शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

नारळ खाणार त्याला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 20:38 IST

पानक पिताना आपण पन्ह पितोय का असेच सुरवातीला वाटते.

ठळक मुद्देभाकरीबरोबर कैरी उडद मेथी, चणे सुरण करी, , जीरे, मिरे कढी, पांढरा वाटाणा आणि लाल भोपळ््याची भाजी अशा काही नारळाच्या करीत केलेल्या भाज्या खाताना मजा आली. त्यामुळे जिव्हातृप्तीसाठी हे पदार्थ खायचा नक्की प्रयत्न करा.

भक्ती सोमणजागतिकीकरणामुळे पाश्चात्य जगातले बरेचसे पदार्थ आता भारतात चांगलेच स्थिरावले आहेत. किंबहुना तेच पदार्थ आवडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आपल्या मातीतले, संस्कृतीतले पदार्थ टिकवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. त्यातूनच कम्युनिटी फूड ही संकल्पना संध्या जोरावर आहे. आपल्या घरी, किंवा एका ठिकाणी लोकांना बोलवून आप आपल्या प्रांतातले पदार्थ यात खिलवण्यात येतात. या कंसेप्टला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. ब्राम्हणी, सीकेपी, सारस्वत, कारवारी, मालवणी पंजाबी, अवधी, पारशी अशा कितीतरी कम्यूनिटीजच्या थाळी म्हणून तर लोकप्रिय होत आहेत. इथे तुम्हाला त्या त्या कम्युनिटीचे अस्सल चवीचे पदार्थ खायला मिळतातच. म्हणून तर अशा थाळ्यांना एक विशेष महत्व आहे.आता हेच बघा ना, नारळ घालून केलेले पदार्थ हे प्रामुख्याने कोकणपट्टी भागात जास्त आढळतात. तेच सोलापूर सारख्या भागात भरपूर प्रमाणात शेंगदाण्याचा वापर केला जातो. विदर्भात सुक्या खोबऱ्याचा वापर मसाल्यात जास्त आढळतो. असे कित्येक बदल दर कोसावर आपल्या खाद्यसंस्कृतीत दिसतात. नारळाचा सढळ हस्ते वापर कारवारी खाद्यपदार्थात मोठ्या प्रमाणावर आढळतो. कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला भाग म्हणजे कारवार. त्यामुळे इथे नारळाचा वापर जेवणात सढळहस्ते केला जातो. महाराष्ट्रीय जेवणात जसे गोडा मसाल्याला, गरम मसाल्याला महत्व असते. तसेच महत्व कारवारमध्ये नारळाला असते. आपले मसाले आपण वर्षभरासाठी करून ठेवतो. पण तिथे ताजा ताजा मसाला करावा लागतो. त्यात नारळाबरोबर धणे,चिंच, आणि लाल मिरच्यांचा वापर केला जातो. त्यामुळे पदार्थाला रंग जरी लाल आला तरी चवीला मात्र सौम्य आणि चटकदार असतात. नारळ, भात आणि मासे या तीन पदार्थांशिवाय कारवारी भोजन पूर्णच होत नाही.अशी कारवारी चवदार चव नुकतीच माधवी कामत यांच्यामुळे चाखायला मिळाली. मुळच्या कारवारच्या असलेल्या माधवी कामत यांच्या कारवारी जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी सध्या अंधेरीच्या कोहिनूर कॉन्टिनेंटलमध्ये मिळू शकते. तिथे शाकाहारी आणि मासांहारी असे अस्सल कारवारी प्रकारचे जेवण हा एक निराळा अनुभव आहे. नारळापासून इतके सुंदर आणि चविष्ट प्रकार ही या जेवणाची खासियत आहे.आपल्याकडे ज्याप्रमाणे पन्हे केले जाते त्याप्रमाणे तिकडे पानक केले जाते. पानक पिताना आपण पन्ह पितोय का असेच सुरवातीला वाटते. पण साध्या पाण्यात गूळ, वेलची पावडर, लिंबू, किंचित आलं आणि काळी व पांढरी मिरी क्रश करून हे पानक केले जाते. याशिवाय पुरणाचा सुरकुंड्या हा प्रकारही वेगळा होता. भाकरीबरोबर कैरी उडद मेथी, चणे सुरण करी, , जीरे, मिरे कढी, पांढरा वाटाणा आणि लाल भोपळ््याची भाजी अशा काही नारळाच्या करीत केलेल्या भाज्या खाताना मजा आली. असे जिव्हा तृप्त करणारे कितीतरी पदार्थ होते. मुंबईमध्ये कारवारी लोक भरपूर आहेत. पण प्रत्येकाला कारवारी जेवण करता येतंच असं नाही असे माधवी कामत यांनी सांगितले. त्यामुळे जिव्हातृप्तीसाठी हे पदार्थ खायचा नक्की प्रयत्न करा.

टॅग्स :foodअन्नMumbaiमुंबई