शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

टीम इंडियामध्ये ‘विनिंग कम्पोझिशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 04:17 IST

सध्याचा भारतीय संघ हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून ख्याती मिळवितो आहे. 

दोनपेक्षा अधिक खेळाडू असलेला कोणताही खेळ असो, यात संघभावनेला प्रथम स्थान दिले जाते. एखादा खेळाडू मागे पडत असेल तर त्याची पाठराखन करीत दमदार खेळी करणारा दुसरा खेळाडू हमखास विजय खेचून आणू शकतो.  नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची नेत्रदीपक कामगिरी याचेच उदाहरण आहे. संतुलित संघ हा विजयाचा मानकरी ठरतो असे क्रिकेटचे जाणकार म्हणतात. आशिया चषकात भारतीय संघाने सहा सामने खेळले या सहाही सामन्यात भारताला विजय मिळाला. गोलंदाज व फलदाजांचे संतुलन व सर्वोत्तम कामगिरी या स्पर्धेदरम्यान पहावयास मिळाली. सध्याचा भारतीय संघ हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून ख्याती मिळवितो आहे.आयसीसी क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी असून हा संघ आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा समतोल संघ आहे का, असा प्रश्न ‘सीएनएक्स’ने क्रिके ट चाहत्यांना विचारला. उणीवा असल्या तरी हा सर्वोत्तम आहे असे मत चाहत्यांनी यावेळी नोंदविले. सध्याचा भारतीय क्रिकेट संघात ‘विनिंग कम्पोझिशन’ असल्याचे त्यांनी सांगितले.फुटबॉल, हॉकी पासून ते क्रिकेटपर्यंत सर्वंच खेळाच्या बाबतीत समतोल संघ विजयाचा मानकरी असतो असे म्हटले जाते. क्रिकटच्या बाबतीत तर ही भावना हमखास बोलून दाखविली जाते. भारतीय उपखंडातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेटला मान्यता मिळाली आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका व बांग्लादेश क्रिकेट संघाला कसोटी दर्जा मिळालाच आहे, मात्र या शिवाय नेपाळ व अफगानिस्तान या देशांत सुद्धा क्रिकेटची लोकप्रियता वाढत आहे.भारत, श्रीलंका, पाकिस्तान या देशांनी वर्ल्डकप जिंकल्याने सर्वोत्त्कृष्ट खेळाडूचा समावेश असलेला समतोल संघ म्हणून त्यांनी ख्याती मिळविली आहे. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिके टमध्ये अनेक विक्रम केले आहेत. या खेळाडूंच्या कामगिरीमुळे अनेक आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाला विजेतेपदाला गवसणी घालता आली. याच संघभावनेतून भारत जगज्जेता ठरेल, असा विश्वास शहरातील क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे.