शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

वजन कमी करायचंय तर मग हे प्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 7:01 PM

आहारातलं काहीही कमी जास्त न करताही वजन कमी करणं सहज शक्य आहे. त्यासाठी काही पेयं नक्कीच मदत करू शकतात.

ठळक मुद्दे* वजन कमी करण्यात पाण्याची भूमिका मोठी असते.* भाज्या उकडून ते पाणी जि-यामि-याची फोडणी देवून, चवीपुरती मीठ घालून सूप म्हणून पिल्यास त्याचा वजन कमी होण्यास चांगला फायदा होतो.* ग्रीन टी हे वजन नियंत्रित करणारं महत्त्वाचं पेय आहे.जर दिवसातून दोन वेळेस ग्रीन टी पिल्यास त्याचा उत्तम फायदा होतो.

- माधुरी पेठकर.जगातली सर्वात अवघड गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे वजन कमी करणं. वजन कमी करण्यासाठी आहार, व्यायामशैलीत जी नियमितता लागते तीच ठेवणं, नियम पाळणं अवघड असतं. वजन कमी करण्याचा संकल्प जास्तीत जास्त चार दिवस टिकू शकतो. पुढे मग ती आपल्या बस की बात होत नाही. आणि वजन घटवणं हे अपूर्ण स्वप्न आणि अतृप्त इच्छाच राहाते.वजन कमी करण्यासाठी अमूक खा, एवढंच खा, तमूक अजिबात खाऊ नका असा नियम लावला की तो पाळणं कठीण होतं. व्यायाम तर नकोसाच वाटतो. हे असं असेल तर वजन कमी होणार कसं?पण आहारातलं काहीही कमी जास्त न करताही वजन कमी करणं सहज शक्य आहे. त्यासाठी काही पेयं नक्कीच मदत करू शकतात. 

 

1) पाणी

पाणी हे आरोग्यासाठी किती आवश्यक आहे हे वेगळं सांगायला नको. पण वजन कमी करण्यातही पाण्याची भूमिका मोठी असते. योग्य प्रमाणात पाणी पिल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, पचन क्रिया व्यवस्थित काम करते. त्यामुळे वजन कमी करण्याचा उपाय म्हणून पाण्याचाही उपाय करता येतो. व्यायामापूर्वी पाणी पिताना ते कोमट आणि त्यात लिंबू पिळून घेतल्यास व्यायामात अधिक फॅटस कमी होतात. 

2) भाज्यांचं सूप

भाज्या उकडून ते पाणी जि-यामि-याची फोडणी देवून, चवीपुरती मीठ घालून सूप म्हणून पिल्यास त्याचा वजन कमी होण्यास चांगला फायदा होतो. एकतर या भाज्या उकडलेल्या पाण्यामध्ये खूप पोषणमूल्यं असतात . आणि जेवणाआधी हे सूप घेतल्यानं जेवणं करताना आपोआपच ते मर्यादित प्रमाणात घेतलं जातं. 

 

3) ग्रीन टी

ग्रीन टी हे वजन नियंत्रित करणारं महत्त्वाचं पेय आहे. हा चहा पिल्यानं शरीरातील साखर नियंत्रित राहाते. जर दिवसातून दोन वेळेस ग्रीन टी पिल्यास त्याचा उत्तम फायदा होतो. ग्रीन टी पिल्यानं केवळ वजनच नियंत्रित राहातं असं नाही तर ग्रीन टीमधले घटक आपल्या शरीराचं वेगवेगळ्या रोगापासून संरक्षण करतं. तसेच आपली रोगप्रतिकाराशक्तीही वाढवते. 

 

4) भाज्यांचं ज्यूस.

जो फायदा भाज्यांच्या सूपमुळे शरीरास मिळतो तोच फायदा भाज्यांचं ज्यूस प्यायल्यानं मिळतो. त्यामुळे भाज्यांचं सूप हे पावसाळा आणि हिवाळ्याच्या काळात प्यावं तर भाज्यांचं ज्यूस हे उन्हाळ्यात प्यावं. भाज्यांचं ज्यूस घेताना त्यात सोडियमचं प्रमाण जास्त असणार नाही याची काळजी घ्यावी. 

 

 

5) कोरी कॉफीअनेकदा पोट बिघडल्यानंतर कोरी कॉफी घेतात. पण हीच कोरी कॉफी वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते. को-या कॉफीमुळे चयापचय क्रिया सुधारते. को-या कॉफीनं चरबी वेगानं कमी होते. तसेच को-या कॉफीमुळे जास्त उष्मांक जळतात. बैठी जीवनशैली असल्यास वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कोरी कॉफी ही उत्तमच. पण कोरी कॉफी जर उपाशी पोटी घेतल्यास किंवा दोन पेक्षा जास्त वेळी घेतल्यास त्याचा चयापचयक्रियेवर नकारात्मक परिणाम होवू शकतो. 

 

 

6) सायविरहित दूध.

सायविरहित दूध प्यायल्यानं शरीरास दूध पिण्याचे जे फायदे मिळायचे असतात ते मिळतात. शरीरास आवश्यक असे प्रोटीन मिळतात. हाड मजबूत करणारी जीवनसत्त्वं मिळतात. शिवाय साय नसल्यानं वजन वाढवणारे उष्मांक मिळत नाही.