शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

टीम इंडियामध्ये ‘विनिंग कम्पोझिशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 04:17 IST

सध्याचा भारतीय संघ हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून ख्याती मिळवितो आहे. 

दोनपेक्षा अधिक खेळाडू असलेला कोणताही खेळ असो, यात संघभावनेला प्रथम स्थान दिले जाते. एखादा खेळाडू मागे पडत असेल तर त्याची पाठराखन करीत दमदार खेळी करणारा दुसरा खेळाडू हमखास विजय खेचून आणू शकतो.  नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची नेत्रदीपक कामगिरी याचेच उदाहरण आहे. संतुलित संघ हा विजयाचा मानकरी ठरतो असे क्रिकेटचे जाणकार म्हणतात. आशिया चषकात भारतीय संघाने सहा सामने खेळले या सहाही सामन्यात भारताला विजय मिळाला. गोलंदाज व फलदाजांचे संतुलन व सर्वोत्तम कामगिरी या स्पर्धेदरम्यान पहावयास मिळाली. सध्याचा भारतीय संघ हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून ख्याती मिळवितो आहे.आयसीसी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी असून हा संघ आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा समतोल संघ आहे का, असा प्रश्न ‘सीएनएक्स’ने क्रिके ट चाहत्यांना विचारला. उणीवा असल्या तरी हा सर्वोत्तम आहे असे मत चाहत्यांनी यावेळी नोंदविले. सध्याचा भारतीय क्रिकेट संघात ‘विनिंग कम्पोझिशन’ असल्याचे त्यांनी सांगितले.फुटबॉल, हॉकी पासून ते क्रिकेटपर्यंत सर्वंच खेळाच्या बाबतीत समतोल संघ विजयाचा मानकरी असतो असे म्हटले जाते. क्रिकटच्या बाबतीत तर ही भावना हमखास बोलून दाखविली जाते. भारतीय उपखंडातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेटला मान्यता मिळाली आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका व बांग्लादेश क्रिकेट संघाला कसोटी दर्जा मिळालाच आहे, मात्र या शिवाय नेपाळ व अफगानिस्तान या देशांत सुद्धा क्रिकेटची लोकप्रियता वाढत आहे.भारत, श्रीलंका, पाकिस्तान या देशांनी वर्ल्डकप जिंकल्याने सर्वोत्त्कृष्ट खेळाडूचा समावेश असलेला समतोल संघ म्हणून त्यांनी ख्याती मिळविली आहे. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिके टमध्ये अनेक विक्रम केले आहेत. या खेळाडूंच्या कामगिरीमुळे अनेक आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाला विजेतेपदाला गवसणी घालता आली. याच संघभावनेतून भारत जगज्जेता ठरेल, असा विश्वास शहरातील क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे.