शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

जेवणात मीठ जास्त झालयं का? गोंधळून जाऊ नका; 'हे' उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 14:06 IST

जेवणातील अविभाज्य घटक म्हणजे मीठ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मिठाशिवाय जेवण अपूर्णच असतं. त्याचप्रमाणे पदार्थांमध्ये मीठ नाही घातलं तर जेवणाला चवच येत नाही. चिमूटभर मीठ पदार्थात पडलं तर त्यामुळे पदार्थ रूचकर होण्यास मदत होते.

जेवणातील अविभाज्य घटक म्हणजे मीठ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मिठाशिवाय जेवण अपूर्णच असतं. त्याचप्रमाणे पदार्थांमध्ये मीठ नाही घातलं तर जेवणाला चवच येत नाही. चिमूटभर मीठ पदार्थात पडलं तर त्यामुळे पदार्थ रूचकर होण्यास मदत होते. पण जेवणात मिठाचं प्रमाण योग्य असणं गरजेचं असतं. हे प्रमाण थोडं कमी किंवा थोडं जास्त झालं तर संपूर्ण पदार्थाची चव बिघडू शकते. म्हणजेच मीठ असणं जेवणात गरजेचं असतं परंतु त्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं असतं. पण बऱ्याचदा असं होतं की, गडबडीमध्ये आपल्याकडून मिठाचं प्रमाण जास्त होतं आणि पदार्थ खारट होतो. अशावेळी काय करावं ते सुचतं नाही. पदार्थ पुन्हा तयार करणं शक्य नसतं. अशावेळी त्याच पदार्थाचा खारटपणा कमी करणं सहज शक्य असतं. 

पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण जास्त झालं किंवा पदार्थ खारट झाला तर पुढील उपाय करा -

तूप -

पदार्थामध्ये मीठ जास्त झाल्यास त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे पदार्थातील मिठाचं प्रमाण संतुलित रहातं. 

लिंबाचा रस - 

तुम्ही तयार केलेल्या भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर त्यामध्ये लिंबाच्या रसाचे 4 ते 5 थेंब टाकावे. त्यामुळे मिठांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि भाजीची चवही बिघडणार नाही. 

बटाटा -

जर तुम्ही रस्सा भाजी किंवा वरण बनवताना मीठ जास्त झालं असेल तर अशावेळी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. त्यामध्ये बटाट्याचे काप घाला. बटाटा पदार्थातील मीठ शोषून घेईल त्यामुळे त्याची चव सामान्य होईल. थोड्या वेळाने बटाट्याचे काप काढून घ्या. उकडलेल्या बटाट्यांचा वापर करणं फायदेशीर ठरेल. 

चण्याची डाळ -

भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास त्यामध्ये चण्याची डाळ घालणं फायदेशीर ठरतं. त्यासाठी 2 ते 3 चमचे चण्याची डाळ पाण्यात भिजत घालावी. 

दही - 

एखादा पदार्थ खारट झाल्यास त्यामध्ये शक्य असल्यास तुम्ही दह्याचा वापर करू शकता. त्यामध्ये 2 ते 3 चमचे दही घाला. त्यामुळे जास्त झालेल्या मिठाचं प्रमाण संतुलित होण्यास मदत होईल. 

ब्रेड -

रस्सा भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास त्यामध्ये ब्रेडचे तुकडे घालणं फायदेशीर ठरतं. ब्रेड भाजीतील एक्सट्रा मीठ शोषून घेतो. त्यामुळे खारटपणा कमी होण्यास मदत होते. 

काजू - 

पदार्थातील खारटपणा दूर करण्यासाठी काजूची पेस्टही फायदेशीर ठरते. त्यामुळे भाजीला वेगळी चव मिळण्यासोबतच मिठाचंही प्रमाण कमी होण्यास मदत होईल. 

पीठ (कणीक) -

एखाद्या पदार्थातील मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही पीठाचा वापर करू शकता. त्यामुळे पदार्थाचा खरटपणा कमी होतो. यासाठी पीठाचे 2 ते 3 लहान गोळे पदार्थामध्ये टाका. जास्त मीठ शोषून घेईल. काही वेळाने पीठाचे गोळे काढून टाका. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स