शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

Fact Check: गरम नारळपाणी कॅन्सरवर गुणकारी नाही, व्हायरल पोस्टमधील दावा खोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 13:54 IST

कर्करोगावरील उपचारांबाबत सोशल मीडियात वेगवेगळे दावे व्हायरल होत असतात. यातील काही मेसेज वाचून तर लोक कोणताही सल्ला न घेता उपचार करण्यासही सुरुवात करतात.

कर्करोगावरील उपचारांबाबत सोशल मीडियात वेगवेगळे दावे व्हायरल होत असतात. यातील काही मेसेज वाचून तर लोक कोणताही सल्ला न घेता उपचार करण्यासही सुरुवात करतात. तर अनेकजण कोणतीही शहानिशा न करता मेसेज फॉरवर्ड करतात. सध्या असाच एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यात नारळपाणी गरम करुन प्यायल्यानं कॅन्सरच्या पेशी मरतात असा दावा करण्यात आला आहे. टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावानं व्हॉट्सअ‍ॅपवर याबाबतचा एक मेसेज व्हायरल होत आहे. याच व्हायरल मेसेजचं सत्य जाणून घेण्याचा 'लोकमत'नं प्रयत्न केला आहे. या मेसेजेच्या पडताळणीत नेमकं काय समोर आलं ते सविस्तर जाणून घेऊयात...

काय आहे दावा?व्हॉट्सअॅपवर टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावाने फिरत असलेल्या मेसेजमध्ये नारळपाणी गरम करुन प्यायल्यानं कॅन्सरच्या पेशी मारल्या जातात असा सल्ला देण्यात आला आहे. "एका कपमध्ये नारळाचे पातळ खोबऱ्याचे २ ते ३ तुकडे घ्या. त्यात गरम पाणी घाला. मग तयार झालेले "क्षारयुक्त पाणी" दररोज प्या. हे सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आरोग्यदायी ठरतं. नारळाच्या गरम पाण्यामुळे कर्करोगावर प्रभावी ठरतो. ही पद्धत वैद्यकीय क्षेत्रात कर्करोगाच्या प्रभावी उपचारांमध्ये गुणकारी ठरत आहे. नारळाच्या गरम पाण्यानं सिस्ट्स आणि ट्यूमरवर परिणाम होतो. सर्व प्रकारच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी सिद्ध झालं आहे. नारळाच्या अर्कासह अशा प्रकारचे उपचार केवळ घातक पेशी नष्ट करतात, त्याचा निरोगी पेशींवर परिणाम होत नाही", असा दावा व्हायरल मेसेजमध्ये केला गेला आहे. 

 

कशी केली पडताळणी?गुगलवर सिंपल कीवर्ड सर्चनं वरील दाव्याबाबत पडताळणी केली. डॉ. राजेंद्र बडवे यांनी खरंच याबाबतचं काही विधान केलं आहे का? याचा शोध गुगलवर केला. तर २०१९ पासूनच यापद्धतीचा मेसेज इंटरनेटवर व्हायरल होत असल्याचं दिसून आलं. यावर खुद्द डॉ. राजेंद्र बडवे यांनीच प्रसिद्धी पत्रक काढून कथित व्हायरल मेसेजबाबत स्पष्टीकरण दिलं होतं आणि संबंधित दावा पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं आहे. 

डॉ. राजेंद्र बडवे यांनी १९ मे २०१९ रोजी जारी केलेलं पत्रक...

वरील पत्रकाचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे...आमच्या असे निदर्शनास आले आहे की, सोशल मीडियात टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावे गरम नारळपाणी प्यायल्याने कर्करोगाच्या पेशी मरतात आणि ही या रोगावरची नवी उपचारपद्धत शोधली गेली आहे असा मेसेज व्हायरल होत आहे. यावर आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, अशा पद्धतीचा कोणताही सल्ला डॉ. राजेंद्र बडवे अथवा टाटा मेमोरियल हॉस्पीटलने दिलेला नाही. संबंधित मेसेज पूर्णपणे खोटा असून नारळाच्या पाण्यामुळे कर्करोगावर उपचार होतात अशा पद्धतीचे कोणतेही वैज्ञानिक संशोधन अस्तित्वात नाही. त्यामुळे लोकांनी अशा मेसेजपासून सतर्क राहावं आणि खोटा संदेश लोकांमध्ये पसरणार नाही याची काळजी घ्यावी. 

निष्कर्षः टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र बडवे यांनी गरम नारळपाणी पाणी प्यायल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात असा कोणताही सल्ला दिलेला नाही. सोशल मीडियात व्हायरल पोस्ट बनावट आहे.