शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

World Biodiversity Day : वाशिमच्या सोहळ अभयारण्यात रुजली जैवविविधता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 10:59 IST

World Biodiversity Day : सोहळ येथील अभयारण्यात दररोज विविध प्रकारचे पशुपक्षी, प्राण्यांचे दर्शन होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम/कारंजा लाड : कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाउन असल्याने जंगल, पशुपक्षी, प्राणी यासंदर्भात मानवाचा हस्तक्षेप कमी झाल्याने जिल्ह्यातील जंगल, अभयारण्यांमध्ये पशूपक्षी, प्राणी मुक्तपणे संचार करीत आहेत. जैवविविधतेने नटलेल्या सोहळ ता. कारंजा येथील अभयारण्यात तर दररोज विविध प्रकारचे पशुपक्षी, प्राण्यांचे दर्शन होत आहे. कोणत्याही प्रकारचे प्रदुषण नसल्याने सोहळ अभयारण्य मोकळा श्वास घेत आहे.जैवविविधतेचे स्थान लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये तर महाराष्ट्रात २००८ पासून जैवविविधता नियम लागू आहेत.प् ार्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे अभयारण्यातील जीवांना व वनस्पतींना क्षती पोहोचते. तो बदल नियंत्रणात ठेवणे मानवाच्या हातात आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २४ मार्चपासून लॉकडाउन आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या बाबतीत मानवी हस्तक्षेप आपसूकच कमी झाला. वाशिम जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या नद्यांचा उगम होतो. उदा. अडाण, काटेपूर्णा, बेंबळा इत्यादी. लॉकडाउनमुळे नद्यातील पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याने जलचरांची संख्या सुद्धा वाढली आहे. त्यादृष्टीने लॉकडाउन काळात विविध अभ्यासकांनी व संबंधित विभागाने पाण्याचे नमुने घेऊन व त्यांची चाचणी करून ठेवणे भविष्यकालिनदृष्टीने महत्वाचे आहे. जैवविविधतेने नटलेले सोहळ अभयारण्यात सध्या मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येते.पर्यटनस्थळी पक्ष्यांची किलबिलमालेगाव तालुक्यात तपोवन निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून, लॉकडाउनमुळे येथे मानवी हस्तक्षेप कमी झाला. कोणत्याही प्रकारचे प्रदुषण नाही. या पर्यटन स्थळी विविध प्रजातीचे पशुपक्षी मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येते.वाशिम तालुक्यातील एकबुर्जी येथील धरण परिसरात विदेशातील फ्लेमिंगो पक्ष्याचे आगमन दरवर्षी होत असते. लॉकडाउनच्या काळात धरण परिसरातील प्रदुषण कमी झाल्याने येथे जैवविविधता गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे दिसून येते.मेडशी वनपरीक्षेत्रात विविध प्रजातीचे पक्षी, प्राणी आता मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येते. मालेगाव तालुक्यातील कोल्ही धरण परिसरात प्रदुषण नसल्याने येथे जलचरांच्या संख्येत वाढ होण्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तविला.

कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाउन आहे. यामुळे जंगलांमधील माणसांचा वावर दूर्मिळ झाला. या कालावधीत आपलं खरं हक्काच घर समजून प्राणी मुक्तपणे जगलांत संचार करू लागली. खºया अर्थाने त्यांना आता मोकळा शावस घेता येत आहे. सोहळ अभयारण्यात दररोज विविध प्रकारचे पशूपक्षी व प्राणी मुक्तपणे संचार करीत असल्याचे दिसून येते.- गजानन थेर, अभ्यासक

‘लॉकडाउन’मुुळे जिल्ह्यातील जंगल, धरण, सोहळ अभयारण्य आदींमध्ये माणसांचा वावर कमी झाल्याने या प्रदेशातील जैवविविधता परत स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या नद्यांचा उगम होतो. लॉकडाउनमुळे पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले.- डॉ. नीलेश हेडाअभ्यासक, जैवविविधता.

 

 

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाwildlifeवन्यजीव