शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Diwali 2019 : फराळासाठी खास खमंग बेसनाचे चवदार लाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 16:39 IST

दिवाळी म्हणजे, उत्साह त्याला फराळाची जोड. दिवाळी हा शब्द ऐकताच जीभेवर चव रेंगाळते ती, दिवाळीच्या फराळाची. अशातच जर कानावर बेसनाच्या लाडूचं नाव पडलं तर मग काही पाहायलाच नको.

दिवाळी म्हणजे, उत्साह त्याला फराळाची जोड. दिवाळी हा शब्द ऐकताच जीभेवर चव रेंगाळते ती, दिवाळीच्या फराळाची. अशातच जर कानावर बेसनाच्या लाडूचं नाव पडलं तर मग काही पाहायलाच नको. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण चवीने खाणारे बेसनाचे लाडू मुळचे आपल्याकडचे नाहीच. उत्तर भारतातून आपल्याकडे आलेला हा पदार्थ पाहता पहता कधी आपला झाला समजलचं नाही. एवढचं नाहीतर या पदार्थाने दिवाळीच्या फराळामध्येही आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं. मुख्य म्हणजे, हे लाडू तयार करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि चव म्हणाल तर भारीच. कधी तोंडात विरघळून जातात समजतच नाही. 

बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये दिवाळीचा फराळ घरी तयार करणं शक्य होत नाही. तसेच अनेकदा बाजारातून विकत आणण्याची इच्छा होत नाही. अशातच तुम्ही थोडासा वेळ काढून घरच्या घरी हे लाडू तयार करू शकता. 

साहित्य :

  • 1 कप बेसन
  • 3 बारीक तुकडे केलेले बदाम 
  • ¼ टीस्पून वेलची पावडर
  • 50 ग्रॅम तूप
  • 3 बारीक कापलेले काजू
  • 70 ग्रॅम साखर 

 कृती :

- सर्वात  आधी एखा पॅनमध्ये तूप गरम करून घ्या. 

- तूप वितळल्यानंतर त्यामध्ये बेसन एकत्र करून 10 ते 20 मिनिटांपर्यंत भाजून घ्या. 

- जेव्हा बेसन हलक्या सोनेरी रंगाचे दिसू लागेल तेव्हा त्यामध्ये वेलची पावडर, काजू आणि बदामाचे तुकडे टाकून एकत्र करा. 

- मिश्रण एकजीव झाल्यानंतर गॅसवरून उतरवून थंड होण्यासाठी ठेवा. 

- जेव्हा हे थंड होईल त्यानंतर त्यामध्ये साखर टाकून एकत्र करून घ्या.

- व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर त्याचे लाडू वळून घ्या. 

-  झटपट तयार झालेले गोड गोड बेसनाचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत. 

टॅग्स :DiwaliदिवाळीReceipeपाककृतीHealthy Diet Planपौष्टिक आहार