शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

जाणून घ्या भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 22:21 IST

भात शिजवताना योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते. त्यामुळे तांदूळ शिजवण्याची एक खास पद्धत शास्त्रज्ञांनी सांगितली आहे. त्या पद्धतीचं अनुकरण केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

निरोगी आयुष्यासाठी घरात तयार केलेल्या पदार्थांचं सेवन करायला हवं, असा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमी देतात. अन्नपदार्थांतून मिळणारी पोषक द्रव्यं (Nutrients) नाहीशी होऊ नयेत म्हणून काळजी घेणं गरजेचं असतं. भारतीय आहारातला प्रमुख घटक म्हणजे भात. भात शिजवताना योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते. त्यामुळे तांदूळ शिजवण्याची एक खास पद्धत शास्त्रज्ञांनी सांगितली आहे. त्या पद्धतीचं अनुकरण केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. ‘बोल्ड स्काय हिंदी’ने या संदर्भात माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

प्रत्येक भारतीय कुटुंबात वरण, पोळी, भाजी, भात या अन्नपदार्थांचा हमखास समावेश असतो. भाताशिवाय आपलं जेवण पूर्ण होऊच शकत नाही. परंतु मधुमेह (Diabetes) असणाऱ्या किंवा स्थूल व्यक्तींना भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. चुकीच्या पद्धतीने भात शिजवल्यास त्यातली पोषक द्रव्यं नष्ट होण्याची भीती असते. भात शिजवण्याची योग्य पद्धत शेफिल्ड विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी सांगितली आहे. त्या पद्धतीला त्यांनी पीबीए अर्थात परबॉयलिंग विथ अ‍ॅब्सॉर्प्शन मेथड (PBA-Parboiling With Absorption Method) असं नाव दिलं आहे. ‘सायन्स ऑफ द टोटल इन्व्हायर्न्मेंट’मध्ये (Science Of The Total Environment) पीबीएबद्दलची माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार, भात शिजवण्यापूर्वी सुरुवातीला तांदूळ 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. त्यामुळे त्यातला आर्सेनिक (Arsenic) हा घटक निघून जातो. त्यानंतर तांदळांमध्ये पाणी घालून मंद आचेवर ते शिजवायला ठेवावेत. तांदळांनी सगळं पाणी पूर्णत: शोषून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा. संशोधन असं सांगतं, की या पद्धतीने तांदूळ शिजवले तर ब्राउन राइसमधून 50 टक्क्यांपर्यंत आर्सेनिक निघून जाईल. सर्वसाधारण तांदळांतून तर 74 टक्क्यांपर्यंत आर्सेनिक निघून जातं.

आर्सेनिक म्हणजे नेमकं काय?आर्सेनिक माती आणि पाण्यामध्ये आढळतं. इतर खाद्यपदार्थांच्या तुलनेत तांदळामध्ये आर्सेनिकचं प्रमाण जास्त असतं. कारण भातशेतीसाठी पाण्याचा सर्वाधिक वापर होत होतो. आर्सेनिक हे एक प्रकारचं रसायन आहे. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कीटकनाशकांमध्ये याचा वापर केला जातो. उलटी, पोटदुखी, जुलाब किंवा कॅन्सरसाठी आर्सेनिक कारणीभूत ठरू शकतं.

पीबीए पद्धत फायद्याचीघरामध्ये अन्न शिजवताना पीबीए पद्धतीचा अवलंब केला, तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. विशेषत: तांदूळ शिजवताना पीबीए पद्धतीचा वापर केल्यास आर्सेनिक घटक बाहेर निघून जातो आणि आजार होण्याचा धोकाही राहत नाही. पीबीए पद्धतीचा अवलंब केल्यामुळे तांदळातल्या स्टार्चचं प्रमाणही कमी होतं. यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता राहत नाही. स्टार्चचं प्रमाण कमी झाल्यास रक्तातल्या साखरेचं प्रमाणही वाढत नाही. अतिरिक्त स्टार्च निघून गेल्याने वजन कमी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीही अशा भाताचं सेवन करू शकतात. या पद्धतीने तांदूळ शिजवत असल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. भात खाल्ल्यानंतर लगेच न झोपता कमीत कमी दोन तासांनंतर झोपायला हवं. तसेच शक्य असल्यास जेवल्यावर शतपावली केली, तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य