शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
3
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
8
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
9
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
10
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
11
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
12
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
13
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
14
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
15
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
16
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
17
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
18
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
20
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!

लग्नाच्या दिवशी सुंदर दिसायचंय मग लग्नाआधी हे खा!

By madhuri.pethkar | Updated: November 9, 2017 18:36 IST

लग्नाच्या दिवशी चेहे-यावर सोनेरी तेज हवं असेल तर गोल्डन फेशिअलची गरज नसून नैसर्गिक सौंदर्य वाढवणा-या पोषक घटकांची आणि सौंदर्यास हानिकारक असे शरीरातील विषारी घटक काढून टाकणा-या अन्नघटकांची जास्त गरज असते. त्यामुळे लग्नात सुंदर, तेजस्वी दिसायचं असेल तर मुलींनी आपल्या जेवणाच्या ताटाकडे डोळसपणे पाहायला हवं.

ठळक मुद्दे* लग्न ठरलं की रोज लिंबू पाणी भरपूर प्यायला हवं. लिंबामध्ये क जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतं. या जीवनसत्त्वाचा उपयोग चेहे-यावर नैसर्गिक तेज आणण्यासाठी होतो.* पोटॅशिअमयुक्त फळं हे या काळात खूपच उपयुक्त असतात. या फळांनी लग्नामुळे मनातली भीती, ताण कमी होतो. उत्साही वाटतं.* चिया सीडस त्वचेसाठी खूपच उपयुक्त असतात. चिया सीडसमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असतं. जे पेशींची क्षमता वाढवतं. यामुळे त्वचा चमकदार होते.

- माधुरी पेठकर.लग्न ठरलं की घरातील वडीलधारी मंडळी विशेषत: आज्या मुलींना खाण्यापिण्याची काळजी घ्यायला लावतात. कारण लग्नात जर सुंदर दिसायचं असेल तर मुख्य उपाय आपल्या रोजच्या आहारातूनच करायला हवा. लग्नातले कपडे, दागदागिने, ब्युटी पार्लरमधून केलेल्या महागड्या ब्युटी थेरपीज या लग्नाच्या दिवशी फक्त नवरीला नटवू शकतात पण तिच्या चेहे-यावर त्या दिवशी जे तेज हवं असतं ते मिळतं फक्त योग्य आहारातूनच.त्यामुळे लग्न ठरल्यानंतर मुलींनी आपण काय खातो पितो याकडे जरा डोळसपणे पाहायला हवं. लग्नाच्या दिवशी चेहे-यावर सोनेरी तेज हवं असेल तर गोल्डन फेशिअलची गरज नसून नैसर्गिक सौंदर्य वाढवणा-या पोषक घटकांची आणि सौंदर्यास हानिकारक असे शरीरातील विषारी घटक काढून टाकणा-या अन्नघटकांची जास्त गरज असते. त्यामुळे लग्नात सुंदर, तेजस्वी दिसायचं असेल तर मुलींनी आपल्या जेवणाच्या ताटाकडे डोळसपणे पाहायला हवं.

 

काय खाल? 1. ओटसओटसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. हे फायबर हळूहळू पचतं. ओटस खाल्ल्यानं भरपूर ऊर्जा मिळते. ही ऊर्जा लग्नाची कामं आटोपताना खूप उपयोगी पडते. ओटस आहारात असतील तर रक्तातील साखर दीर्घकाळपर्यंत स्थिर राहाते. ती कमी जास्त होत नाही. ओटसच्या इडली, पॅनकेक या पर्यायांचा वापर करून आहारात आनंदानं ओटसचा समावेश करता येतो.

2. लिंबू पाणी

लग्न ठरलं की रोज लिंबू पाणी भरपूर प्यायला हवं. लिंबामध्ये क जीवनसत्त्वं मोठ्या प्रमाणात असतं. या जीवनसत्त्वाचा उपयोग चेहे-यावर नैसर्गिक तेज आणण्यासाठी होतो. तसेच लिंबू पाण्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. शरीराला जर पाणी कमी पडलं तर पाय सूजतात, डोळ्याखाली सूज येते , सूस्तपणा येतो. हे सर्व टाळण्यासाठी लिंबू पाणी भरपूर प्यावं. आणि सकाळी उठल्यानंतर आधी लिंबू-मध पाणी घ्यावं. शिवाय संत्र्याचा रस घरच्याघरी तयार करून तो नियमित घेतला तरी चेहेरा तजेलदार होतो. 

3. पोटॅशिअम

पोटॅशिअमयुक्त फळं हे या काळात खूपच उपयुक्त असतात. त्यामुळे केळ, पपई, डाळिंब ही फळं, जर्दाळू सारखा सुका मेवा नियमित खावा. यामुळे शरीरातील पाणी आणि खनिजाची पातळीत समतोल राहातो. या फळांनी लग्नामुळे मनातली भीती, ताण कमी होतो. उत्साही वाटतं.

 

4. चिया सीडसचिया सीडस त्वचेसाठी खूपच उपयुक्त असतात. चिया सीडसमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असतं. जे पेशींची क्षमता वाढवतं. यामुळे त्वचा चमकदार होते. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडमुळे पेशींची पोषक घटक सेवन करण्याची आणि विषारी घटक बाहेर टाकण्याची क्षमता वाढते. ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडमुळे ताण वाढवणारी संप्रेरकं क्षीण होतात.

5. लीन प्रोटीन हा घटक असलेले काजू, शेंगदाणे यांचा समावेश आहारात असावा. यामुळे तृप्तता वाढते आणि तेलकट, तुपकट पदार्थ खाण्याची लालसा कमी होते.

6. पालक, ब्रोकोली, हंगामी बेरी फळं यामध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅण्टिआॅक्सिडंट असतात. यांचं सेवन केल्यास आजारी पडण्याचा धोका कमी होतो. शिवाय आतड्यांची कार्यक्षमता वाढून पचनाचे विकार होत नाही.

7. लग्न ठरल्यानंतर आहाराचा विचार करताना दिवसभरातलं कोणतंच जेवण चुकवायचं नाही हा नियम करावा. दिवसभरातून तीन ते चार वेळेस योग्य आहार घ्यायला हवा. यामुळे शरीरास आवश्यक असणारी ऊर्जा वेळेवर मिळते. आणि आपोआपच त्याचे सकारात्मक परिणाम चेहे-यावर दिसतात.