शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
11
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
12
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
13
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
14
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
15
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
16
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
17
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
18
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
19
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
20
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  

‘समाधान मानणे’ हेच सुखी सहजीवनाचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 20:30 IST

संसारिक जीवनात आनंदी राहायचे असेल तर जो जोडीदार आहे तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे असेच मानावे लागेल.

अनेक मोठे लोक म्हणून गेले की, जे आहे त्यात समाधानी राहावे. जास्त फळाची अपेक्षा केली तर चित्त शांत राहत नाही. असमाधानी मन हे सर्व दु:खाचे मूळ आहे.हे सगळं तुम्हाला केवळ कागदी तत्त्वज्ञान वाटत असेल; मात्र आता एका वैज्ञानिक अध्यायनाची त्याला पुष्टी मिळाली आहे.एका संशोधनानुसार तुम्हाला जर संसारिक जीवनात आनंदी राहायचे असेल तर जो जोडीदार आहे तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे असेच मानावे लागेल.आपल्याला यापेक्षा अधिक चांगला जोडीदार मिळेल किंवा मिळाला असता असा जर तुम्ही विचार करणार असाल तर तुम्ही खूश नाही राहू शकत. या अध्ययनाचे प्रमुख संशोधक डॅनियल कोन्रॉय-बीम सांगतात की, अनेक जण बोलून दाखवत नाहीत परंतु ते आपल्या जोडीदारासोबत समाधानी नसतात. आपण यापेक्षा अधिक चांगला साथीदार डिझर्व करतो असे त्यांना वाटत असते. डोक्यात अशा विचारांनी घर केल्यामुळे सुखाने संसार करणे अवघड होऊन बसते.म्हणूनच तर सध्या उपलब्ध असलेले अनेक डेटिंग अ‍ॅप्स आणि वेबसाईट नात्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. क्लिकसरशी अ‍ॅपवर संभाव्य जोडीदारांची अमर्याद उपलब्धता व्यक्तीला सतत खुणावत असते. अशा प्रकारचा लोभ मग नात्याला अस्थिर करतो.