शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

घाटातील दरडीमध्ये कोसळलेल्या वृक्षांचे पुनर्वसन, रायगड जिल्ह्यात ‘सिस्केप’ची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 02:41 IST

बांधकाम विभागाच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यात सिस्केप या संस्थेने सुरू केला आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत २४ झाडे वाचविण्यात यश आले आहे.

- संदीप आडनाईककोल्हापूर : अतिवृष्टीत डोंगरउतारावरील मोठ्या आकाराचे वृक्ष उन्मळून पडतात. या वृक्षांचे पुनवर्सन करण्याचा अभिनव प्रयोगवन विभाग, सार्वजनिकबांधकाम विभागाच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यात सिस्केप या संस्थेने सुरू केला आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत २४ झाडे वाचविण्यात यश आले आहे.अतिवृष्टी झाल्यामुळे रायगड जिल्ह्यातील कुर्ला घाटात डोंगरउतारावरील माती, घसारा खाली येऊन वृक्ष उन्मळून पडतात. यासर्व झाडांचे पुनर्वसन करण्याचानिर्णय या संस्थेने घेतला. पाऊसकमी झाल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून या संस्थेचेसदस्य उन्मळून पडलेल्या झाडांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे काम करीत आहेत.या सदस्यांनी आतापर्यंत १५ वर्षांचे पिंपळाचे झाड, आसना, बिवळा, अर्जुन आणि बरतोंडीयासह २४ जंगली झाडांना ढिगाºयातून बाहेर काढून वाचविले आहे. या मोहिमेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाड वन विभागानेही त्यांना मदत केली, असे संस्थेकडून सांगण्यात आले.गिधाड संशोधन आणि संवर्धन केंद्रात पुनर्वसनमाणगाव तालुक्यातील वडघर या गोरेगाव येथील शैलेश देशमुख यांच्या गिधाड संशोधन आणि संवर्धन केंद्रात या झाडांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यंदा वादळात या केंद्रातील जंगलाची खूप हानी झाली आहे. पुन्हा छोटी रोपे लावून जंगल देवराई पुनर्जीवित करण्याचे काम सिस्केप संस्थेने सुरू केले आहे. त्यासोबतच या मोठ्या झाडांचे पुनर्वसनदेखील याचठिकाणी केले जाणार आहे. यामुळे झाडांच्या पुनर्वसनासोबत पक्ष्यांना निवाराही मिळेल, असे मत सोहम धारप, तसेच प्रतीक देसाई आणि ओंकार सावंत यांनी व्यक्त केले.चिपको आंदोलनाचे स्मरणचिपको आंदोलनाचे स्मरण म्हणून सिस्केपच्या सदस्यांनी झाडे वाचविण्याच्या या मोहिमेला सुरुवात केली आहे. राज्यभर अशा प्रकारची मोहीम स्थानिक पातळीवर राबविण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रेमकुमार मेस्त्री यांनी केले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरण