​संग्राम साळवीने घेतली त्याच्या आयुष्यातील पहिली कार...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 11:46 AM2017-12-18T11:46:08+5:302017-12-19T09:56:52+5:30

स्टार प्रवाहच्या ‘कुलस्वामिनी’ या मालिकेतील राजस या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या संग्राम साळवीवर कुलस्वामिनीची कृपा झाली आहे. स्वत:ची कार घेण्याची ...

Salman took the first car in his life ... | ​संग्राम साळवीने घेतली त्याच्या आयुष्यातील पहिली कार...

​संग्राम साळवीने घेतली त्याच्या आयुष्यातील पहिली कार...

googlenewsNext
टार प्रवाहच्या ‘कुलस्वामिनी’ या मालिकेतील राजस या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या संग्राम साळवीवर कुलस्वामिनीची कृपा झाली आहे. स्वत:ची कार घेण्याची संग्रामची इच्छा नुकतीच पूर्ण झाली आहे. संग्रामचे हे स्वप्न पूर्ण झाल्याने संग्राम सध्या प्रचंड खूश आहे.
स्टार प्रवाहच्या ‘कुलस्वामिनी’ या मालिकेत संग्राम राजस ही भूमिका साकारत आहे. संग्रामने या पूर्वी स्टार प्रवाहच्या ‘देवयानी’ या मालिकेत काम केले होते. ‘देवयानी’ ही मालिका आणि संग्रामची या मालिकेतील भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. संग्रामचा लुक आणि संग्रामचा संवाद 'तुमच्यासाठी काय पण!" महाराष्ट्रभर लोकप्रिय ठरला होता. या मालिकेनेच संग्रामला एक ओळख मिळवून दिली. ‘देवयानी’ मालिकेनंतर स्टार प्रवाहने संग्रामला पुन्हा एकदा ‘कुलस्वामिनी’ या मालिकेच्या रूपाने मोठी संधी दिली. वेगळे कथानक असलेल्या या मालिकेलाही प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. कार घेण्याच्या स्वप्नाविषयी संग्राम सांगतो, 'बऱ्याच काळापासून स्वत:ची कार हवी अशी माझी इच्छा होती. मात्र, काही ना काही कारणाने ते शक्य होत नव्हते. स्टार प्रवाहने केवळ मला अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली असे नाही, तर आर्थिक स्थैर्य देखील दिले. त्यामुळेच हे शक्य झाले. ‘कुलस्वामिनी’ ही मालिका सुरू झाल्यानंतर कार घेण्याचा विचार मी प्रत्यक्षात आणू शकलो. स्टार प्रवाहने कायमच माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्यांनी दिलेल्या संधीचे मी सोने करण्याचा प्रयत्न केला आहे.'
कुलस्वामिनी ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असले तरीही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली आहे. रेणुका मातेची महती सांगताना आस्तिक नास्तिकतेचा संघर्ष या मालिकेतून दाखवला जात आहे. या मालिकेतील संग्रामच्या राजस या व्यक्तिरेखेला अनेक पैलू आहेत. लहानपणीच त्याची आई गेली असून त्याचे वडिलांशी कधी पटलेले नाही आणि वडिलांनी त्याला कधी समजूनही घेतले नाही. त्यामुळे वडिलांच्या मनाविरूद्ध तो नेहमी वागतो. मात्र, त्याच्या मनात मायेचा ओलावाही आहे. संग्रामला 'राजस बोलला, विषय संपला' असा खणखणीत संवाद मिळाल्यामुळे या व्यक्तिरेखेला अजून आयाम मिळाले आहेत. हा संवाद सध्या चांगलाच गाजत आहे. 

Also Read : का रडतोय कुलस्वामिनी फेम संग्राम साळवी?

Web Title: Salman took the first car in his life ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.