शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

Fact Check: गरम नारळपाणी कॅन्सरवर गुणकारी नाही, व्हायरल पोस्टमधील दावा खोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 13:54 IST

कर्करोगावरील उपचारांबाबत सोशल मीडियात वेगवेगळे दावे व्हायरल होत असतात. यातील काही मेसेज वाचून तर लोक कोणताही सल्ला न घेता उपचार करण्यासही सुरुवात करतात.

कर्करोगावरील उपचारांबाबत सोशल मीडियात वेगवेगळे दावे व्हायरल होत असतात. यातील काही मेसेज वाचून तर लोक कोणताही सल्ला न घेता उपचार करण्यासही सुरुवात करतात. तर अनेकजण कोणतीही शहानिशा न करता मेसेज फॉरवर्ड करतात. सध्या असाच एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यात नारळपाणी गरम करुन प्यायल्यानं कॅन्सरच्या पेशी मरतात असा दावा करण्यात आला आहे. टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावानं व्हॉट्सअ‍ॅपवर याबाबतचा एक मेसेज व्हायरल होत आहे. याच व्हायरल मेसेजचं सत्य जाणून घेण्याचा 'लोकमत'नं प्रयत्न केला आहे. या मेसेजेच्या पडताळणीत नेमकं काय समोर आलं ते सविस्तर जाणून घेऊयात...

काय आहे दावा?व्हॉट्सअॅपवर टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावाने फिरत असलेल्या मेसेजमध्ये नारळपाणी गरम करुन प्यायल्यानं कॅन्सरच्या पेशी मारल्या जातात असा सल्ला देण्यात आला आहे. "एका कपमध्ये नारळाचे पातळ खोबऱ्याचे २ ते ३ तुकडे घ्या. त्यात गरम पाणी घाला. मग तयार झालेले "क्षारयुक्त पाणी" दररोज प्या. हे सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आरोग्यदायी ठरतं. नारळाच्या गरम पाण्यामुळे कर्करोगावर प्रभावी ठरतो. ही पद्धत वैद्यकीय क्षेत्रात कर्करोगाच्या प्रभावी उपचारांमध्ये गुणकारी ठरत आहे. नारळाच्या गरम पाण्यानं सिस्ट्स आणि ट्यूमरवर परिणाम होतो. सर्व प्रकारच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी सिद्ध झालं आहे. नारळाच्या अर्कासह अशा प्रकारचे उपचार केवळ घातक पेशी नष्ट करतात, त्याचा निरोगी पेशींवर परिणाम होत नाही", असा दावा व्हायरल मेसेजमध्ये केला गेला आहे. 

 

कशी केली पडताळणी?गुगलवर सिंपल कीवर्ड सर्चनं वरील दाव्याबाबत पडताळणी केली. डॉ. राजेंद्र बडवे यांनी खरंच याबाबतचं काही विधान केलं आहे का? याचा शोध गुगलवर केला. तर २०१९ पासूनच यापद्धतीचा मेसेज इंटरनेटवर व्हायरल होत असल्याचं दिसून आलं. यावर खुद्द डॉ. राजेंद्र बडवे यांनीच प्रसिद्धी पत्रक काढून कथित व्हायरल मेसेजबाबत स्पष्टीकरण दिलं होतं आणि संबंधित दावा पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं आहे. 

डॉ. राजेंद्र बडवे यांनी १९ मे २०१९ रोजी जारी केलेलं पत्रक...

वरील पत्रकाचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे...आमच्या असे निदर्शनास आले आहे की, सोशल मीडियात टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावे गरम नारळपाणी प्यायल्याने कर्करोगाच्या पेशी मरतात आणि ही या रोगावरची नवी उपचारपद्धत शोधली गेली आहे असा मेसेज व्हायरल होत आहे. यावर आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, अशा पद्धतीचा कोणताही सल्ला डॉ. राजेंद्र बडवे अथवा टाटा मेमोरियल हॉस्पीटलने दिलेला नाही. संबंधित मेसेज पूर्णपणे खोटा असून नारळाच्या पाण्यामुळे कर्करोगावर उपचार होतात अशा पद्धतीचे कोणतेही वैज्ञानिक संशोधन अस्तित्वात नाही. त्यामुळे लोकांनी अशा मेसेजपासून सतर्क राहावं आणि खोटा संदेश लोकांमध्ये पसरणार नाही याची काळजी घ्यावी. 

निष्कर्षः टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र बडवे यांनी गरम नारळपाणी पाणी प्यायल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात असा कोणताही सल्ला दिलेला नाही. सोशल मीडियात व्हायरल पोस्ट बनावट आहे.