शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोणत्या वेळी केळी खाणं जास्त फायदेशीर?; जाणून घ्या आयुर्वेदाचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 12:44 IST

फळं खाताना अनेकांच्या मनात हा प्रश्न असतोच की, कोणतं फळं कधी खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं? सर्व फळांमधील केळींबाबत म्हणायचं झालचं, तर जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की, हे सकाळी नाश्त्याच्या वेळी खाणं जास्त फायदेशीर ठरतं.

फळं खाताना अनेकांच्या मनात हा प्रश्न असतोच की, कोणतं फळं कधी खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं? सर्व फळांमधील केळींबाबत म्हणायचं झालचं, तर जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की, हे सकाळी नाश्त्याच्या वेळी खाणं जास्त फायदेशीर ठरतं. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहित नसतं की, केळी खाण्याची योग्य वेळ काय असते? आयुर्वेदामध्ये याबाबत सांगण्यात आलं आहे. जाणून घेऊया नक्की केळी खाण्याची योग्य वेळ काय?

अनेकांचा आवडता नाश्ता आहे दूध आणि केळी

केळी आणि दूध जुन्या काळापासून अनेकांचा आवडता आहार झाला आहे. अनेकदा लोक याचं सेवन वजन वाढविण्यासाठी करतात. केळ्यामुळे त्यांना लगेच ऊर्जा मिळते. पण सकाळच्या वेळीचं दूध आणि केळी खाणं फायदेशीर ठरतं? अद्यापही अनेक लोकांना केळी खाण्याची योग्य वेळ माहीत नाही. 

जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे : 

केळी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात याबाबत कोणाचेच दुमत नाही. हृदयाच्या समस्या दूर करण्यासाठी आणि शरीराचा थकवा दूर करण्यासाठई केळी अत्यंत फायदेशीर ठरतात. ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी, बद्धकोष्ट आणि आल्सरच्या समस्या दूर करण्यासाठी केळी मदत करतात. केळी खाल्याने शरीराचं तापमानही नियंत्रित राहण्यास मदत होते. तसं पाहायला गेलं तर केळी कधीही खाण्यात येतात. पण खरचं केळी खाण्याची योग्य वेळा काय आहे? हे अनेकांना माहीत नसते. 

अनोशापोटी खाऊ नका

सकाळच्या नाश्त्यामध्ये केळीचा समावेश करणं उत्तम आहे. परंतु, अनोशापोटी खाणं शक्यतो टाळावं. केळीसोबत ड्रायफ्रुट्स, सफरचंद आणि इतर फळांचंही सेवन करावं. ज्यामुळे शरीरामध्ये आम्लीय पदार्थांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. केळीमध्ये असलेलं मॅग्नेशियम रक्तामध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमची पातळी बिघडवण्याचं काम करतं. यामुळे कार्डियोवास्कुलर सिस्टमवर परिणाम होऊ शकतो. हृदयाच्या आरोग्यासाठी अनोशापोटी केळी खाणं योग्य नाही. 

ही नाही योग्य वेळ 

सकाळी अनोशापोटी केळी खाल्याने भूक मरते. हे शरीरासाठी फायदेशीर ठरत नाही. अनेक लोक रात्री झोपण्यापूर्वी केळी खातात. शक्यतो असं करणंही टाळावं. कारण रात्री केळी खाल्याने तुम्ही आजारी पडू शकता. रात्री केळी खाल्याने खोकल्याची समस्या होऊ शकते. काय म्हणतं आयुर्वेद?

आयुर्वेदानुसार, ब्रेकफास्ट केल्यानंतर केळी खाणं फायदेशीर ठरतं. केळी खाण्याची योग्य वेळ सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंतची आहे. पण लक्षात ठेवा. नाश्ता केल्यानंतरच केळी खाणं फायदेशीर ठरतं. आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्यापोटी फळं खाणं शक्यतो टाळावं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्स