शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

दररोजच्या आहारातील हे 7 पदार्थ 10 वर्षांपर्यंत टिकतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 13:35 IST

कोणताही खाण्याचा पदार्थ तुम्ही तोपर्यंत खाऊ शकता, जोपर्यंत तो खराब होत नाही. एखादा पदार्थ जास्तीत जास्त 10 दिवसांपर्यंत टिकतो. पण आज काही अशा पदार्थांबाबत जाणून घेऊयात जे पदार्थ 10 दिवस नाही तर जवळपास 10 वर्षांपर्यंत टिकतात.

कोणताही खाण्याचा पदार्थ तुम्ही तोपर्यंत खाऊ शकता, जोपर्यंत तो खराब होत नाही. एखादा पदार्थ जास्तीत जास्त 10 दिवसांपर्यंत टिकतो. पण आज काही अशा पदार्थांबाबत जाणून घेऊयात जे पदार्थ 10 दिवस नाही तर जवळपास 10 वर्षांपर्यंत टिकतात. ऐकून थोडं नवल वाटलं असेल ना? जाणून घेऊयात आपल्या रोजच्या वापरातील अशा काही पदार्थांबाबत ज्यांचा वापर तुम्ही 10 वर्षांनंतरही करू शकता. 

1. राजमा

राजमा एक असा पदार्थ आहे जो तुम्ही काही वर्षांनंतरही वापरू शकता. अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, राजमा किंवा काही कडधान्य 30 वर्षांपर्यंत साठवून ठेवता येऊ शकतं. 

2. मीठ

मिठाशिवाय आपलं जेवणं अपूर्ण समजलं जातं. आपल्या रोजच्या वापरातील मीठ हे दीर्घकाळ टिकणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. मीठ नीट साठवून ठेवलं तर ते अनेक वर्ष टिकते. 

3. मध

मध तयार करताना त्यामध्ये केमिकल्स मिक्स करण्यात येतात. त्यामुळे ते वर्षानुवर्षे टिकण्यास मदत होते. जर मध सीलपॅक डब्ब्यामध्ये ठेवलं तर ते कधीच खराब होत नाही. तुम्ही अनेक वर्ष ते वापरू शकता. 

4.  व्हाइट व्हिनेगर

व्हाइट व्हिनेगरचा वापर फिश फूड तयार करण्यासाठी करण्यात येतो. फक्त खाण्याच्या पदार्थांमध्येच नाही तर घरातील स्वच्छतेसाठीही याचा वापर केला जातो. हे व्हिनेगर थंड आणि प्रकाश नसलेल्या ठिकाणी ठेवलं तर ते कधीच खराब होत नाहीत. 

5. साखर

साखर एक असा पदार्थ आहे ज्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका नसतो. त्यामुळे साखर वर्षानुवर्ष साठवून ठेवता येते. फक्त त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे साखर बरेच दिवस साठवून ठेवायची असले तर ती एअरटाइट कंटेनरमध्ये साठवून ठेवावी. 

6. सोया सॉस

सोया सॉसमध्ये सोडियमची मात्रा अधिक असते. त्यामुळे यामध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण फार कमी असते. जर व्यवस्थित ठेवलं तर सोया सॉस अनेक वर्ष सोया सॉस जसाच्या तसा राहतो. 

7. तांदूळ

जर तुम्ही कच्चे तांदूळ पाणी आणि बाष्पापासून दूर ठेवले तर त्याचा उपयोग 30 वर्षांनंतरही करता येतो. तांदूळ व्यवस्थित स्टोअर करून ठेवण्यासाठी शक्य तो 4.5 डिग्री सेल्सिअस तापमान असणं गरजेचं आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य