शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मायणीला पक्षी अभयारण्याचा दर्जाच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 04:51 IST

आश्रयस्थानांच्या संरक्षणाची गरज : मानवी हस्तक्षेपामुळे सातारा जिल्ह्यातील परिसराकडे परदेशी पाहुण्यांची पाठ

प्रगती जाधव-पाटील।

सातारा : मायणीला अभयारण्याचा दर्जा कधी नव्हताच व नाही! त्यामुळे एक वनपाल व एक वनरक्षक जाता-येता मायणी तलावावर लक्ष ठेवून असतात; हेच संरक्षण आणि इतकंच संवर्धन! सातारा जिल्हा प्रशासन (जिल्हाधिकारी कार्यालय) व सातारा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर मात्र ‘मायणी पक्षी अभयारण्य’ असाच उल्लेख आढळतो. फ्लेमिंगोसह शेकडो परदेशी पाहुण्यांचा अधिवास असणारा मायणी परिसर दुर्लक्षितच राहिला. म्हणूनच की काय आज मायणीकडे या परदेशी पाहुण्यांनी पाठ फिरवली आहे.सातारा जिल्ह्यातील मायणी (ता. खटाव) तलाव परिसराचा उल्लेख सर्रास ‘मायणी पक्षी अभयारण्य’ असाच केला जातो. मायणीला अभयारण्याचा दर्जा कधीच नव्हता व आजही नाही. ते अभयारण्य असल्याची कोणतीही नोंद अभिलेखावर आढळत नाही, असा खुलासा वन विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

मायणी येथे चाँद नदीवर तलाव बांधण्यात आला आहे. या ब्रिटिशकालीन तलावामुळे सांगली-सातारा जिल्ह्यांतील शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली आले. तलाव परिसराचा कालांतराने मायणी पक्षी अभयारण्य, असा लौकिक झाला. या कथित अभयारण्यास इंदिरा गांधी यांचे नाव देण्यात आल्याची वदंता आहे. यासंदर्भात सातारा वन विभागाच्या कार्यालयात शोध घेतला असता ‘मायणी पक्षी अभयारण्य’ असल्याचे सांगणारा एकही कागदोपत्री पुरावा आढळला नाही. वनपाल व वनरक्षक अशा दोघांच्या भरवशावर सध्या मायणी व परिसरातील शेकडो हेक्टर वनसंपदा आहे.

मायणी तलावातील वाढत्या मानवी हस्तक्षेपाबाबत बोलताना साताऱ्यातील वन्यजीवरक्षक सुनील भोईटे म्हणाले, ‘मायणीत गाळाचे बेसुमार उत्खनन झाले. विटा व इतर कारणांसाठी या तलावातील गाळाची माती काढली गेली. वेडीबाभूळ व बेशरम या वनस्पतींच्या अतिक्रमणामुळे पक्ष्यांना बसण्यासाठी जागा कमी पडू लागली. उथळ पाण्यामध्ये उंचवट्यांवर सुरक्षित ठिकाणी हे पक्षी बसतात. उत्खननामुळे या पक्ष्यांची आश्रयस्थाने धोक्यात आली. बेशरम वनस्पती व खोल पाण्यामुळे या पक्ष्यांची अन्नसाखळी धोक्यात आली आहे.’पक्षी सप्ताह विशेष1. अभयारण्याचा कोणताही वैधानिक दर्जा नसल्याने पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या या निसर्गस्थळाचे संवर्धन व संगोपनासाठी शासनाकडून कोणत्याही विशेष निधीची तरतूद नाही, तसेच विशेष लक्षही दिले जात नाही.2. युरेशियन डक, कॉमनकुट (वारकरी), पेन्टेड स्टार्क, नॉदर्न शावलर (थापट्या बदक), तसेच भारतीय पाणपक्ष्यांमध्ये अडई, टिबुकली, विविध करकोचे, शेराटी, पाणकावळा, तुतारी, नदीसुरय, कांडे, करकुचे, चक्रवाक, सारंग तसेच पर्यटकांचे खास आकर्षण असणारा फ्लेमिंगो (रोहित पक्षी), अशा विविध देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन येथे होत होते. हा संपूर्ण परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून जात असे. गेल्या काही वर्षांमध्ये मायणी तलावाकडे परदेशी पाहुण्यांनी पाठ फिरवली आहेमायणी वनक्षेत्र विशेष संरक्षित झाल्यास त्याला शासनाकडून स्वतंत्र निधी, अधिक मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल. शिवाय मायणी तलाव व परिसराच्या शाश्वत विकासासाठी शासन निर्देश देते. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे हे आश्रयस्थान त्यांच्यासाठी अधिक सुरक्षित होईल.- डॉ. भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक, साताराराजे-रजवाड्यांच्या काळात शिकारीसाठी जंगलं राखून ठेवली जायची. पक्ष्यांच्या शिकारीसाठी मायणी हे त्यापैकीच एक राखीव क्षेत्र आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय वन कायदा लागू झाला. त्यानुसार ही सर्वच जंगलं आपोआप संरक्षित झाली. मात्र, मायणीची नाममात्र का होईना अधिसूचना निघाली नाही; जी होणे गरजेचे होते. - अजित (पापा) पाटील, मानद वन्यजीवरक्षक, सांगली

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसरbirds sanctuaryपक्षी अभयारण्य