शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

अकोल्यातील मोर्णा नदी नव्हे, डासांचे उत्पत्ती केंद्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 13:01 IST

पाण्याचा वापर ना शेतीसाठी, ना पिण्यासाठी

ठळक मुद्देअकोल्याचे सांडपाणी थेट नदीत 

- सदानंद सिरसाट

अकोला : शहरातील सांडपाणी थेट मोर्णा नदीत सोडले जाते. त्यामुळे जलचरांना धोका निर्माण झाला असून, नदीलाप्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरातील मोठ्या पुलाखालील पाण्याचा नमुना सर्वाधिक प्रदूषित असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधीच दिला आहे. या पाण्याचा वापर ना शेतीसाठी केला जातो, ना पिण्यासाठी. त्यामुळे ही नदी म्हणजे केवळ डासांचे उत्पत्ती केंद्र होऊन बसली आहे. 

शहराची पाण्याची गरज महान येथील काटेपूर्णा धरणातील साठ्यावर अवलंबून आहे. शहरापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या या धरणातून पाणी आणले जाते. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार अकोला शहराची लोकसंख्या ५ लाख ३८ हजार आहे. दैनंदिन ६.५० कोटी लिटर पाणी शहरासाठी लागते. त्यापैकी ३.५० कोटी लिटर पाणी सांडपाण्याच्या रूपात बाहेर पडते. या सांडपाण्याच्या शुद्धीकरणाची कोणतीही व्यवस्था अद्याप अस्तित्वात आलेली नाही. प्रदूषित पाणी शहरातील छोट्या नाल्यांतून थेट मोर्णा नदीत सोडले जाते. त्यामुळे अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला गटाराचे रूप आले आहे.  

सांडपाणी व्यवस्थापनासाठी शहरात भूमिगत गटार योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यातील २५ टक्केही काम झालेले नाही. मलनिस्सारण वाहिन्यांचे कामही सुरू आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची निर्मिती शहरालगतच्या शिलोडा येथे केली जात आहे. प्रदूषित पाण्यासह शहरातील कचराही मोठ्या प्रमाणात नदीत फेकला जातो. त्याचाही दुष्परिणाम पाणी, त्यातील जलचर जिवांवर होत आहे. 

पाण्याचा उपयोगच नाहीअकोला शहरातून पुढे गेल्यानंतर कोणत्याही गावामध्ये मोर्णा नदीतील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही, तसेच सिंचनासाठीही ते वापरले जात नाही. सुकोडा गावातील काही शेतकरी नदीपात्रातील पाणी उपसा पद्धतीने पिकांना देतात. शहरापासून २०-२५ कि.मी. अंतरावर नदी कोरडी पडते.

शहरातील सांडपाणी व्यवस्थापन करून त्यावर नजीकच्या शिलोडा येथे प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. मार्चअखेरपर्यत काम पूर्ण होऊ शकते. प्रक्रिया केलेले पाणी पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र तसेच भोड येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला देण्याचे नियोजन आहे.    -सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग, महापालिका

सांडपाण्यामुळे नदीच्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले. त्यातून विषारी घटकांत वाढ झाली. त्यामुळे जैवविविधता नष्ट होते. नालीचे पाणी नदीत जाऊच नये, अशी व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. -डॉ. हरीश मालपाणी, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, रालतो महाविद्यालय, अकोला

टॅग्स :environmentपर्यावरणriverनदीpollutionप्रदूषणAkolaअकोला