शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

खजुराचा गुळ एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 16:43 IST

गुळ आपल्या खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. अत्यंत प्राचीन काळापासून भारतीय व्यंजनांमध्ये गुळाचा वापर करण्यात येतो. संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी गुळ तयार होतो. तसेच गुळ वेगवेगळ्या प्रकारचा असतो.

गुळ आपल्या खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. अत्यंत प्राचीन काळापासून भारतीय व्यंजनांमध्ये गुळाचा वापर करण्यात येतो. संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी गुळ तयार होतो. तसेच गुळ वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ऊसापासून तयार करण्यात आलेला गुळ, पामच्या झाडापासून आणि खजुराच्या झाडापासून तयार करण्यात आलेला गुळ. अनेक प्रांतामध्ये ऊसापासून तयार केलेला गूळ आणि पामच्या झाडापासून तयार केलेला गुळ आढळून येतो परंतु खजुराच्या झाडापासून तयार केलेला गुळ मात्र संपूर्ण भारतात फक्त पश्चिम बंगालमध्ये तयार करण्यात येतो. या गुळाचे उत्पादन फक्त हिवाळ्यात करण्यात येते. इतर गुळांपेक्षा खजुराच्या झाडापासून तयार करण्यात आलेला गुळ फार वेगळा असतो. त्याची चव आणि सुगंधही फार निराळा असतो. या गुळापासून अनेक पदार्थ तयार करण्यात येतात. फक्त त्या पदार्थांमध्ये साखरेऐवजी खजुराच्या गुळाचा वापर करण्यात येतो. 

खजुराचा गुळ हा खजुराच्या झाडामधून निघणाऱ्या चिकापासून तयार करण्यात येतो. खजुराच्या झाडाच्या खोडाला एक चीर देऊन त्यातून बाहेर येणारा चिक एका भांड्यामध्ये साठवून ठेवण्यात येतो. या भांड्यामध्ये चीक जमा झाला की, तो चीक एका लोखंडाच्या कढईमध्ये आटवण्यात येतो. आठवल्यानंतर हा चिक घट्ट होतो. त्यानंतर हा चिक थंड केला जातो. तो थंड झाल्यानंतर त्याच्या ढेपा केल्या जातात. 

हा गुळ फक्त थंडीतच केला जातो. उन्हाळ्यात हा गुळ आबंतो त्यामुळे त्याची चव बिघडते. हा गुळ तयार करण्यासाठी कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. हा पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने तयार करण्यात येतो. 

सध्या खजुराच्या गुळाचे उत्पादन घरगुती पद्धतीने होत असल्यामुळे ते फार कमी होते. या ठिकाणची झाडं पाडल्यामुळे येथील गुळ उत्पादनावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. 

खजुराच्या गुळाचे आरोग्यदायी फायदे :

- गुळ उष्ण असल्यामुळे हिवाळ्यातच याचा समावेश  आहारात करणं फायदेशीर ठरतं. 

- गुळ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

- अनेक जीवनसत्वे आणि कर्बोदकं असल्यामुळे शरीराला उत्साहपूर्ण ठेवण्यासाठी गुळ उपयोगी ठरतो. 

- गुळात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी खनिज तत्वे असतात.

- खजुराच्या गुळाचा नियमित आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होते.

- खजुराच्या गुळात आयर्न असल्यामुळे हा गूळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते आणि शरीराला अनेमियापासून संरक्षण देते.

- थंडीमुळे झालेल्या सर्दी आणि खोकल्यावरही गूळाचे सेवन करणं उपयुक्त ठरते. 

टॅग्स :ReceipeपाककृतीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य