शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

हिवाळ्यात संत्री खाण्याचे मिळतात अनेक फायदे, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 13:04 IST

Orange Benefits :थंडीच्या दिवसात इम्युनिटी वीक झाल्याने सतत सर्दी-खोकला होत राहतो. संत्री इम्यून सिस्टीम मजबूत करतं आणि आजारांपासून बचाव करतं.

Orange Benefits : हिवाळ्यात बाजारात वेगवेगळी फळं अधिक मिळतात. यातील एक महत्वाचं फळ म्हणजे संत्री. या दिवसात संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येतं. जे शरीराच्या इम्युनिटीसाठी फार गरजेचं असतं. थंडीच्या दिवसात इम्युनिटी वीक झाल्याने सतत सर्दी-खोकला होत राहतो. संत्री इम्यून सिस्टीम मजबूत करतं आणि आजारांपासून बचाव करतं.

हिवाळ्यात रोज संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. अनेकांना असं वाटतं की, संत्री खाल्ल्याने खोकला होईल. पण तसं नाहीये. त्याचे अनेक फायदे होतात. संत्र्यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरून राहतं. ज्यामुळे जास्त खाणं टाळलं जातं. त्यामुळे तुमचं वजन वाढत नाही. तसेच यामुळेच कॅलरीचं प्रमाणही कमी होतं.

संत्री खाल्ल्याने किडनी स्टोन होण्याचा धोकाही कमी होतो. लघवीमध्ये सायट्रेटचं प्रमाण कमी असल्याने किडनी स्टोन होऊ शकतो. सायट्रेट एक सायट्रिक अॅसिड असतं जे सामान्यपणे संत्रीसारख्या आंबट फळांमध्ये आढळून येतं. किडनी स्टोन झालेल्या लोकांना सामान्यपणे संत्र्याचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. याने लघवीतील सायट्रिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो.

आंबट फळं खाऊन स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. असं मानलं जातं की, संत्र्यामध्ये असलेलं फ्लेवोनोइड्स हृदयरोग वाढण्याचा धोका कमी करतं. यासोबतच याने ब्लड सेल्सचं फंक्शनही अधिक चांगलं होतं.

संत्री केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर असतं. याने त्वचा तजेलदार राहते. याने त्वचेवरील दाग, पिंपल्स दूर होतात.

कोणत्या वेळी खावेत?

तशी तर संत्री तुम्ही कोणत्याही वेळी खाऊ शकता. पण तुम्हाला याचा जास्त फायदा मिळवायचा असेल तर काही खास वेळांवर खावेत.

सकाळी

सकाळी नाश्त्यात संत्री खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्व भरपूर प्रमाणात मिळतात. सोबतच तुम्हाला फ्रेश वाटतं आणि दिवसभर ऊर्जा मिळते.

जेवणानंतर

जेवणानंतर संत्री खाल्ल्याने पचनक्रिय चांगली होण्यास मदत मिळते. पोट हलकं होतं. संत्र्याच्या रसात असे तत्व असतात ज्याने अॅसिडिटी कमी होते.

वर्कआउटनंतर

जर तुम्ही एक्सरसाईज करत असाल तर संत्री खाल्ल्याने शरीराल आवश्यक पोषण आणि एनर्जी मिळेल. याने मांसपेशी रिकव्हर होतात आणि शरीर हायड्रेटेड राहतं. 

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स