शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

यवतमाळची प्रणाली साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करून दापोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 17:50 IST

bycycle rally Ratnagiri : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरूणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती, सायकलिंगचा प्रचार, स्थानिक परिस्थिती व मानसिकतेचा अभ्यास हे ध्येय उराशी बाळगून प्रणालीचा प्रवास सुरू आहे़ सुमारे ८,५०० किलोमीटरचा सायकल प्रवास करून ती दापोलीत दाखल झाली होती.

ठळक मुद्देयवतमाळची प्रणाली साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करून दापोलीतप्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालवण्याचा संदेश

दापोली : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरूणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती, सायकलिंगचा प्रचार, स्थानिक परिस्थिती व मानसिकतेचा अभ्यास हे ध्येय उराशी बाळगून प्रणालीचा प्रवास सुरू आहे़ सुमारे ८,५०० किलोमीटरचा सायकल प्रवास करून ती दापोलीत दाखल झाली होती.

प्रणालीने अवघ्या २१ वर्षात समाजकार्यातील पदवी मिळवली आहे. तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. आई व वडील शेती करतात. तिला दोन बहिणीही आहेत. प्रणालीने दापोलीमधील कुडावळे येथे दिलीप कुलकर्णी आणि डॉ. पौर्णिमा कुलकर्णी यांच्याकडे काही दिवस वास्तव्य करून निसर्गस्नेही जीवनशैलीबद्दल जाणून घेतले. पर्यावरणीय सजगता बाळगून दैनंदिन जीवनात खूप मोठी तडजोड न करता कसं छान जगता येतं, हे प्रणाली येथे शिकली. भोगवादी जीवनशैलीचा त्याग करून, संयमित, निरामय, पर्यावरणपूरक अशी जीवनशैली जगणारे कुटुंब विक्रांत आणि मोहिनी पाटील यांनीही तिचा पाहुणचार केला.प्रणाली काही दिवस चिखलगाव येथील दांडेकर परिवाराकडे पाहुणचार घेत लोकसाधना प्रकल्पाचा अभ्यास करणार आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सबलीकरण आणि सर्वांगिण ग्रामविकास या पाच क्षेत्रात लोकसाधना आज काम करत आहे. त्यामुळे येथे खूप काही नवीन शिकायला मिळेल असा विश्वास प्रणालीने बोलून दाखविला.

सायकलने प्रवास करीत प्रणाली नागरीकांशी संवाद साधते. स्थानिक संस्था, शाळा, सरकारी यंत्रणांना भेटी देऊन जनजागृती करते व माहिती पोचवते. त्या-त्या भागातील माहिती घेते, चर्चा करते. आरोग्य जनजागृती आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालवा हा संदेश देते.स्वजबाबदारीवर प्रवासप्रणालीचा सायकल प्रवास हा व्यक्तिगत स्वजबाबदारीचा आहे. ती सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे पैसे घेऊन निघाली नाही. स्वतः कमीत कमी गरजांमध्ये जगण्याचा प्रयत्न करत आहे. सोबत आर्थिक व वस्तूरूपातील मदतसुध्दा लोकच करतात. या सात महिन्यांत अनेक सुखद अनुभव आले आहेत, असे प्रणालीने सांगितले. 

टॅग्स :environmentपर्यावरणbycycle rallyसायकल रॅलीRatnagiriरत्नागिरी