषक घटक शरीरासाठी हानिकारक ठरतात. गोड फळं जर अनोशापोटी खाल्ली तर शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे मधुमेहाचा धोका संभवतो. जाणून घेऊयात अशा फळांबाबत जी सकाळी अनोशापोटी खाल्यानं शरीराला नुकसान पोहोचवतात. 

आंबा

आहारतज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, कधीही रिकाम्या पोटी आंबा खाणं महागात पडू शकतं. आंब्यामध्ये साखरेचं प्रमाण मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे अनोशापोटी आंबा खाल्यानं साखर थेट रक्तात मिसळते. 

पेर

पेर या फळामध्ये कच्च्या फायबरचे प्रमाण जास्त असते. रिकाम्यापोटी पेर खाल्यानं पोटातील नाजूक अवयवांवर याचा परिणाम होऊन त्यांना इजा पोहचू शकते. त्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ सकतो. 

केळं 

केळीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. परंतु केळी अनोशापोटी खाल्यानं शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. केळ्यामध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक असते. ते थेट रक्तामध्ये मिसळते. असे होणे हृदयासाठी घातक असते.

द्राक्ष

द्राक्ष एक सायट्रस फळ आहे. यामध्ये अॅसिडची मात्रा अधिक असते. अॅसिड असलेली फळं अधिक प्रमाणात खाल्यानं जठराचा अल्सर आणि पोटात जळजळ सारख्या समस्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटात गॅससारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर हार्ट अटॅकचाही धोका संभवतो.

लिची 

लिची हे शरीरासाठी अत्यंत लाभदायक पदार्थ आहे. पण जर याचे सेवन रिकाम्यापोटी केलं तर शरीरातील साखरेचं प्रमाण वाढते. त्यामुळे पोटात गॅसची समस्या वाढते. त्यामुळे पोटात वेदना होऊ शकतात. 

टॉमेटो

टॉमेटोमध्ये मोठ्या प्रमाणावर टॅनिक अॅसिड आढळते. रिकाम्या पोटी टॉमोटो खाल्यानं पोटातील आम्लाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पोटात अल्सर होण्याची शक्यता वाढते. 

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य