शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

World Biodiversity Day : वाशिमच्या सोहळ अभयारण्यात रुजली जैवविविधता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 10:59 IST

World Biodiversity Day : सोहळ येथील अभयारण्यात दररोज विविध प्रकारचे पशुपक्षी, प्राण्यांचे दर्शन होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम/कारंजा लाड : कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाउन असल्याने जंगल, पशुपक्षी, प्राणी यासंदर्भात मानवाचा हस्तक्षेप कमी झाल्याने जिल्ह्यातील जंगल, अभयारण्यांमध्ये पशूपक्षी, प्राणी मुक्तपणे संचार करीत आहेत. जैवविविधतेने नटलेल्या सोहळ ता. कारंजा येथील अभयारण्यात तर दररोज विविध प्रकारचे पशुपक्षी, प्राण्यांचे दर्शन होत आहे. कोणत्याही प्रकारचे प्रदुषण नसल्याने सोहळ अभयारण्य मोकळा श्वास घेत आहे.जैवविविधतेचे स्थान लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये तर महाराष्ट्रात २००८ पासून जैवविविधता नियम लागू आहेत.प् ार्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे अभयारण्यातील जीवांना व वनस्पतींना क्षती पोहोचते. तो बदल नियंत्रणात ठेवणे मानवाच्या हातात आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २४ मार्चपासून लॉकडाउन आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या बाबतीत मानवी हस्तक्षेप आपसूकच कमी झाला. वाशिम जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या नद्यांचा उगम होतो. उदा. अडाण, काटेपूर्णा, बेंबळा इत्यादी. लॉकडाउनमुळे नद्यातील पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याने जलचरांची संख्या सुद्धा वाढली आहे. त्यादृष्टीने लॉकडाउन काळात विविध अभ्यासकांनी व संबंधित विभागाने पाण्याचे नमुने घेऊन व त्यांची चाचणी करून ठेवणे भविष्यकालिनदृष्टीने महत्वाचे आहे. जैवविविधतेने नटलेले सोहळ अभयारण्यात सध्या मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येते.पर्यटनस्थळी पक्ष्यांची किलबिलमालेगाव तालुक्यात तपोवन निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून, लॉकडाउनमुळे येथे मानवी हस्तक्षेप कमी झाला. कोणत्याही प्रकारचे प्रदुषण नाही. या पर्यटन स्थळी विविध प्रजातीचे पशुपक्षी मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येते.वाशिम तालुक्यातील एकबुर्जी येथील धरण परिसरात विदेशातील फ्लेमिंगो पक्ष्याचे आगमन दरवर्षी होत असते. लॉकडाउनच्या काळात धरण परिसरातील प्रदुषण कमी झाल्याने येथे जैवविविधता गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे दिसून येते.मेडशी वनपरीक्षेत्रात विविध प्रजातीचे पक्षी, प्राणी आता मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येते. मालेगाव तालुक्यातील कोल्ही धरण परिसरात प्रदुषण नसल्याने येथे जलचरांच्या संख्येत वाढ होण्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तविला.

कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाउन आहे. यामुळे जंगलांमधील माणसांचा वावर दूर्मिळ झाला. या कालावधीत आपलं खरं हक्काच घर समजून प्राणी मुक्तपणे जगलांत संचार करू लागली. खºया अर्थाने त्यांना आता मोकळा शावस घेता येत आहे. सोहळ अभयारण्यात दररोज विविध प्रकारचे पशूपक्षी व प्राणी मुक्तपणे संचार करीत असल्याचे दिसून येते.- गजानन थेर, अभ्यासक

‘लॉकडाउन’मुुळे जिल्ह्यातील जंगल, धरण, सोहळ अभयारण्य आदींमध्ये माणसांचा वावर कमी झाल्याने या प्रदेशातील जैवविविधता परत स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या नद्यांचा उगम होतो. लॉकडाउनमुळे पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले.- डॉ. नीलेश हेडाअभ्यासक, जैवविविधता.

 

 

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाwildlifeवन्यजीव