शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियामध्ये ‘विनिंग कम्पोझिशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 04:17 IST

सध्याचा भारतीय संघ हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून ख्याती मिळवितो आहे. 

दोनपेक्षा अधिक खेळाडू असलेला कोणताही खेळ असो, यात संघभावनेला प्रथम स्थान दिले जाते. एखादा खेळाडू मागे पडत असेल तर त्याची पाठराखन करीत दमदार खेळी करणारा दुसरा खेळाडू हमखास विजय खेचून आणू शकतो.  नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची नेत्रदीपक कामगिरी याचेच उदाहरण आहे. संतुलित संघ हा विजयाचा मानकरी ठरतो असे क्रिकेटचे जाणकार म्हणतात. आशिया चषकात भारतीय संघाने सहा सामने खेळले या सहाही सामन्यात भारताला विजय मिळाला. गोलंदाज व फलदाजांचे संतुलन व सर्वोत्तम कामगिरी या स्पर्धेदरम्यान पहावयास मिळाली. सध्याचा भारतीय संघ हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून ख्याती मिळवितो आहे.आयसीसी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी असून हा संघ आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा समतोल संघ आहे का, असा प्रश्न ‘सीएनएक्स’ने क्रिके ट चाहत्यांना विचारला. उणीवा असल्या तरी हा सर्वोत्तम आहे असे मत चाहत्यांनी यावेळी नोंदविले. सध्याचा भारतीय क्रिकेट संघात ‘विनिंग कम्पोझिशन’ असल्याचे त्यांनी सांगितले.फुटबॉल, हॉकी पासून ते क्रिकेटपर्यंत सर्वंच खेळाच्या बाबतीत समतोल संघ विजयाचा मानकरी असतो असे म्हटले जाते. क्रिकटच्या बाबतीत तर ही भावना हमखास बोलून दाखविली जाते. भारतीय उपखंडातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेटला मान्यता मिळाली आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका व बांग्लादेश क्रिकेट संघाला कसोटी दर्जा मिळालाच आहे, मात्र या शिवाय नेपाळ व अफगानिस्तान या देशांत सुद्धा क्रिकेटची लोकप्रियता वाढत आहे.भारत, श्रीलंका, पाकिस्तान या देशांनी वर्ल्डकप जिंकल्याने सर्वोत्त्कृष्ट खेळाडूचा समावेश असलेला समतोल संघ म्हणून त्यांनी ख्याती मिळविली आहे. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिके टमध्ये अनेक विक्रम केले आहेत. या खेळाडूंच्या कामगिरीमुळे अनेक आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाला विजेतेपदाला गवसणी घालता आली. याच संघभावनेतून भारत जगज्जेता ठरेल, असा विश्वास शहरातील क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे.